Tuesday 30 December 2014

हेच का म्हणावं स्त्रीचं वेगळेपण?






आमच्या एका नातेवाईकांकडे दिवाळीनिमित्त आम्ही सगळे जमले होतो. छान गप्पांना ओघ रंगात आला होता. इतक्यात माझ्या बहिणीने विषय काढला की बघा आपली निशा यावर्षी एमबीएला मेरिटमध्ये आली! निशा माझी मावस बहीण. एका नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक! सगळे म्हणाले वा! लग्नानंतर शिकणे म्हणजे कौतुकच. इतक्यात माझी एक वहिनी म्हणाली, त्यात काय एवढे कौतुक. आजकाल तर डिगर्‍या या अशाच सगळ्या ओळखीने मिळतात! खरे तर ही वहिनी साधारण शिक्षण झालेली! निशा अवाकच झाली. तिचा चेहरा एकदम उतरून गेला. वातावरणाचा सूरच बदलून गेला. खरे त ती काही बोलू शकत होती, पण संस्कारांमुळे ती गप्प बसली. मला आश्‍चर्य वाटलं. का म्हणून स्त्रियाच या स्त्रीच्या वैरी असतात? कुणाचं मन दुखवण्यासारखं महापातक नाही.
दुसरा एक प्रसंग! काय गं अर्चना तुझ्या मुलीचा काय रिझल्ट लागला? अगं एक विषय बॅक राहिला! अरेरे वाईटच झाले. माझी अनुजा बघ मेरिटमध्ये आली. कशाला मुलांची तुलना करायची? कुठल्याही कार्यक्रमाला गेले की असले महाभाग असतात. अय्या! किती लठ्ठ झाली गं. लठ्ठपणामुळे हार्टअटॅक येतो बरं किंवा किती काळी दिसते गं अथवा किती वेडी साडी घातली गं ई. अशा संवादामुळे मन वैतागून जातं. खरंच असं वाटतं की आयुष्य हे किती सुंदर आहे. यात आपल्याला करण्यासारख्या खूप छान गोष्टी असतात. मग आपण असल्या निरर्थक गोष्टींमध्ये का वेळ घालवितो? आपण कुठेही आनंदासाठी जमतो म्हणूनच चांगल्या गोष्टी कराव्यात जेणेकरून आपण दुसर्‍यांना आनंद देऊ शकू! स्वत:ही आनंद घ्या व दुसर्‍यांना पण आनंदाने जगू द्या.
आमच्या ओळखीचे एक कुटुंब रवींद्र गंधे व डॉ. भाग्यश्री गंधे यांनी मैत्रबन नावाची अतिशय भव्य व सुंदर संस्था वृद्धांसाठी सुरू केलेली आहेत. असे अनेक लोक आहेत की जे सामाजिक जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडत आहेत. मला वाटतं की प्रत्येकानी आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ हा चांगल्या कार्यासाठी खर्च करावा! प्रत्येकच स्त्रीला नोकरी करणे शक्य नाही तेव्हा छान पुस्तकांचं वाचन करणे, ट्युशन्स घेणे, कुकिंगचे क्लासेस, मॅरेज ब्युरो इ. अनेक कामे त्या करू शकतात. जेणे करून त्यांना मानसिक समाधान मिळू शकेल.
स्त्रियांसाठी काही नम्र सूचना
१) कृपया कुणावरही व्यक्तिगत टीका करू नये. विशेषत: कुणाच्या रूपाला अथवा कपड्यांना नावे ठेवू नये.
२) कुणाच्याही व्यक्तिगत व घरगुती भांडणात अजिबात पडू नये, कारण ही भांडणे म्हणजे पाण्यावरचे बुडबुडे असतात. सगळे एकच राहतात व आपण वेडे ठरतो.
३) आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ हा चांगल्या क्रिएटीव्ह कार्यासाठी खर्च करा जसे- समाजकार्य, कुकिंग वा आपल्याला ज्या गोष्टीची आवड असेल तो!
४) ‘‘वाचाल तर वाचाल’’ वाचण्यासारखे सुख व आनंद कशातच नाही. तुम्ही वाचनाला एकदा सुरुवात केली की बघा कशा भारावून जाल.
५) कुणी जर शिकत असेल वा चांगलं कार्य करत असेल तर त्याचं कौतुक केलं नाही तरी चालेल, पण कृपया टीका करू नये. (आपण ते करून बघा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!)
६) कुणाच्याही पाठीमागे कुणाची टीका करू ने. सुचना द्यायच्या असतील तर नम्रपणे द्या.
७) दुसर्‍यांचेही बोलणे ऐकून घ्यावे. one way communication नको!
८) दवाखान्यात पेशंटला भेटायला गेल्यावर लवकर उठावे फार पाल्हाळ बोलू नये.
९) आपली अहंकारी वृत्ती कमी करावी. I am the best हे मनातून काढून टाकावे. जे खरंच हुशार असतात त्यांना ते दाखविण्याची आवश्यकताच नसते.
१०) आपल्या मुलांच्या मित्र-मैत्रीणींशी मर्यादेत व कमीच बोलावे.
११) आपल्या मुलांशी मैत्रीणीचे नाते ठेवावे. त्यांच्यावर पूर्ण विश्‍वास ठेवावा. त्यांच्यावर शंका घेणे म्हणजे आपल्या संस्कारावर शंका घेणे होय.
१२) कुठल्याही घरगुती अथवा कमी शिकलेल्या स्त्रीला कमी लेखू नये. कारण हाऊसवाईफ होणे म्हणजे सगळ्यात दिव्य कार्य असतं. प्रत्येकामध्येच काहीतरी गुणवत्ता ही असतेच.
१३) जुन्या शास्त्राप्रमाणे विधवा स्त्रीला प्रत्येक गोष्टीचा अधिकार दिलेला आहे. तिला कुठल्याही कार्यक्रमात तुच्छ लेखू नका वा तिचं मन दुखावू नका. मग आपल्या शिक्षणाला काय अर्थ राहिला!
१४) ज्या गोष्टीबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असते त्यावरच बोलावे उगाच अर्धवट बोलून आपले अज्ञान दाखवू नये.
१५) प्रत्येक स्त्रीने आपले स्वतंत्र अस्त्तिव अवश्य जपावं. तिची स्वत:ची एक स्वतंत्र ओळख असावी. आयुष्यात काहीतरी कार्य व सामाजिक जबाबदारी अवश्य पार पाडावी.
३ STEPS FOR HAAPY LIFE
1. Don’t stress yourself with useless people who don’t deserve to be an issue i your life.
2. Never invest too much emotions at one thing because if you do you will end up hurting yourself .
3. Learn to live without worries, because God will take eare of evertything
TRUST AND HAVE FAITH

No comments:

Post a Comment