Saturday 24 October 2015

एक फुल कोमेजलेलं.........

एक फुल कोमेजलेलं.........

हि एक हळूवार प्रेमकथा तर आहेच पण सोबतच सध्याच्या
एका ज्वलंत सामाजिक प्रश्नावरही भाष्य करून जाते.
मुंबईच्या धावपळीचा बसचा प्रवास म्हणजे
एक मोठं दिव्यंच!! त्यात वरूणचा आज पहिला दिवस होता
बसच्या प्रवासाचा !! प्रवाश्यांनी खचाखच भरलेल्या
बसमधे तो चढला. बसमधे बसण्यासाठी जागा मिळेल हि
अपेक्षा करणंच चुकिचं होतं, म्हणून तो हँडलला पकडून
उभा राहिला.
वरूण मुळचा नाशिकचा पण आता नोकरीसाठी त्याची
मुंबईला आला होता. मुंबईतल्याच एका नामांकित कंपनीत
एका चांगल्या हूद्यावर त्याची नियुक्ती झाली होती.
आणि आज त्याचा पहिला दिवस होता. त्याला अंधेरीला
उतरायचं होतं. कसाबसा गर्दीत उभा राहून तो स्वत:ला
सांभाळण्याचा प्रयत्न करत होता, इतक्यात मागून
त्याला एक आवाज ऐकू आला.
"excuse mi !!! आता जर का तुझ्या हातांनी limits
cross केले तर बघंच!! खुप महागात पडेल" एक साधारण
२६-२७ वर्षाची तरूणी तिच्या मागे उभ्या असलेल्या
तरूणाला दरडावत होती. तो तिची छेड काढत होता बहूतेक
.... हे पाहून वरूणलाही थोडा राग आला व तो त्या मुलाला
म्हणाला, "lediesची रिस्पेक्ट करता येत नसेल तर किमान
त्यांचा अपमान तरी करू नका!!"
यावर तो तरूण वरमून मागे सरकुन उभा राहिला.
"thanx ..... पण हा माझा प्रॉब्लेम आहे मी स्वतः हँडल
करीन प्लीज तुम्ही यात पडू नका!! " ती तरूणी म्हणाली.
तिचं बोलणं वरूणला थोडं विचित्रच वाटलं 'अजीब आहे
यार!!! स्त्री दाक्षिण्य म्हणून हिच्या बाजूने बोललो तर
हिने मलाच लेक्चर दिलं' वरूण मनातल्या मनात बोलला.
पण त्याची नजर वारंवार तिला पाहण्यासाठी धडपडत
होती, चोरट्या नजरेनेच का होईना पण तो तिला
पाहण्याचा प्रयत्न करत होता. गडद निळ्या जिन्सवर
हलक्या पिवळ्या रंगाचा कुर्ता डाव्या खांद्यावर लाल
रंगाची बॅग, पिवळ्या क्लिपने अर्धे केस बांधलेले, तरपकिरी
रंगाच्या टपो-या डोळे काजळाच्या हलक्या रेषेनेही
आकर्षक दिसत होते. पण कपाळावर उजव्या बाजूला मात्र
कसलीतरी जखमेची खूण होती. पण डोळ्यातल्या
काजळाव्यतीरिक्त कसलाच मेकअप तिच्या चेह-यावर
नव्हता. इतक्यात केसांची एक बट तिच्या चेह-यावर आली
आणि आपल्या नाजूक बोटांनी त्यांना बाजूला करत होती व
त्या हाताखालून तिचा खोचक कटाक्ष वरूणकडे गेला.
"आता तुम्ही का असे एकटक पाहताय!! " तिने नाराजीने
विचारलं, तशी वरूणने खाली मान घातली. यावर तो काही
बोलणार इतक्यात कंडक्टरने बेल वाजवली "अंधेरी कोण?
उतरा लवकर चला चला." मागे वळून ती
तरूणी उतरली, तिच्या मागोमाग वरूणही उतरला. जाता
जाता तिच्या तोंडून "idiot!! " हि उपाधी त्याच्या
कानावर पडल्याशिवाय राहिली नाही. यावर वरूण
कमालीचा अचंबीत झाला होता, पण तिची नजर मात्र
त्याला कुठेतरी मनात खोलवर टोचली होती.
ऑफिसमधे पोहोचताच वरूण बॉसच्या कॅबीनमधे गेला. मग
काहि वेळाने बॉस त्याला घेऊन ऑफिसच्या स्टाफकडे गेले.
आणि वरूणची ओळख करून देत म्हणाले,
"डिअर स्टाफ, हे मि. वरूण देशमुख आजपासून हे तुमच्या
टिमचे हे हेड आहेत, I hope यांच्या guidance ने तुम्ही
आणखी प्रभावीपणे आणि एकत्र काम कराल! "
अचानक वरूणची नजर स्टाफमधे उभी असलेल्या एका
तरूणीकडे गेली, हि तर तीच होती.... जी त्याला बसमधे
भेटली होती. पण तिने मात्र त्याला पाहून नजर खाली
घातली. त्यानंतर बॉस निघून गेले. मग वरूण स्टाफजवळ
गेला आणी म्हणाला, "guys!!! मी तुमचा हेड आहे हे
विसरून जा आणि मोकळेपणाने तुमच्या ideas माझ्याशी
शेअर करा, काही प्रॉब्लेम्स असतील तर तेही शेअर करा
ok!! सर्वात आधी मला तुमच्या सर्वांचं introduction
द्या " सगळ्यांचं intro घेतल्यानंतर त्याला कळलं कि तिचं
नाव 'निधी' होतं. एकंदरीत ऑफिसमधल्या सर्वांनाच
वरूणचा स्वभाव व काम करण्याची पद्धत फार आवडली.
संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर सर्वजण निघून गेले. निधी
व तिची मैत्रिण दिपालीही निघतच होत्या कि वरूण ने
त्यांना थांबायला सांगितले.
मग निधीला तो म्हणाला, "मिस. निधी तुमच्या जुन्या
हेडची work staterji काय होती ते जरा मला सांगशील
का?" तीने काहीच उत्तर दिले नाही यावर तिची मैत्रीण
म्हणाली." निधी खुप हूशार आहे, आधीच्या सरांची तिने
खुप मदत केलीय. हि बघा फाईल!! " वरूणने ती फाईल
घेतली मग निधी दिपालीला बाहेर खेचतच घेऊन गेली आणि
म्हणाली, "अगं पागल!! हा तोच आहे ज्याला सकाळी मी
ओरडले होते."
इकडे वरूण एक एक करून त्या फाईलीची पानं चाळू लागला.
तिकडे कॉरीडोअरमधून निधी त्याला पहात उभी होती.
हळूहळू वरूण ऑफिसमधे ब-यापैकी रूळला होता.
ऑफिसच्या स्टफचा तो आवडता झाला होता आणि त्याचे
बॉसही त्याच्या कामावर खुश होते शिवाय निधीच्या.....
ती शक्यतो त्याच्यापासून दूर रहायची.जणू ती त्याला
टाळायचा प्रयत्न करत होती. हाक मारतानाही ती त्याला
इतरांप्रमाणे 'वरूण' न म्हणता मि. देशमुख म्हणायची,
त्यावेळी त्याला तिचं बोलणं असं खुप खोचक वाटायचं,
नेमकी तिची हिच गोष्ट वरूणला खटकायची.
एक दिवस निधी वरूणच्या कॅबीनमधे आली आणि म्हणाली,
"मि. देशमुख!! "
" निधी!! तु इथे ? ...काही काम...." वरूण म्हणाला.
"मि. देशमुख ..... त्या दिवशी ...... बसमधे मी तुम्हाला
rudely बोलले त्याबद्दल खरंच I'm really very sorry
" ती म्हणाली.
"It's ok निधी... तु plz sorry म्हणू नकोस ... मी तर
कधीच त्या गोष्टिला विसरलोय " तो म्हणाला.
"तरीपण .... मला असं बोलायला नको होतं" निधी
"निधी ..... plz no sorry " वरूण म्हणाला.
त्यानंतर निधी तिथून निघून गेली.
वरूणला ऑफिस जॉइन करून आता ८ महिने झाले होते, पण
त्या दिवसा व्यतीरिक्त पुन्हा त्या दोघांमधे कधीच बोलणं
झालं नाही. निधी, वरूणकडे नेहमी अनोळखी
असल्यासारखी बघायची. काही काम असेल तरच
तेवढ्यापुरतं बोलून निघून जायची, याच गोष्टीचं त्याला
वाईट वाटायचं. वरूणप्रमाणेच निधीही ऑफिसमधे सर्वांची
feourite होती
एकदा वरूण काही कामानिमित्त निधीच्या समोरच्या
टेबलवरच्या स्टाफकडे गेला त्याचवेळी दिपालीने निधीकडे
वेगळ्याच नजरेने पाहिले आणि हळूच तिला कोपराने
खुणावले. हि गोष्ट वरूणच्या नजरेतून सुटली नाही. पण
त्याने बघून न बघीतल्यासारखे केले. त्याने अनेकवेळा
दिपालीला तसं करताना पाहिलं होतं. त्या या गोष्टीची
गंम्मत वाटायची.
एक दिवस ऑफिसच्या कँटिनमधे वरूण चहा घेत होता.
दिपालीही तेव्हा तिथे चहा घेण्यासाठी आली होती. तिला
पाहून वरूण उठून तिच्या टेबलजवळ गेला.
"hi दिपाली can I join you?" तो म्हणाला.
"ohh! वरूण तू .. plz have sit" दिपाली हसून म्हणाली.
"हम्म्म..... काय मग कसं चाललंय तुझं काम?" तो
म्हणाला.
"एकदम छान..... त्यात तू उत्तम सर्वांना सांभाळून
घेतोस त्यामुळे काहिच टेन्शन नाही येत" दिपाली
म्हणाली.
"तुझी मैत्रीण निधी नाही आज बरोबर तुझ्या "
निधीबद्दल काही जाणून घेण्याच्या उद्देशाने तो
म्हणाला.
"नाही अरे.... तिला थोडं काम होतं so..... ती ऑफिसमधेच
थांबलीय.. "दिपाली म्हणाली.
इतके दिवस मनात चाललेली घालमेल त्याला आज
संपवायची होती म्हणून तो म्हणाला, " दिपाली!! मला
तुझ्याशी निधीबद्दल थोडं बोलायचंय..... ती का वागते
अशी माझ्याशी ...... म्हणजे अशी तुटक तुटक ...."
त्याचं बोलणं ऐकून आता दिपालीही थोडी गंभीर झाली
कारण तिला याचं कारण माहित होतं तरीही उसनं हसू चेह-
यावर आणत ती म्हणाली," वरूण!! निधी माझी
कॉलेजपासूनची मैत्रीण आहे ... एकदम Best Freind ...
त्यानंतर माझं लग्न ठरलं आणि आम्ही वेगळ्या झालो .....
पण तरीही इतक्या वर्षांनी आजही आम्ही एकत्र
आहोत.खुप छान स्वभाव आहे तिचा!! " दिपाली म्हणाली.
"मग ती माझ्याशीच अशी का वागते?..... ऑफिसमधेही
सर्वांशी बोलते पण मग माझ्याशीच का मोकळेपणाने बोलत
नाही ती?" वरूण म्हणाला.
"वरूण तिचा स्वभाव मुळात असा नाहिये रे.....बाहेरच्या
जगात तर तीसुद्धा मोकळा श्वास घ्यायला आसुसते रे
पण....... भुतकाळाच्या आठवणी तिला तसं नाही करू
देत..... जणू काही त्या आठवणी तिच्या पायातल्या
बेड्याच बनून राहिल्यात...." दिपाली उदास होऊन
म्हणाली.
"म्हणजे मला काही कळलं नाही .. दिपाली.... काय असं
काय घडलंय तिच्या आयुष्यात?" वरूण काळजीने म्हणाला.
"सॉरी वरूण तिच्याबद्दल यापेक्षा आणखी जास्त काही
मी नाही सांगू शकत तुला... मला माहित आहे वरूण तू
तिला पसंत करतोस.... पण प्लिज... जमलं तर विसरून जा
तिला " आणि बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला अन् ती
तिथून उठून निघून गेली.
वरूणला काहीच कळेना कि काय झालं असावं निधीच्या
आयुष्यात..... तो पुरता गोंधळून गेला होता.
एक दिवस वरूण त्याच्या केबीनमधून बाहेर आला असता
समोर त्याला निधी उभी असलेली दिसली, तिने जांभळ्या
रंगाचा पंजाबीसूट घातला होता, फारंच गोड दिसत होती
ती....
"निधी तू?.... काही काम होतं का? " त्याने विचारलं.
"हो......या फाईलमधे काही doubts होते ते clear करायचे
होते " निधी
"ठिक आहे चालेल , तु हो पुढे मी आलोच बॉसशी थोडं
बोलून " वरूण म्हणाला आणि तो बॉसच्या केबीनकडे निघून
गेला. थोड्या वेळाने बाहेर आला तर निधी अजूनही तिथेच
उभी होती. मग दोघेही त्याच्या केबीनमधे गेले, काम करता
करता वेळ कसा निघून गेला, कळलंच नाही. अजुनही थोडं
काम बाकी होतंच, इतक्यात lunchtime ही झाला होता.
शेवटी वरूणच्याच आग्रहाखातर निधी त्याच्याबरोबर
कँटिनमधे गेली. आज शनिवार असल्यामुळे कँटिनमधे जास्त
गर्दीही नव्हती. एक मोकळा टेबल बघून दोघेही तिथे
बसले. बसल्यानंतर काहीवेळ कुणीच काही बोललं नाही,
शेवटी
"कामात वेळ कसा निघून गेला कळलंच नाही ना? निधी "
काहीतरी बोलायचं म्हणून वरूणनेच सुरवात केली.
"हम्म.... आता काही प्रॉब्लेम नाहिये " निधी म्हणाली.
न रहावून वरूण म्हणाला, " निधी!! तुझ्या डोळ्याजवळ हि
खुन कसली गं? काही लागली होतं का तुला?"
हे ऐकताच निधी बावरली, तिला खरं तर वरूणला सगळं
काही सांगायचं होतं पण अचानक तिने वेटरला हाक मारली,
"वेटर!! एक प्लेट फ्राइड राइस? आणि तूम्ही काय घेणार?
" तिने वरूणला विचारलं
"हो मी ही ऑर्डर करतो पण एका अटीवर..... तु मला
'तुम्ही' न म्हणता 'तू' म्हणालीस तरच " वरूण हसून
म्हणाला.
"ok .... तू काय घेणार?" तिने पुन्हा विचारलं.
"माझीही same order " वरूण म्हणाला.
ऑर्डर आल्यानंतर दोघांनीही लंच केला. नंतर दोघेही
कँटिन बाहेर पडले.
इतक्यात वरूण म्हणाला, " थांब निधी!! मला तुझ्याशी
आणखी थोडं काही बोलायचं आहे ..."
तशी निधी जागेवरच थांबली आणि मागे वळून तिने
त्याच्याकडे पाहिलं अन् म्हणाली, "माझ्याशी? .......
काय?"
"निधी मला तुझ्याविषयी जाणून घ्यायचंय .... तू का अशी
तुटक तुटक वागतेस माझ्याशी ? .... माझं काही चुकलंय
का? .... काही प्रॉब्लेम असेल सांग मला मन मोकळं कर
तुझं पण प्लिज अशी मनातल्या मनात कुढत राहू नकोस.."
वरूण म्हणाला.
आता निधीला त्याच्याशी बोलणं भाग होतं.... तिलाही
तिच्या मनाच्या होणा-या घुसमटीतून मोकळं व्हायचं होतं.
मग दोघेही एके ठिकाणी जाऊन बसले. एक लांब उसासा घेत
तिने सांगायला सुरवात केली त्यावेळी तिने ने जे काही
वरूणला सांगितलं वरूणने त्याचा स्वप्नातही विचार केला
नव्हता.
निधी म्हणाली," ४ वर्षापुर्वी .... म्हणजे २०११साली
...माझं लग्न ठरलं होतं ... वैभवशी.....माझा मित्रच
होता तो..... माझं त्याच्यावर प्रेम होतं अश्यातला भाग
नव्हता .... पण आमची खुप चांगली friendship होती.....
त्यामुळे त्याने जेव्हा मला लग्नाबद्दल विचारलं तेव्हा मी
कसलाही मागचापुढचा विचार करता त्याला होकार
दिला........ आमच्या घरच्यांनाही याबद्दल कळवण्यात
आलं..... माझ्या घरच्यांनाही तो आवडला....... मग पुढे
बोलणी होऊन आमच्या लग्नाची तारीखही ठरली.......
लग्न ठरल्यामुळे मीहि खुप आनंदात होते..... भावी
आयुष्याची स्वप्न रंगवू लागले होते......आमच्या लग्नाला
काहीच दिवस शिल्लक होते.... त्यामुळे एक दिवस मी
दिपालीला घेऊन माझ्या लग्नाची खरेदी करण्यासाठी
गेले..... आम्ही खुप खरेदी केली... साडी, दागिने,
बांगड्या... खरेदी करता करता कधी रात्र झाली कळलंच
नाही..... दिपालीलाही तिच्या घरून फोन आला होता आणि
माझ्याही .... त्यामुळे आम्ही दोघी खरेदी आटपून लगेच
निघालो..... रात्रीचे ८ वाजले होते....दिपालीची बस
आल्यामुळे नाइलाजाने तिला निघून जावं लागलं......आता
बसस्टॉपवर मी एकटीच सगळ सामान घेऊन उभी होते.....
तास दोन तास झाले तरी माझी बस यायचं नावंच घेत
नव्हती....... आता तर रात्रीचे १० वाजले होते, आणि
बसस्टॉपवरची गर्दीही हळूहळू कमी होऊ लागली होती....
मग मात्र माझा धीर खचू लागला. शेवटी नाईलाजाने मी
एका ऑटोरिक्षाने घरी जायचे ठरविले.......
म्हणून मी एका ऑटोवाल्याला थांबविले, " डोंबिवली
जाणार का?"
त्याने एकवार माझ्याकडे आणि माझ्या हातातील
सामानाकडे न्याहळून पाहिले. मग म्हणाला, " हा!! ....बैठो
अंदर!! "
मलाही त्याचं वागणं जरा विचित्रच वाटलं.... पण
माझ्यासमोर दुसरा पर्यायही नव्हता म्हणून मीसुद्धा
ऑटोमधे बसले, आणि ऑटो सुरू झाली, "कुठल्याही
परीस्थित मला घरी पोहोचायचं आहे बस्स एवढाच विचार
माझ्या डोक्यात सुरू होता." मनात तर प्रचंड धाकधूक सुरू
होती, काही अंतर पुढे गेल्यानंतर त्या ऑटोवाल्याने
अचानक ऑटो दुस-या रस्त्यावर वळवली आणि एका
निर्जन रस्त्याने ऑटो घेऊन जाऊ लागला..... हि गोष्ट
लगेच माझ्या लक्षात आली.... आणि मी त्याला ऑटो
थांबविण्यासाठी ओरडू लागले ...... पण त्याने माझं
काहिच न ऐकता रिक्षा आणखी वेगाने दामटवायला
सुरवात केली...... आता मात्र मला चांगलाच दरदरून घाम
फुटला..... मला काय कराव तेच सुचत नव्हतं .... भितीने
डोकं एकदम बधीर झाल्यासारखं वाटत होतं....... मला रडू
यायला लागलं होतं..... इतक्यात त्या ऑटोवाल्याने एका
निर्जन ठिकाणी ऑटो थांबवली आणि उतरून माझ्याजवळ
येऊन उभा राहिला...... मला ओरडायचं होतं पण गळ्यातून
आवाजच फुटत नव्हता...... एखाद्या भेदरलेल्या
सशासारखी माझी अवस्था झाली होती...... तो नराधम
मात्र क्रूरपणे माझ्याकडे पाहून हसत होता......... मग
त्याने कचकन माझा हाथ धरला आणि मला ऑटोबाहेर
खेचून काढलं व फरफटत मला तिथून लांब नेलं........ मी
त्याला खुप प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण.....
त्या नीच माणसापुढे माझा निभाव नाही लागला......
माझ्या डोळ्यांदेखत त्याने माझ्या अब्रूच्या चिंधड्या
चिंधड्या केल्या........ क्षणात माझ्या सगळ्या स्वप्नांचा
चक्काचूर झाला होता.... शरीर वेदनेने बधीर झालं
होतं..... " हे सांगत असतानाही निधीच्या डोळ्यांसमोर ती
रात्र व तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला होता.
आणि ते आठवून ती थरथर कापत होती.
"वरूण!!!! ४८ तास ..... मी त्या भयाण दहशतीच्या
छायेखाली घालवले.... दोन दिवसांनंतर त्या निर्जन
ठिकाणी पोलीसांना बेशुद्धावस्थेत मिळाली
होती.....माझ्यासकट माझ्या घरच्यांनाही ह्या घटनेचा
जबर धक्का बसला होता.....किमान महिनाभर मी माझ्या
आजूबाजूच्या लोकांपासून स्वतःला तोडून टाकलं होतं......
या दरम्यान वैभवने एकदाही माझी विचारपूस करण्यासाठी
मला कॉल केला नाही..... भेटायला येणं तर खुप लांबची
गोष्ट होती....... एक दिवस मात्र त्याने माझ्या घरी
फोन केला. माझ्याशी तर तो बोललाच नाही पण माझ्या
बाबांना मात्र म्हणाला कि, "मी निधीशी लग्न नाही करू
शकत"... जेव्हा माझ्या बाबांनी त्याला समजावण्याचा
प्रयत्न केला तर उलट त्याने रागाने असं म्हणून फोन ठेवून
दिला कि,"जी मुलगी स्वतःची इज्जत नाही वाचवू शकत,
स्वतःला सांभाळू नाही शकत ती घरातल्या जबाबदा-या
काय सांभाळणार, तिच्याशी लग्न करून उद्या मी
कुणाकुणाची तोंड बंद करू?"
आधीच्या भयानक प्रसंगातून मी अजून धड सावरलीही
नव्हती कि वैभवने हा दुसरा आघात माझ्यावर केला
होता....... मला स्वतःचीच लाज वाटू लागली होती.......
असं वाटत होतं कि संपवून टाकावं स्वतःला, नष्ट करून
टाकावं हे विटाळलेलं शरीर...... पण त्याही परीस्थितीत
माझ्या आई-वडिलांनी आणि दिपालीने मला धीर
दिला....... त्यावेळी जर या तिघांनी मला सावरलं नसतं
तर कदाचित आज मी जिवंतही राहिले नसते....... त्या
नीच नराधमाविरोधात मी कोर्टात लढा दिला....... त्याला
१० वर्षांची शिक्षा झाली...." निधीच्या डोळ्यातून
घळाघळा अश्रू वहात होते व तिच्या हातावर ठेवलेला
वरूणचा हात भिजवत होते....... .
"I'm rape victim वरूण!!! प्लिज मला विसरून जा......
मी तुझ्या लायक नाहिये रे.... माझ्या सुखांचा तर कधीच
अंत झालाय.......तुझ्या आयुष्यात अजून खुप सुखं यायची
आहेत...... ..... खरं तर मी तुझ्यापासून दूर जाण्यासाठी
पुढच्याच महिन्यात resign करू जाणार होते. " हे सगळं
ऐकून वरूणही हादरून गेला होता, नकळत त्याच्याही
डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. त्याच्याही मनात विचार
आला कि असे कसे पुरूष इतके निर्दयी असू शकतात, एक
म्हणजे तो तो नीच ऑटोवाला ज्याने स्वतःच्या वासनेपोटी
निधीचं आयुष्य बरबाद केलं आणि एक वैभव ज्याने
निधीवर आलेल्या संकटात तिची साथ सोडली व
लग्नाआधीच आलेल्या पहिल्या जबाबदारीपासून हाथ
झटकले." त्याला त्या दोघांचीही चीड आली.
आज निधीने आपलं मन वरूणसमोर मोकळं करू टाकलं होतं
ज्याच्यावर तीने गेल्या ८ महिन्यांपासून मनोमन खुप प्रेम
केलं होतं. काही क्षण शांततेत निघून गेले
मग वरूण स्वतःच तिला म्हणाला, "निधी चल आपल्याला
आता निघायला हवं खुप उशीर झालाय."
निधीला त्याचं हे वागणं आधीपासूनच अपेक्षित होतं.
दोघेहि आपापल्या मार्गाने निघून गेले. जाता वरूणने
कुणाला तरी कॉल केला.
त्या रात्री निधीही खुप रडली. न जानो गेल्या कित्येक
दिवसांपासून तिने हे अश्रू डोळ्यांत साठवून ठेवले होते.
दुस-या दिवशी निधी नेहमीप्रमाणे ऑफिसला आली. तिला
वरूण कुठेच दिसला नाही, इतक्यात तिला दिपालीचा कॉल
आला, "निधी कुठेयस तू? ..... लवकर मला बिल्डिंगखाली
येऊन भेट!! "
"अगं पण का? ... काय काम आहे?" निधीने विचारलं.
"तू जास्त प्रश्न करू नकोस गं .... प्लिज लवकर ये खाली
" दिपाली म्हणाली आणि तिने फोन ठेवून दिला.
निधी तिला भेटायला ऑफिसमधून बाहेर गेली. समोर
दिपाली दिसताच ती म्हणाली, "हं... बोल का इतक्या
घाईने बोलावलंस मला?"
दिपाली तिला म्हणाली, "१मिनट थांब!!", "वरूण!! " तिने
मागे वळून हाक मारली. तसा वरूण निधीसमोर येऊन उभा
राहिला. आणि दिपाली तिथून हसून निघून गेली.
"वरूण तू?... काय चाल्लंय हे सगळं?" निधीने गोंधळून
विचारलं.
"निधी!! .... तुझ्या बाबतीत जे काही घडून गेलं त्यात तुझा
काहीच दोष नव्हता..... U'r not a victim निधी , U'r a
Fighter ... या घटनेनंतर खचून न जाता स्वतःला न्याय
मिळवून देण्यासाठी तू कोर्टात लढा दिलास ...... अशी
हिंम्मत फार कमी मुली दाखवतात...... मला नेहमीच तुझा
अभिमान वाटेल निधी...... माझ्याशी लग्न करशील
का?....."
"काय?." निधी त्याच्याकडे आश्चर्याने पहातच राहिली.
"होय निधी!! ... खरंच विचारतेय मी तुला ... करशील
माझ्याशी लग्न?....... पण तू असं नको समजूस कि
तुझ्याशी लग्न करून मी तुझ्यावर उपकार करतोय .....उलट
तू माझ्याशी लग्ग केलंस तर मी स्वतःला भाग्यवान
समजेन.....माझं खरंच मनापासून खुप प्रेम आहे
तुझ्यावर..... आणि मला तुझ्यासारख्या शौर्यवान मुलीचा
नवरा म्हणवून घ्यायला नक्किच आवडेल." वरूण तिच्या
डोळ्यात पहात होता. आणि निधीच्या डोळ्यात आनंदाचे
अश्रू तरळले व तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं,
अश्रूंवाटे तिचं सगळं दुखं आज कायमचं वाहून चाललं होतं.
आणि दूर कुणाच्यातरी मोबाईलवर गाणं सुरू होतं :
मिला हू अब जो तुमसे, है दिल को मेरे कसम से सुकून
मिला....सुकून मिला
तुझे है पाया रब से, है दिल को मेरे कसम से सुकून
मिला....सुकून मिला
हर पल हसी सा हुआ है, सांसों को तुने छुवा है ,
बढी तुझसे नजदीकीया ...सुकून मिला......
या कथेवरून एक प्रश्न सतत मनात येत राहातो... तो हा
कि अशा घटनांमधे खरच ती मुलगी जबाबदर असते
का? ..... जर नाही ...... तर मग का? आपला समाज
अश्या मुलींचा स्वीकार करत नाही. का? त्यांना डावलून
आणि झिडकारून हा समाज मोकळा होतो?........ अश्या
घटनेनंतर मुली मानसिकरित्या पुर्णपणे खचून जातात,
त्यांना ख-या आधाराची, धीराची गरज असते त्यात
लोकांच्या अश्या मानसिकतमुळे त्या स्वतःलाच अपराधी
समजून एक तर मनातल्या मनात घुसमटत रहातात किंवा
कुणाच्या आधाराअभावी स्वतःला न्याय मिळवून
देण्याएवजी मृत्यूला कवटाळतात. दिवसेंदिवस अश्या
घटनांचं प्रमाण वाढंतच आहे. मी एकच विनंती या
समाजाला करीन कि अश्या मुलींना झिडकारू नका, त्यांचा
ताठ मानेने जगण्याचा अधिकार हिसकावून घेऊ नका.....
ज्या दिवशी मुलींकडे -स्त्रीयांकडे बघण्याची समाजाची
'नजर' व मानसिकता बदलेल त्या दिवशी आपल्या
समाजात कुठल्याच मुलीवर "निर्भया" होण्याची वेळ
येणार नाही. उलट तिला पाठबळ दिलंत तर तिही "निधी"
प्रमाणे अन्यायाविरूद्ध लढा दे स्वतःलः न्याय मिळवून
देऊ शकते.

गुढ-एक रहस्य कथा

गुढ-एक रहस्य कथा

इयत्ता सातवीचा निकाल लागला होता. अजिंक्य वर्गाबाहेर थांबलेल्या मुलींच्या घोळक्याकडे पाहात उभा होता. तेवढ्यात त्याच्या कानावर काहीतरी ऐकु आले आणि तो थेट पळाला ते शिवमच्या घरी.....
"शिवम....ए शिवम...लवकर बाहेर ये..." तो ओरडला.
" व्वा,मित्रा आलास तु!! आणला का माझा निकाल?लवकर दे.आई यायच्या आत,लपवुन ठेवतो."
" शुभम,तु फक्त माझ्यासोबत चल." अजिंक्य अजुनही धापा टाकत होता.
"अरे पण कुठे ते तरी सांगशील?आणि निकाल कुठे आहे माझा?" शिवम.
पण अजिंक्य त्याचं काही ऐकायलाच तयार नव्ह्ता.तो त्याला ओढत घेऊन गेला ते थेट अमृताच्या घराकडे.....
बालवडीपासुन अमृता शिवमच्या वर्गात होती.शिवमला कधीची ती आवडली होती.पण एवढ्या वर्षांत त्याने कधी तिच्याशी बोलायची हिम्मतच नव्ह्ती केली.आणि आज ती हे गाव सोडुन चालली होती.कुठे ते शिवमला माहित नव्ह्तं....
..........................................................................................................................................................
आता या गोष्टीला बरीच वर्षे लोटली.शिवमने कॉम्प्युटर इंजिनिअरींग केले होते आणि नशीब आजमवण्यासाठी तो पुण्याला जायचे ठरवले.त्याचा जिवलग मित्र अजिंक्य सुद्धा पुण्यात जॉब करत होता.
पुण्यातल्या तळेगाव मध्ये अजिंक्य आता राहायला होता.अजिंक्यच्या मदतिने त्याने सगळीकडे रिस्युम दिले.पण जवळ जवळ एक ते दिड महिना झाला तरी काहिच झाले नाही.
"चिल, मिळेल रे....." आपल्या मित्राची समजुत काढत अजिंक्य म्हणाला.
"यार अजुन किती प्रयत्न करायचे?किती बेरोजगारी वाढली आहे." हताश होत शिवमने उत्तर दिले.
"चल आपण मस्त सिंहगडावर जाउन येऊत म्हणजे तुझा मूड पण ठिक होईल" अजिंक्य.
यावर शिवमने नाराजिनेच होकार दिला.
जायचे तर सिंहगडावर होते पण अजिंक्य हा आपल्या मित्राला पुर्ण पुणेदर्शन करायचे या दॄष्टीने निघाला.दुपारचे चार वाजत होते.सगळे लोक सिंहगड उतरत होते आणि हे शहाणे वरती चढत होते.परत यायला त्यांना अंधार पडणार होता.
दुपारचे चार वाजत होते.सगळे लोक सिंहगड उतरत होते आणि हे शहाणे वरती चढत होते.परत यायला त्यांना अंधार पडणार होता.शेवटी एकदाचे ते गडावर पोहोचले.सोबत आणलेली मिसळपाव त्यांनी खाल्ली.
" शिवम,असं म्हणतात की मेलेल्या लोकांचे आत्मा अश्या गडावर भटकत असतात.जरा लक्ष असु दे हा." अजिंक्य हसत म्हणाला.
"माझा अश्या फालतु गोष्टींवर विश्वास नाही.आता थोडा वेळ आराम करुयात." शिवम.
पंधरा-विस मिनिटे झाली असतील.इतक्यात आपल्या बाजुला अजिंक्य नाही हे पाहुन शिवम दचकलाच.
"अजिंक्य? अजिंक्य" शिवम त्याला इकडे तिकडे शोधायला लागला.
इतक्यात पाठिमागुन कुणितरी त्याच्या खांद्यावर हात टाकला.
"अजिंक्य, हा काय पोरखेळ चालवलाय" असं म्हणत शिवम मागे वळाला तर तिथे अजिंक्य नव्ह्ताच!!! अचानक त्याच्या समोर एक केस विस्कट्लेला चेहरा आला.शिवम खुप घाबरला आणि मोठ्याने किंचाळला.
"शिवम,शिवम अरे जागा हो आपल्याला उशिर होतोय." अजिंक्य त्याला झोपेतुन जागे करत होता.
"अजिंक्य तु?? तु कुठे गेला होतास आणि ती??" शिवमला काय बोलावे तेच समजत नव्ह्ते.
"अरे काय बोलतोस शिवम?मी कुठे जाणार? मी तर इथेच झोपलो होतो ना.आणि कोण मुलगी?" अजिंक्य जरा वेळ बोलायचे थांबला आणि अचानक हसायला लागला.
"शिवम,तुला काय अमृताची आठवण आली कि काय!!!" अजिंक्य अजुनही हसत होता.
'ते स्वप्न होते तर...' शिवम मनातच म्हणाला आणि त्याने सुट्केचा निश्वास टाकला.
"बाय द वे शिवम्, अमृता कुठे गेली काय माहिती आहे का तुला?"गड उतरताना अजिंक्यने विचारले.
"माहित नाही यार..तिच्या वडिलांची बदली झाली आणि ती कुठे गेलि काय माहित.." शिवम.
"खुप प्रेम करायचास ना तिच्यावर?" अजिंक्य ने पुन्हा प्रश्न केला.
त्यावर शिवम एकदम शांत झाला.आणि त्याने उत्तर दिले...
"माहित नाही. मे बी तिला दुसर कुणि मिळालं असेल"
रात्रीचे आठ वाजत आले होते.आज दोघेही खुप दमले होते.म्हणुन एकदम गाढ झोपी गेले.
सकाळी शिवमला एक मेल आला.एका कंपनीने त्याला इंटरव्हुसाठी बोलावले होते.शिवम लगेच तयारीला लागला. आणि लगेच कंपनीत कॉल करुन इंटरव्हुसाठी वेळ पक्की केली.
"Excuse me, मी इंटरव्हुसाठी आलोय" reception जवळ येत शिवम म्हणाला.
" तुम्ही थोड्या वेळ वेट करा" असं म्हणत receptionist ने शिवमला बसायला सांगितले.
शिवम तसाच खाली बसला.वर डोकवुन पाहिले तर काय तिथे कोणिही नव्हते.ते पाहुन शिवम दचकला.थोड्यावेळापुर्वी असलेले सगळेजण अचानक कुठे गायब झाले? याच शिवमला आश्चर्य वाटत होते.
तो उभा राहिला.तेवढ्यात शेजारच्या ऑफिसमध्ये कुणितरी असल्याचा त्याला भास झाला.तो तसाच त्या रुममध्ये गेला.कुणाच्यातरी रडण्याचा आवाज येत होता.
खोलित पुर्ण अंधार होता.तो त्या रडणार्या व्यक्तीजवळ गेला.शिवमने त्या व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवला तोच त्याला केस विस्कटलेला चेहरा दिसला.शिवम खुप घाबरला.
" Excuse me,hello??" या आवाजाने शिवमचे लक्ष वेधले.
" काय झालं? ए.सी. चालु असंताना तुम्हाला एवढा घाम कसा काय सुटला??" ती receptionist होती.
'पुन्हा भास झाला.' शिवम मनातल्या मनात पुट्पुटला. आपल्यासोबत असे का होत आहे.
सिंहगडावरुन आल्यापासुन काहितरी वेगळंच शिवम सोबत घडत होतं.सारखं तिच केस विस्कट्लेली तरुणी त्याला दिसत असे...
घरी गेल्या गेल्या त्याने ही हकिकत अजिंक्यला सांगितली.तो मोठ्याने हसायलाच लागला.
"यार ती सिंहगड्वाली आयटम तुझा पिच्छा सोडत नाहिये वाटतं." अजिंक्यच हसणं काही थांबत नव्हतं.
" तर मेन लोच्या असा आहे की तुझ्यावर प्रेम करणारं आपला माणुस पाहिजे" फिल्मी स्टाइल मध्ये अजिंक्य शिवमला म्हणाला.
" काय यार चुकिच्या वेळेला चुकीचे डायलॉग नको रे मारुस..." शिवम शांतपणे म्हणाला.
" अरे खरं तेच सांगतोय मी.अरे तुला जे भास होतात ना त्याचा अर्थ असा आहे की तुला कुणीतरी हवं आहे.तुझ्यावर प्रेम करणारं.तुझी काळजी घेणारं.." अजिंक्य शिवमला समजावत होता.
" पण त्याच्यासाठी एवढे भयानक भास???" शिवम एकदम शांत झाला.
" आता जाऊ दे ना...चल जेवण करुत.." अजिंक्यने विषय बदलला.
तीन दिवस झाले होते.कोणत्याच कंपनीचा काहीच रिप्लाय आला नव्ह्ता.ज्या कंपनीत इंटरव्हु दिला तिथुनही काहीच कळाले नव्हते.शेवटी शिवमने आपले बाडबिस्तर बांधले.
"शिवम,अरे कुठे चाललास? पुन्हा पिकनिकला जायचय का आपल्याला!!! व्वा मस्त..पण मग मला सांगितलं का नाही?"
अजिंक्यने विचारले.
शिवम एकदम शांत झाला.
"अजिंक्य, एवढ्या दिवस तु माझ्यासाठी जे काही केलंस त्याबद्द्ल धन्यवाद!!मी गावाला चाललोय परत." शिवम.
" तुला नेमक म्हणायचं काय?" कपाळावर आठ्या आणत अजिंक्यने विचारले.
" अजुन काय म्हणु....तीन दिवस झाले त्या कंपनीत इंटरव्हु देऊन त्याचा काहिच रिप्लाय नाही.जिथे रिस्युम दिलेत त्यांचा तर पत्ताच नाही. दोन वर्ष झालेत यार बी.ई. होऊन वाटल पुण्यात तरी जॉब मिळेल पण काय ऊपयोग त्या फस्ट क्लास डिस्टिंक्शन मार्कस मिळवुन....." शिवम एकदम शांत झाला.
"झालं तुझ बोलुन्??की अजुन काही बाकी आहे?अरे काय तु तुला आठवतं लहानपणी तुला झाडावर चढता येत नाही म्हणुन सगळी मुलं तुला चिडवायचे तेव्हा किती जिद्दीने तु प्रयत्न करायचास.आणि कोणत्याही गोष्टीत जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत धडपड करत राहायचास....आणि आता??" अजिंक्य त्याला समजावुन सांगत होता.पण त्याचे भाषण थांबले ते शिवमला आलेल्या फोनमुळे.
"हॅलो...." असं म्हणत शिवम एकदम शांत झाला
"शिवम काय झालं? कुणाचा फोन होता?" अजिंक्यने सवाल केला.
" याहू................त्या दिवशी इंटरव्हु दिलेल्या कंपनीत माझ सिलेक्शन झालंय..." शिवम आनंदाने ओरडला.
आणि ते उदास वातावरण अचानक सुखमय झाले.
सोमवारपासुन शिवमला कंपनीत बोलावले होते.
शेवटी तो दिवस आला.कंपनीत सगळ्या फॉरम्यालिटीज झाल्यानंतर त्याला डेव्हलोपमेंट डिपार्टमेंट देण्यात आले.
तिथल्या मॅनेजरने शिवमचे स्वागत केले.
"वेलकम मि. शिवम चला मी तुम्हाला तुमच काम समजुन देतो." मॅनेजर.
असं म्हणत तो शिवमला काहीतरी सांगत होता.इतक्यात एका मंजुळ आवाजाने शिवमचे लक्ष वेधले.
"सॉरी सर जरा उशीर झाला." ती तरुणी म्हणाली.
तिचे केस वार्यावर भुरभुर उडत होते.तिचे नाक पोपटासारखे लांबट होते चेहरा निमुळता होता.तिच्या निळ्या डोळ्यांकडे सारखे पाहावेसे वाटे. तिच्या गुलाबी गालाकडे शिवम पाहातच राहीला.ती तरुणी स्वर्गातुन आलेली अप्सराच वाटत होती.
"शिवम मी तुमची ओळख करुन देतो.ही स्वरांजली तुमच्याच टीममध्ये काम करेल.आणि स्वरा,हा शिवम.आजच नविन आलेत"
मॅनेजर ओळख करुन देत म्हणाला.
"हाय" शिवम लगेच बोलायला पुढे सरसावला. पण स्वरा तशीच निघुन गेली.
"शिवम, तिच्या वागण्याचं वाईट नको वाटुन घेऊस.तशी ती एकदम फ्री आहे.पण त्या घटनेनंतर ती अशी झालीये."मॅनेजर.
"अशी कोणती घटना घड्लीये तिच्यासोबत??" शिवमने सवाल केला.
" अॅक्चुअली तिची एक मैत्रीण होती.इथेच काम करत होती.जिच्या जागेवर आता तु काम करणार आहेस."
"तिचं काय झालं?" मॅनेजरचे बोलणे पुर्ण व्हायच्या आत न राहवुन शिवम ने प्रश्न केला.
" ती नाहीये या जगात.एका दुर्दैवी घटनेत तीच निधन झालं.तिच नाव........" इतक्यात मॅनेजरला कुणाचा तरी फोन आला.
आणि तो तसाच निघुन गेला....
आता शिवमदेखिल स्वरासोबत त्यांच्या टीम मधला एक मेंबर होता.
" मस्त हॉट आहे ना स्वरांजली...." या आवाजाकडे शिवमचे लक्ष गेले.
"Excuse me???" शिवम.
तोच समोरुन एक तरुण त्याच्याकडे येत होता.त्याचे डोळे लाल झाले होते.बहुतेक तो रोज निदान एकतरी बियर घेत असेल यात अजिबात शंका नव्ह्ती.आणि कदाचित कालची त्याची अजुन उतरली नव्हती.
"प्लीज तुम्ही जरा नीट बोला.." शिवम जरा मोठ्यानेच म्हणाला.
तोच एक तरुणी शिवमच्या कानात कुजबुजली.
"तो संदीप आहे.आपला टीम लीडर...जरा सांभाळुन नाहीतर बॉस कडे तक्रार करेल तो तुझी."
"का? बॉसचा काय जावई आहे का तो?" शिवमने रागातच विचारले.
"सांगायला वाईट वाटतं...पण होणार आहे तो आपल्या मॅनेजरचा जावई..." ती तरुणी म्हणाली.
" इथेच आमची एक मैत्रीण होती.आमच्यासोबत काम करायची बिचारी खुप प्रेम करायची संदीपवर पण....गेली ती..." तरुणीचे डोळे भरुन आले.
" ए काय चाललय तुमचं आणि जरा कामाला लागा..चला..." संदीप.
शिवमने आतापर्यंत सगळ्यांची ओळख करुन घेतली.आता बाकी होती ती फक्त स्वरांजली.स्वराच्या जागेशेजारीच शिवमची जागा होती.शिवम हळुच तिथे गेला.
" हाय मी शिवम...आजच जॉइन झालोय." शिवमनेच सुरुवात केली.
"हिम्मत कशी झाली माझ्या मैत्रिणीची जागा घ्यायची?ही जागा तिची आहे.." ती मोठ्याने ओरडली.
सगळे शिवम आणि स्वराकडे पाहत होते.शिवम आपले काही चुकले का याचा विचार करत होता.
" आय अॅ म सॉरी.मला असं बोलायचं नव्हतं" असं म्हणत स्वरा तिथुन निघुन गेली.
संध्याकाळ झाली होती.शिवमने दिलेले काम आटोपले.आणि तो आता घरी जायच्या तयारीत होता.
" तिच्या अशा वागण्याचा जास्त विचार नको करुस.तुझी काही चुकी नव्हती." मघाचीच ती तरुणी शिवमकडे येत होती.
" हाय मी शैलजा" तिच्या या बोलण्यावर शिवमनेही हाय केला.ती खुप वेळेपासुन शिवमला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती.पण कामाच्या नादात सांगत नव्ह्ती.
" पण तु इथे येऊन खुप मोठी चुक केलीये.." तिच्या तोंडुन असं ऐकल्यावर मात्र शिवम काळजीत पडला.इथं नेमकं काय चाललय हे जाणुन घ्यायची शिवमला देखील उत्सुकता होती.
"तु पेपर नाही वाचत का?" शिवमच्या कपाळावरच्या आठ्यांकडे पाहात शैलजा म्हणाली.
" का? वाचतो ना रोज कुठे जॉब आहेत ते कायम शोधत असायचो.पेपर आणि इंटरनेट वापरतो म्ह्णुन तर या कंपनीत vaccancy असल्याचे समजले ना...म्हणुन तर हा जॉब मला मिळालाय.." शिवमने एकदम खुशित उत्तर दिले.
" पण तुझ्याच अगोदर याच कंपनीत याच जागेवर आतापर्यंत ४ जण येउन गेलेत.त्यांच काय झालं माहित आहे का तुला?" शिवमच बोलणं मध्येच थांबवत शैलजा म्हणाली.
" जरा समजेल अश्या भाषेत काहीतरी सांगशील का?" शिवम आता पुरता वैतागला होता.
आणि त्यानंतर त्याला शैलजाकडुन जे काही समजले ते ऐकुन शिवमला धक्काच बसला.
ज्या निधन झालेल्या तरुणीच्या जागेवर शिवम आला होता त्या जागेवर आधीही कोणितरी होते. ते ४ तरुण ज्यांचा एकानंतर एक असा मृत्यु झाला होता.त्यांनी आत्म्हत्याही केली नव्हती की कोणि त्यांना मारले नव्हते. त्यांचा मृत्यु नेमका कशामुळे झाला हे कुणालाच समजले नव्ह्ते. पण मरताना सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट सारखीच होती ते म्हणजे त्यांचे डोळे आणि तोंड उघडे होते.कदाचित त्यांनी काहीतरी भयानक पाहिले होते.
" सगळेजण असे म्हणतात की तिच्याच आत्माने त्या सर्वांना मारलेय.आता ती तुलाही नाही सोडणार." शैलजा पुढे म्हणाली.
" तिचा मृत्यु नेमका कसा झाला? आणि नाव काय होतं तिचं??" मध्येच शिवमने विचारले.
" अरे शिवम, शैलजा तुम्ही अजुन इथेच?ओव्हरटाइम करायचा विचार आहे काय?" या आवाजाकडे दोघांचे लक्ष गेले.
ते त्यांचे मॅनेजर होते.
" सर मी निघालेच" असं म्हणत शैलजा निघुन गेली.
"सर मी तुम्हाला एक विचारु?" हळु आवाजात शिवम म्हणाला.
" अरे शिवम आज तुझा पहिलाच दिवस ना जा जरा घरी जाउन आराम कर.." असं म्हणत मॅनेजर निघुन गेला.
शैलजा सांगत होती की आपल्याला जसे स्वप्न पडायचे तसेच स्वप्न त्या चार तरुणांना पडत असे. आपल्याला पडणारे स्वप्न, त्या चौघांचा मृत्यु तसेच त्या आधी झालेला त्या तरुणीचा मृत्यु या सर्वांमध्ये काहीतरी गुढ लपले होते.कशाही परिस्थीतीत हे गुढ सोडवायचे असे शिवमने मनात पक्के केले आणि तो त्या तयारीला लागला.................
घरी गेल्या गेल्या शिवमचे विचारचक्र सुरु झाले.अजिंक्य अजुन आला नव्हता.
" हॅलो अजिंक्य?कधी येणार आहेस तू?" अजिंक्यला फोन करत शिवमने विचारले.
"अरे मला उशीर होईल तु जेवण करुन घे." अजिंक्यने उत्तर दिले.
" अरे ऐक ना...रद्दीचे पेपर कुठे ठेवलेत तु?" शिवमने विचारले.
" अरे मागच्या रुममध्ये कोपर्यात असतील बघ.पण तुला काय करायचय? रद्दीला देतोस का पेपर्?सकाळी येणारा रद्दीवाला सायंकाळी कसा काय उगवला??" अजिंक्यची बडबड सुरु झाली.
पण तोपर्यंत शिवमने फोन ठेवला होता.
शिवमने मागचे पेपर चाळायला सुरुवात केली.आणि गुढ उकलायला सुरुवात झाली.शैलजाने सांगितले त्याप्रमाणेच त्या कंपनीतल्या त्या चौघांच्या मृत्युची बातमी होती.कंपनीत जॉइन झाल्याच्या दर २० दिवसानंतर त्यांचा मृत्यु झाला होता.आणि तेही भीतीने ह्र्दय बंद पडुन.पण त्यांनी नेमकं काय पाहीलं होतं याचं उत्तर अजुन शिवमला मिळाले नव्हते.
जॉबला लागुन आता शिवमला आठवडा झाला होता.स्वरांजलीसोबत हळुहळु त्याची मैत्री वाढत होती.स्वराला तिच्या त्या मैत्रिणीबद्द्ल कधीही विचारायचे नाही असं शिवमने ठरवले होते.कदाचित स्वरांजली शिवमला आवडत होती.पण शिवम ते मान्य करायला तयार नव्हता.कारण आधीच त्याला कुणितरी आवडले होते ती म्हणजे त्याची अमु---अमृता.पण तिला नेमक शोधायचं तरी कसं आणि कुठं? हा पण खुप मोठा प्रश्न होता. शिवमला जॉबही चांगला लागला होता आजपर्यंत केलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे शिवमला वाटत होते.
रात्री नेहमीप्रमाणे शिवम घरी आला.त्याला कोणाचातरी फोन आला होता.तो त्याच्या गावावरुन होता.शिवमची आई खुप आजारी असल्याचे त्याला समजले.जाणे भाग होते. अजिंक्यने त्याची समजुत काढली.
शिवम गावाला गेला.खुप दिवसांनंतर शिवमला पाहुन त्याच्या आईला खुप आनंद झाला.शिवमने त्याच्या आईची चांगली काळजी घेतली. पाच दिवसांत ती बरी झाली.शिवमला लगेचच आपल्या जॉबवर परतायचे होते आणि लवकरच तो पुण्याला निघाला.
"शिवम, अरे अमृता भेटते का तुला?" आईने जाता जाता शिवमला विचारले.
" ती मला कसं भेटेल?" आश्चर्याने विचारले.अरे खुप दिवसांपुर्वी तिचे वडिल आले होते गावात.त्यांच काहीतरी काम होतं.मला शाळेजवळ भेटले.त्यांची जागा कायतरी विकणार होते.म्हणत होते की आता अमृताच्या लग्नाला पैसे नकोत का?सध्या पुण्यालाच असतात म्हणे आणि अमृतापण मोठ्या आयटी कंपनीत कामाला आहे म्हणे." आई सांगत होती. ते ऐकल्यावर शिवमचा चेहरा खुलला.
"कधी आले होते ते? एक महिन्यापुर्वी का? कि...." शिवम खुप उत्सुकतेने विचारत होता.
"अरे एवढी काय उत्सुकता तुला? त्याला आता एक वर्ष झालं असेल?"
"काय?" शिवम ओरडलाच. "मग तु आता एवढ्या उशीरा का सांगत आहेस मग? आणि मी कुठे होतो तेव्हा?"
" अरे पण तुला का एवढी माहिती हवी आहे.आणि तेव्हा तु जॉब शोधत होतास ना.पण तुला नेमकं काय करायचं होतं? बाई त्या पोरीच्या मागावर तर नव्ह्तास ना!!!" आई.
" अगं कायपण तुझं...चल मी जातो आता..आणि परत आजारी नको पडुस." स्मितहास्य करत शिवम म्हणाला.
शिवम कधी ही आनंदाची बातमी अजिंक्यला सांगु असं त्याला झालं होतं.
तीन तासांत शिवम पुण्यात आला.आज रविवार होता.अजिंक्य घरीच होता.
"च्या मारी!!!!याला म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा!!!!" अजिंक्य जोरात किंचाळलाच.
" अजिंक्य अरे ती पुण्यात आहे एवढ्च समजलं." शिवमचा चेहरा उतरला होता.
" अरे उसमे क्या आगे का पता हम ढुँढ लेंगे." अजिंक्य म्हणाला.
"यार पण एवढ्या मोठ्या पुण्यात कसं काय शोधणार तिला?" शिवम
" किसी चीज को अगर....." अजिंक्यचे फिल्मी डायलॉग सुरु झाले. पण शिवमने त्याला मध्येच थांबवलं.
" बर ते जाउदे. तु आल्याच्या खुशिमध्ये आपण आता खाउयात मस्त पुणेरी मिसळ पाव". अजिंक्य.
................................................................................................................................................................................
सकाळी नेहमीप्रमाणे शिवमचं रुटीन चालु झालं.आज जरा लवकरच तो कामाला गेला. तिथे गेला तेव्हा त्याच्या डोळ्यांवर विश्वास राहिला नाही. संदीप आणि स्वरांजली हातात हात घालुन बसले होते.अजुन कोणिही आले नव्हते.
शिवमला पाहताच स्वराने हात बाजुला घेतला.क्षणभर शांतता पसरली.आणि स्वरा तिथुन निघुन गेली.शिवम रागाने संदीपकडे पाहात होता.
" काय राव आमच्या पाखरावर नजर होती तुमची!!!!" संदीप.
" काय म्हणायचं काय आहे नेमकं?" शिवमने शांतपणे विचारले.
"मग एवढ्या दिवस हालचाली ठीक दिसत नव्ह्त्या तुझ्या.आता तुझा पता कट!!" संदीप.
"मॅनेजरचा होणारा जावई आहेस ना तु?" शिवम .
" कोण म्हणालं? ती शैलजा म्हणाली वाटतं.मॅनेजरच्या पोरीसोबत एक दिवस बाइकवर काय पाहिलं, शैलजाने मला मॅनेजरचा जावई बनवला.." संदीप हसत म्हणाला.
" हे तु ठीक करत नाहीयेस.मॅनेजरच्या मुलीसोबत आणि स्वरांजली सोबत..." शिवम.
इतक्यात त्यांना मॅनेजर आत येताना दिसले.
" थांब आत्ताच तुझे प्रताप मॅनेजरना सांगतो.की तुमच्या मुलीला फसवतोय हा" शिवमचा रागाचा पारा चढला होता.
" नक्किच जा सांग." हसत संदीपने उत्तर दिले.
शिवमही मॅनेजरकडे निघाला.
" गुड मॉर्नींग सर..." शिवम.
" ओह. मि शिवम. तुम्ही आज कंपनीत कसे?" मॅनेजरने सवाल केला.
" सॉरी मी समजलो नाही काही." शिवम
"अरे तु आता इथे जॉबला नाहीस.तुला काढुन टाकण्यात आलंय" मॅनेजरने सांगितले.
"पण कारण समजु शकेल का की काय चुकलय माझं" शिवम.
" सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझा performance नीट नाही आणि अजुन बरंच काही संदीपने सांगितलय मला सगळं.." असं म्हणत मॅनेजर आत निघुन गेला.
"अजुन काय काय सांगितलस बॉस ला?" शिवमला आता आपला राग अनावर होत होता.
"हेच की गेले चार पाच दिवस तु नशेत पडला होता आता नीट झाला" असं म्हणत संदीप हसायला लागला.
शिवमला आता जाण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. शिवम तिथुन बाहेर आला.इतक्यात त्याच्या मागुन कोणितरी हाक मारत असल्याच त्याला जाणवलं.ती शैलजा होती.
" मला माहीत आहे शिवम की तुझी काहीच चुक नाही.सगळं त्या संदीपमुळे झालंय.तुला स्वरांजली खुप आवडायची ना म्हणुन त्यानं तसं केलंय.काय जादुटोणा केलाय त्याने तिच्यावर काय माहीत.त्याच्या ताब्यातच आलीये ती आता.
अमृतालापण असंच जाळ्यात ओढलं होतं त्याने.."
" काय म्हणालीस कोण ती?" शैलजाच बोलणं मध्येच थांबवत शुभम ने विचारले.
"अरे अमृता साने.मस्त मुलगी होती रे.स्वराची बेस्ट फ्रेंड." शैलजा बोलतच होती.आणि शिवमच्या डोळ्यांतुन पाणी वाहु लागले.
कारण ती तीच होती.शिवमची लाडकी अमु.. ती इथेच कामाला होती हे आज शिवमला समजलं.ती आपल्या कामात एकदम हुशार होती.आणि तिची बढतीही होणार होती.पण अचानक तिचा मृत्यु झाला आणि सगळंच संपलं.
" पण तिचा मृत्यु कसा झाला?" शिवम ने पुन्हा सवाल केला.
" त्याच काय झालं...." शैलजा काहीतरी बोलणार तेवढ्यात तिला आतुन बोलावणे आले.
" सॉरी मला जायला हवं"
" अगं पण ती कसं काय......" शिवम अजुन काही विचारणार तेवढ्यात शैलजा आत निघुन गेली.
शिवम थोड्यावेळ तसाच स्तब्ध उभा राहीला आणि परतीच्या वाटेवर निघाला.
" उशीरा कसं काय?? कधीची वाट पाहतोय तुझी. आणि तुझा मोबाइलपण स्विच ऑफ आहे..काय झालंय चेहरा का उतरलाय तुझा?" अजिंक्य.
"अरे एक सांगायचं होतं तुला...." शिवम
"काय झालंय नीट सांगशील!!!" अजिंक्य
" अरे अमु सापडली.." शिवम.
" व्वाव ग्रेट न्युज आहे यार.पण कसं काय अचानक भेट झाली वाटतं हो ना??" अजिंक्य उत्सुकतेने विचारायला लागला.
" यार....." शिवम बोलायचं थांबला.
" अरे लवकर सांग!!!!" अजिंक्यला राहवत नव्हते.
" यार अमृता नाहीये आता या जगात.." असं म्हणत शिवमने त्याला घडलेली हकीकत सांगितली.
" पण कसं काय घडलं हे? काही माहीत आहे का तुला?" अजिंक्य.
यावर शिवमने नकारार्थी मान हरवली.
" यार खुप उशीर झालाय मी आता झोपतो असं म्हणत तो तिथुन निघुन गेला.
काहीवेळ तो तसाच अमृताचा विचार करत बेडवर बसला होता.तेवढ्यात एक वार्याची झुळुक आली आणि एक पेपर त्याच्याजवळ आला.तो खुप जुना पेपर होता.
"यार हा अजिंक्य पेपर तर वाचत नाही मग आणतोच कशाला.उगीच रद्दी जमवुन ठेवलीये." मनात असं म्हणत त्याने तो पेपर उचलला.त्यात जे लिहले होते त्यावर त्याचा विश्वास बसेना.त्यात अमृताच्या मृत्युची बातमी होती.
अमृता साने हीचा सिंहगडावरुन पडुन मृत्यु झाला होता!!!!!!!!!! आणि विशेष म्हणजे तुच्यासोबत कोणीही नव्हते.
'असं कसं?? कोणिही सिंहगडावर एकटं कसं काय जाईल? नक्कीच स्वरांजलीच काम असणार हे..कदाचित स्वराला संदीप आधिपासुन आवडत असंणार...म्हणजे तिच ते उदास होणं वगेरे सगळं खोट होतं की काय???' शिवम स्वतःच वेगवेगळे तर्क करत होता.तेव्हा अचानक त्या पेपरमधुन हात आले आणि त्यांनी शिवमचा गळा दाबला.शिवम डोळे फाडुन बघतच होता.पुन्हा त्याला तोच केसांनी विखुरलेला चेहरा दिसला आता मात्र शिवमची शुद्ध हरपली.आणि शिवम बेशुद्ध झाला.
जेव्हा शुद्ध आली तेव्हा तो चक्क सिंहगडावर होता. शिवमला धक्यांवर धक्के बसत होते.तिथे कोणीही नव्हते. तो फक्त एकटाच होता.अचानक त्याला कुणाच्या तरी पावलांचा आवाज आला तो त्या दिशेने धावला.पण तिथे कोणिही नव्हते. शिवमचे शरीर घामाने ओलेचिंब झाले होते.आणि तो मागे वळाला तोच तो मागे वळाला.अचानक त्याला पुन्हा तोच चेहरा दिसला. कोण आहेस तु? आणि मला का सतावत आहेस.तेवढ्यात कुठुनतरी वार्याची झुळुक आली. आणि तिच्या चेहर्यावरचे केस दुर झाले.आता शिवम तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता.शिवमने नीट पाहिले...
" अमृता!!!!" शिवम आश्चर्याने ओरडलाच..एवढ्या वर्षांनंतरही शिवम तिला ओळखु शकला.
" हे सगळं काय आहे?" शिवम
" तिला वाचव शिवम.." अमृता.
" तिला कोणाला?"
" स्वराला वाचव त्याच्यापासुन..नाहीतर जसं त्याने मला मारले तसं तो तिलाही मारेल.." अमृता.
" कोण?? मला सांग कोण आहे तो? का आणि कसं मारले त्याने तुला??" शिवम मोठ्याने ओरडला.
तेवढ्यात अमृताने आपला हात पुढे केला.आणि शिवमला त्याचा हात आपल्या हातावर ठेवण्याचा इशारा केला.
शिवमने तिच्या हाताला स्पर्श केला तोच त्याला करंट बसल्याचे जाणवले.त्याने डोळे उघडले तेव्हा तो तिथे एकटाच होता. अमृताची आत्मा तिथुन गायब झाली होती. इतक्यात त्याला कुणाचातरी बोलायचा आवाज आला...
" हॅपी बर्थडे टु यु.....हॅपी बर्थडे टु यु.....हॅपी बर्थडे डियर अमृता....हॅपी बर्थडे टु यु"
त्याने नीट पाहिले तर तो संदीप होता आणि त्याच्या सोबत होती ती अमृता!!!
"यार काय सरप्राइज दिलंय तु मला खरंच खुप आनंद झालाय!!!"अमृता संदीपला सांगत होती.
" मग म्हटलं की आपण मोठ्ठ सरप्राइज द्यावं...म्हणुन घेउन आलो मी तुला इथं सिंहगडावर...आता फक्त आपण दोघेच आहोत...." संदीप हसत म्हणाला.
" जानु मी खरच खुप खुश झाले...आय लव यु सो मच..." अमृता खुप खुश होती.
" चल तिथे कडावर जाउन टायटनिक पोझमध्ये एक फोटो काढुयात" संदीप.
त्यावर अमृता तयार झाली.
अमृता एकदम कडेला उभी राहिली. तेवढ्यात संदीपने तिला खाली ढकलले.
अमृता हवेत अधांतरी लटकत होती आणि तिचा फक्त एक हात संदीपच्या हातात होता.
" संदीप हे काय करतोस तु?काय आहे नेमकं तुझ्या मनात??" अमृताने घाबरत विचारले.
" फक्त वीस दिवस झालेत आपली लव्हशीप सुरु होउन आणि लगेच लग्नाचं विचारत होती तु मला सारखी...." संदीपचे डोळे लालभडक होते.
" संदीप प्लीज नको करु असं..." अमृता त्याला विनंती करत होती.
" यार तसंपण आता तुझं जे प्रमोशन होणार होतं ना ते आता माझं होणार...तुला काय वाटलं मी खरंच प्रेम करतो तुझ्यावर? अगं पोरी असतात कशाला टाइमपास करायला.."
असं म्हणत संदीपने अमृताचा हात सोडला...तिच्या किंकाळीने सिंहगडावरची ती शांतता भंग पावली..
" अमृता.........................." ते सगळं पाहुन शिवम मोठ्याने ओरडला.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" शिवम शांत हो.डॉक्टर शिवमला शुद्ध आली." असं म्हणत अजिंक्य डॉक्टरला बोलवायला पळाला.
" आली शुद्ध तुला.." शिवमला चेक करत डॉक्टर म्हणाला.
" पंधरा दिवस झालेत तु कोमात होतास शिवम.बरं झालं लवकर बाहेर आलास कोमातुन.डॉक्टर तर म्हणत होते की अवघड आहे...पण बघ आता सगळं ठीक झालय."
आता शिवमला संपुर्ण गुढ उकलले होते.त्याच्या स्वप्नांमध्ये जी मुलगी येत होती ती अमृता होती.ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती.शिवम खुपच हताश झाला होता.सायंकाळचे नऊ वाजत होते.
" शिवम कसा आहेस?" या आवाजाकडे शिवमचे लक्ष गेले.ती शैलजा होती.
"ठीक" शिवमने मोजकेच उत्तर दिले.
" सॉरी मी एकटीच आले.." शैलजा
" इट्स ओके. स्वरा कशी आहे?" शिवमने विचारले.
" अरे बरं आठवण केली आज रात्री बाराला तिला बर्थडे विश करेन.
"काय आज तिचा बर्थडे आहे!!!" शिवमचे विचारचक्र सुरु झाले.
तो अचानक उठुन उभा राहिला.
" अजिंक्य चल माझ्याबरोबर..." शिवम.
" कुठे..अरे आता कुठं तु शुद्धीवर आलास" अजिंक्य.
" सिंहगडावर" शिवम शांतपणे म्ह्णाला.
" तुला वेड लागलंय का? एवढ्या रात्री तिथे जाउ देतील का?" जाताना रस्त्यात अजिंक्य शिवमला समजावुन सांगत होता.पण त्याकडे शिवमच लक्षच नव्हतं.. त्याने गाडी सिंहगड रोडला घेतली. पायथ्यापासुन दहा मिनिटांत ते वरती गेले.
शिवम घाई घाईत स्वराला शोधायला लागला.तोच त्याला त्याच्या स्वप्नातली जागा आठवली जिथे अमृता पडली होती. आणि तो त्या दिशेने धावला.
तिकडे संदीप आणि स्वराच बर्थडे सेलेब्रेशन चालु होतं...
" खरंच इतकं प्रेम करतोस माझ्यावर?" स्वरा संदीपला म्हणाली.
"हो गं माझी जान...चल आपण तिकडे कडेला एक मस्त पिक घेऊ"संदीप.
" का?तिकडे का? जसं अमृताला मारलं तसंच मला मारायचा विचार आहे का?" स्वराच्या या बोलण्याने संदीप दचकला.
"हे तुला कसं माहित?" त्याने विचारले.
" अच्छा म्हणजे तुच तिला खाली ढ्कलुन दिलंय तर....." स्वरा म्हणाली.
तिने त्याला अमृता आणि तिच्यामधलं व्हाट्सअॅिप संभाषण दाखवलं.बरोबर बारा वाजता स्वराने अमुला बर्थडे विश केलं होतं. आणि त्यावर अमुने रिप्लाय दिला होता की आम सेलेब्रेटींग बर्थडे विथ माय लव्ह...त्या वेळी स्वरा एका मिटिंगसाठी पंधरा दिवस बंगलोरला गेली होती.
"तुला काय वाट्लं की मी तिकडे लांब गेले तर मला काहीच नाहि समजणार...जेव्हा मी पेपर मध्ये बातमी वाचली की अमुची एकटीचीच बॉडी तिथे सापडली तेव्हा मला शंका आली.पण मला माहित नव्हते कि तिचं प्रेम कोण आहे.मी इतक्या जवळची असुन पण तिने कधी तुझ्याबद्द्ल सांगितले नाही.त्या दिवशी ती मला तु आणि तिच्या नात्याबद्दल सांगणार होती.पण......का केलं तु असे सांग" स्वरा संदीपची कॉलर पकडत रागाने म्हणाली.
संदीपने कॉलर झटकली आणि तो मोठ्याने हसायलाच लागला.
"हो मीच मारलं तिला.कारण माझ्याऐवजी तिच प्रमोशन होणार होतं..आणि......" पुढे संदीप काही बोलणार तोच त्याला मागुन आवाज ऐकु आला....
"फक्त वीस दिवस झालेत रिलेशन सुरु होउन आणि तु सारखं लग्नाचं विचारतेस.....अगं पोरी असतात कशाला टाइमपास करायला...." हा शिवमचा आवाज होता.
" हे तु......तुला कसं माहित हे मी फक्त अमृताला बोललो होतो.तेव्हा इथं फक्त आम्ही दोघेच होतो..." संदीप खुप घाबरला होता.
" अमृताने सांगितलं" पुढे येत शिवम म्हणाला.
" ए कायपण नको बडबडु...आणि पुढे नको येऊस नाहितर स्वराला पण खाली टाकेन.." संदीप बोलता बोलता मागे सरकत होता.अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पड्ला. हळुहळु सरकत कडेपाशी आला जिथे अमृता पडली होती.आता तोही अधांतरी हवेत लटकत होता..कसेबसे त्याने एका दगडाला पकडले होते.
" वाचवा वाचवा.." संदीप मोठ्याने ओरडायला लागला..
" वाचवेन पण आधी कबुल कर की तुच अमृताला मारलेय..." शिवम
" शिवम हे काय करतोय?? जाउदे त्याला तसंच खाली." स्वरा म्हणाली.
" नाही स्वरा त्याला आता कोर्ट्च शिक्षा करेल" असं म्हणत शिवमने मोबाइल मध्ये रेकॉर्डींग चालु केलं
" हो मीच मारलं तिला....." संदीपचे सगळे बोलणे शिवमने रेकॉर्ड केले.
" आता तरी वर घ्या मला...मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे..." संदीप ओरडला.
शेवटी स्वरा आणि शिवमने त्याला वर खेचले.
शिवमने स्वराला घट्ट मिठी मारली.दोघांच्याही डोळ्यांत पाणी होते. मोबाइल शिवमच्या हातात होता.तोच अचानक संदीपने बेसावध असलेल्या शिवमच्या हातातला मोबाइल हिसकुन घेतला आणि काय होतंय ते कळण्याच्या आत तो खाली दरीत टाकुन दिला.आणि स्वराच्या गालावर एक जोरदार ठोसा लगावला.त्यामुळे स्वरा खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली.
" आता कोण शिक्षा करणार मला??कोण देणार पुरावा??हा हा हा.........." संदीप मोठ्याने हसायला लागला.
" तुला शिक्षा करायला पुराव्याची काय गरज आहे??" शिवमच्या मागुन आवाज आला.
संदीप तिकडे डोळे वटारुन पाहायला लागला.
" हे कसं शक्य आहे...!!!! तु......" संदीप घाबरला होता. कारण शिवमच्या मागे अमु होती.
" शिक्षा तर तुला होणारच....आठव तु मला कसं मरण्यासाठी सोडुन दिलंस....खाली पडले तरीही दहा मिनिटं जिवंत होते मी...." अमु चा चेहरा भयानक दिसत होता.
" नाही मला नको मारुस...प्लीज" असं म्हणत संदीप मागे मागे सरकायला लागला आणि अचानक त्याचा तोल गेला.
एक आर्त किंकाळी ऐकु आली आणि पुन्हा एकदा भयाण शांतता पसरली.
" शिवम....मी आता चालंलेय.खुप वाईट वाटतं की तु मला शोधायचा प्लॅन करत होतास आणि मी.....
अजुन एक प्रश्न पडलाय ना तुला की ते चार लोक जे तुझ्या आधी कामाला होते त्यांना मी का मारलं???कारण ते संदीपचे तट्टु होते. तुझ्यासोबत जे काही घडायचं त्याबद्द्ल स्वराला काहीही नको सांगुस नाहीतर ती मला कधीही विसरु शकणार नाही.स्वरा खुप आवडते ना तुला तिला लवकर प्रपोज मार मग..नाहीतर ती दुसर्या कोणाची तरी होईल...चल निघते मी आता....माझ्या आत्म्याला आता शांती लाभेल...काळजी घे..." असं म्हणत अमृता अदृश्य झाली.
तेवढ्यात स्वरा शुद्धीवर आली.
"शिवम,संदीप कुठे आहे???" तिने विचारले.
" संदीपला त्याच्या पापाचे प्रायश्चित मिळाले." शिवम शांतपणे म्हणाला.आणि क्षणभर शांतता पसरली.
" शिवम...शिवम कुठे आहेस तु?? दम लागला यार तुला शोधुन आणि तु??" या आवाजाने ती शांतता भंग पावली.तो अजिंक्य होता.
" शिवम चल लवकर.यार तु म्हणत होता ते खंर आहे वाटतं.खरंच आत्मा वगेरे असंत वाटतं.यार कालच न्युज वर भारतातले दहा हॉन्टेड प्लेस दाखवत होते आणि कदाचित त्यात हे देखील असेल प्लीज चल लवकर"
त्याच्या या बोलण्यावर शिवम हसायला लागला आणि पुन्हा सिंहगडावर भयाण शांतता पसरली
..................... समाप्त................

Tuesday 10 February 2015

इच्छामरण

मी माझ्या अर्ध्या भारतीय आणि अर्ध्या अमेरिकन कुटुंबासह नव्या वातावरणाशी जुळवून घेण्याच्या धांदलीमध्ये होतो. त्यातच पूर्वीच्या परिचितांशी पुन्हा धागेदोरे जोडण्याचाही प्रयत्न चालू होता. पण तरीही रहीमच्या लगबगीवर माझं लक्ष होतं. त्याच्या अंगात नेहमीच धावपळीचं भूत संचारलेलं असायचं. कितीतरी वेळा मला वाटलं की त्याला बोलावून विचारावं की अरे, तुला नेहमी एवढी घाई कशाची झालेली असते? पण जेव्हा जेव्हा हा विचार मनात आला तेव्हा तेव्हा काही तरी कारणानं ते राहून गेलं. कधी कोणी पेशंट सीरियस व्हायचा, कधी कोणी बाहेरचे डॉक्टर आलेले असायचे, कधी ऑक्सिजनची सिलिंडरं येऊन पडली आहेत असा निरोप यायचा आणि मग ती आणण्याची  व्यवस्था करायला लागायची तर कधी आणखी काही.

त्याचं घर जवळच होतं. आमच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला एक दोन-तीन खोल्यांचं आऊटऱ्हाऊस होतं, साधारणपणे सगळ्या बंगल्यांमध्ये असतात तसंच. त्याच आऊटऱ्हाऊसमध्ये त्याचे आजोबा पण रहात होते. माझ्या लहानपणाच्या आठवणींमध्ये त्यांच्या आठवणी खूप आहेत. ते मला बग्गीतून शाळेत सोडत असत आणि पुन्हा शाळेतून घरी घेऊन येत असत. त्यांच्या रिकाम्या वेळात कधी कधी ते मला उर्दू लिपी देखील शिकवत असत. बंगल्याच्या भोवती असलेल्या झाडांना ते पाणी देत. फक्त फुलझाडांनाच नाही तर आंबा, चिंच अशा झाडांनाही ते पाणी घालत असत. मोठ्या झाडांना पाणी घालताना पाहून मी त्यांना विचारलं होतं, "जंगलातल्या मोठ्या वृक्षांना कुठे पाणी घालतात, मग ह्यांना कशाला घालायचं?" त्यावर ते म्हणाले होते, "हो, तुझं बरोबर आहे, पण हे बघ, माणसाला सुद्धा दोन दिवसातून एकदा जेवण आणि दोन पेले पाणी एवढंच दिलं तरी तो काही मरणार नाही. पण ते जगणं निराळं! खरं तर दिवसातून एकदा पाणी मिळणं हा प्रत्येकाचा हक्कच आहे. निसर्गाला झाडं काय, माणसं काय सगळे सारखेच."

काही दिवसांतच बाबांनी पोलिस खात्यात वरच्या हुद्द्यावर असलेल्या आपल्या एका मित्राला सांगून त्यांना पोलिस खात्यात नोकरी मिळवून दिली होती. मग त्यांच्या जागी रहीमचे वडील खालिद मियॉं आमच्याकडे काम करायला लागले. खालिद मियॉं मध्यम बांध्याचे होते. त्यांना टापटिपीची आवड होती. व्यवस्थित कापलेली छोटीशी दाढी त्यांना खूपच शोभून दिसायची. दिवसातून दोन वेळा नमाज पढणं आणि स्वतःची कामं करणं यांना लागणारा वेळ सोडून ते जवळजवळ चोवीस तास कामावर असायचे. 

मी डॉक्टर होऊन हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हा सगळ्यांना आनंद झाला. मी बाबांच्या टेबलाजवळच खुर्ची घेऊन बसायचो. सुरुवातीला लोक मला ’छोटे डाक’ म्हणायचे. ते त्यांना अजिबात पसंत नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की अशी नावं एकदा चिकटली की कायम चिकटूनच राहतात. ते सांगायचे "’छोटे डाक’ नाही, ’नवे डॉक्टरसाहेब’ म्हणा." 

बाबांच्या बरोबर काम करायला सुरुवात करून थोडेच दिवस झाले होते, तेवढ्यात माझ्यापुढे एम.डी. करण्याची संधी चालून आली. मी पुन्हा महाविद्यालय आणि वसतिगृह ह्या विश्वात आलो. तेव्हा   फास्टर नावाचे एक डॉक्टर आम्हाला शिकवत असत. त्यांच्या शेवटच्या तासाला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, "एका उत्तम डॉक्टरला एक चांगला मानसशास्त्रज्ञ देखील असावं लागतं. ज्या पेशंटजवळ स्वतः बरं होण्याची फारशी इच्छा नसते, जो निराशा किंवा नकारात्मक विचारांनी ग्रासलेला असतो त्याला बरं करणं जवळजवळ अशक्यच असतं. पण ज्याच्याजवळ जिवंत राहण्याची तीव्र इच्छाशक्ती असते त्याच्याकडून डॉक्टरला चांगलं सहकार्य मिळतं. असे पेशंट बरे होण्याचं प्रमाण खूप असतं. अर्थात विज्ञानालाही आपल्या मर्यादा आहेत."

एम.डी.ची शेवटची परीक्षा संपली न संपली तोच आई गेली. घरातल्या कुणाचा मृत्यू मी प्रथमच पाहात होतो. बाबा पहाडी भागातल्या आमच्या छोट्याश्या गावातील सर्वात व्यग्र डॉक्टर होते. आईने अनेक वेळा सांगूनही ते माझ्या वाढदिवसाला कधी वेळेवर घरी आले नव्हते. इतकंच नाही तर सणाच्या दिवशी पूजेलासुद्धा ते कधी वेळेवर येऊ शकत नसत. त्यामुळे माझी त्यांच्याशी जवळीक अशी कधी झालीच नाही. ते त्यांच्या कामात अतिशय व्यग्र असल्याने अशा कार्यक्रमांतील त्यांची अनुपस्थिती आम्ही चालवून घेत होतो. तसं पाहिलं तर त्यांचं वागणं अगदी सौजन्यपूर्ण होतं आणि आम्हाला काय हवे असेल ते देण्याच्या बाबतीत ते अगदी उदार अंतःकरणाचे होते. घरगुती गोष्टी, नातलगांकडे जाणंयेणं, देणंघेणं ह्या बाबतीत त्यांनी आईला कधीही विरोध केला नाही. पण आईला ह्याहीपेक्षा आणखी काही तरी जास्त महत्त्वाचं वाटत होतं. तिला बाबांचा वेळ हवा होता, स्वतःसाठी, माझ्यासाठी आणि घरासाठीही! पण तो तिला कधीच मिळाला नाही. त्यामुळे आई गेल्यावर माझ्या मनातली घर नावाची वस्तू धडाधड कोसळून गेली. मी तेव्हा तसा मोठा होतो आणि पहाडी भागातल्या छोट्याश्या गावातल्या डॉक्टरवर केवढी जबाबदारी असते याची मला पूर्ण कल्पना होती. पण रात्री अकरा-अकरा वाजेपर्यंत वाट बघणाऱ्या आणि तेव्हा अन्न गरम करून बाबांना वाढणाऱ्या आईची आठवण झाली की बाबांचं वागणं क्षम्य वाटत नसे. आईचे सगळे अंत्यविधी पुरे करून मी परत वसतिगृहात आलो.

त्यावेळी महाविद्यालयाला सुट्टी लागली होती आणि विद्यार्थी आपापल्या घरी गेले होते. प्राध्यापक  निवासात फक्त डॉ.फास्टर होते आणि विद्यार्थी वसतिगृहात मी एकटा. हे माझ्या पथ्यावर पडलं आणि सरांनाही उन्हाळ्याच्या सुट्टीत वेळ घालवायला साधन मिळाल्यासारखं झालं. त्यांनी आपले कितीतरी अनुभव त्यावेळी मला सांगितले. नवी औषधं, नवे शोध, नवनवे प्रयोग आणि त्यांचे समाजाला उपयोग ह्याबद्दलचं ज्ञान त्यांनी मला दिलं. ते नेहमी संगणकासमोर बसून आंतरजालावर वैद्यकीय माहिती वाचत असत. त्यांच्या नेहमीच्या वर्गात मी शंभर मुलांमधला एक असायचो पण आता मात्र एकट्याने त्यांच्याकडून शिकण्याचं भाग्य मला मिळालं.

एम.डी.च्या निकालानंतर मला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. बाबांना हे सांगितल्यावर त्यांनी आनंदानं परवानगी दिली. त्यावेळी ’फॉरेन रिटर्न  डॉक्टर’ची क्रेझ होती. पण मी एकदा तिथे पोहोचल्यावर तिथल्या आयुष्यात इतका गुरफटलो की फक्त ’क्रेझ’ राहिली आणि ’रिटर्न’ विसरलो! मधल्या काळात मी माझी अमेरिकन सहकारी डॉक्टर नॅन्सी हिच्याशी विवाह केला. नॅन्सी तिथली स्त्रीरोगतज्ञ होती. शहरातल्या सगळ्या पंजाबी, गुजराती लोकांशी ती हिंदीत बोलायची. त्यांनाही ते आवडायचं. खरं तर त्यांना स्वतःला हिंदी फारशी फारशी येत नसे. कारण त्यांची मातृभाषा वेगळी होती, अमेरिकेत रहायचं तर इंग्रजी यायला पाहिजे म्हणून ते इंग्रजी शिकले होते. हिंदी त्यांच्यासाठी तिसरी भाषा होती. तिथे गेलेल्या आधीच्या पिढीतल्या भारतीयांना तर डॉ.नॅन्सी सारख्या अमेरिकन डॉक्टरनं आपल्या भारतीय डॉक्टरशी लग्न केलं आणि ती हिंदी बोलते ह्याचाच आनंद व्हायचा. ते बोलूनही दाखवायचे, "वुई आर सो ग्लॅड बिकॉज यू स्पीक हिंदी सो फ्लूएंटली. बट वुई कान्ट अंडर्स्टॅंड हिंदी."

इथलं मोठं घर, फार्म हाऊस, सर्वांच्या पासबुकात जरुरीपेक्षा किती तरी जास्त डॉलर्स! दहा वर्षं कशी गेली कळलंच नाही. बाबा गेल्याचा फोन आला आणि एखाद्या गुंगीतून बाहेर यावं तसं माझं झालं. माझं पहाडातलं गाव, तिथलं माझं घर, आमचं  नर्सिंग होम आठवलं. मागचं आउट हाऊस, परसातल्या आंब्याच्या मोहोराचा सुगंध, मला शाळेत नेणारी बग्गी, ती बग्गी ओढणारी पांढरी घोडी- हे सर्व डोळ्यांसमोर आलं. आणि ह्याबरोबरच आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट - आता नर्सिंग होमवर अवलंबून असलेल्या जवळजवळ चाळीस कुटुंबांचं काय होणार? 

माझ्या मनात चाललेली खळबळ नॅन्सीच्या लक्षात आली होती आणि त्यामुळे ती पण जरा  घाबरली होती. खरं तर तिनं भारत फक्त नकाशातच पाहिला होता आणि एकदा दूरचित्रवाणीवर एका कार्यक्रमात विधानसभेच्या अधिवेशनातील काही भाग दाखवत होते तेव्हा
एका आमदारानं एका मंत्र्याचं धोतर खेचलं होतं तो प्रसंग तिच्या पाहण्यात आला होता. घाईघाईत काही तरी निर्णय घेऊन तिला अडचणीत टाकायची माझी इच्छा नव्हती. आमची मुलं आता अशा वयाची होती की हा बदल त्यांच्या भविष्यकाळावर मोठा परिणाम करणारा ठरणार होता. इथे त्यांना चांगलं शिक्षण मिळणार होतं, अनेक संधी उपलब्ध होत्या. मला ग्रीन कार्ड मिळालं होतं. आम्हा दोघांना कामाचं समाधान आणि पैसा- दोन्ही भरपूर मिळत होता. आमचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही उज्ज्वल म्हणावेत असे होते. इथल्या सुखासीन, सुरक्षित आयुष्याची आम्हाला सवय झालेली होती. 

आठवडाभर मी उलटसुलट विचार करत होतो पण काही निर्णय घेऊ शकलो नव्हतो. माझं रोजचं काम नेहमीसारखं चालू होतं. नॅन्सीशी मी ह्या गोष्टीवर काहीच चर्चा केली नव्हती. पण बहुतेक तिच्या मनात पण हेच विचार चालले होते. रविवारी सकाळी मी तिला पंजाबी ड्रेस मध्ये पाहिलं आणि ती आज चर्चमध्ये जाणार नसावी असा मी अंदाज केला. माझ्यासमोर नाश्त्याची बशी ठेवत ती म्हणाली, "आयुष्यात भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणं बरोबर नाही पण केवळ बुद्धीच्या आधारावरही आयुष्य जगता येत नाही."

मी म्हटलं, "तू काय म्हणतीयस?"

"आपण भारतात जायचं. मी हॉस्पिटलला फोन केला आहे. आपल्या दोन मुलांच्या भविष्यासाठी पहाडात राहणाऱ्या त्या हजारो लोकांची जबाबदारी आपल्याला टाळता येणार नाही."

तिनं हे सगळं इतकं चटकन आणि सहजपणे सांगितलं की मी अवाक झालो. जरा थांबून मी विचारलं, "तुला आज चर्चमध्ये जायचं नाही का? आज रविवार आहे!" 

त्यावर ती म्हणाली, "नाही. मी प्रॉपर्टी डीलरला फोन करून त्याला भेटायची वेळ ठरवली आहे. त्याचं ऑफिस रविवारी देखील चालू असतं."

जेमतेम एका आठवड्यानंतर आम्ही दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरलो. तिथून आमच्या पहाडी गावापर्यंत जाण्यासाठी आम्ही टॅक्सी ठरवली. सबंध रस्त्यात माझ्या डोक्यात हॉस्पिटलशिवाय दुसरे विचार नव्हते. मुलं पण गप्प गप्प होती. नॅन्सी गंभीर होती. तिच्याही डोक्यात तिच्या स्त्रीरोगविभागाबद्दल काही योजना चालू असाव्यात. सोनोग्राफीला लागणारी आणि इतर काही उपकरणं तिनं बरोबर आणली होतीच. 

घरी पोहोचल्यावर पाहिलं तर वातावरण बदललेलं होतं. बंगल्याचं कौलारू छप्पर जाऊन तिथे कॉंक्रीटची स्लॅब आली होती. हॉस्पिटलची बिल्डिंग आधुनिक झाली होती आणि इतरही सुधारणा झाल्या होत्या. बाबा एक चांगले आणि जबाबदार डॉक्टर होते. सगळ्या विभागांचं काम स्वतः बघत असत. शिवाय आठवड्यातून काही दिवस डेहराडूनहून स्पेशालिस्ट येत असत. काही जणांचे ऑपरेशनचे वारही ठरलेले होते. एक जोशी नावाचे ज्युनियर डॉक्टर नियमित यायला लागले होते. ते मुख्यत्वे पेशंटचा फॉलो-अप बघत असत. 

रहीम बंगल्याच्या मागच्या त्याच आऊटऱ्हाऊसमध्ये रहात होता. त्याच्या वडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. रहीम कॉलेजमध्ये जात होता आणि हॉस्पिटलमध्ये कामही करत होता.  त्याची आजी पण तिथे होती. आजीला आजोबांची पेन्शन मिळत होती. वडिलांनी हॉस्पिटलमध्ये कुटुंब नियोजनाचा प्रचार आणि प्रसार  करता करता  स्वतः मात्र रहीमच्या मागे मुलांची पलटण उभी करून ठेवली होती! एवढ्या मोठ्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी आजीची पेन्शन आणि रहीमचा पगार एवढंच होतं. रहीमची आई पडद्याची प्रथा बाजूला सारून परसात भाज्या वगैरे लावायची. मुलांपैकी मुलगे शाळेत जायचे, मुली घरीच असायच्या.

रहीमचे वडील खालिदमियॉं हॉस्पिटलमध्ये जे काम करायचे, साधारण तेच काम रहीम करायचा. स्वयंपाकी, पाणक्या, शिपाई- थोडक्यात पडेल ते काम तो करायचा. आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचायच्या आधी माझं आणि नॅन्सीचं टेबल नीट लावून ठेवायचा, झटकण्यानं धूळ साफ करायचा.

थोड्या दिवसांपूर्वी तो आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता. आजी खूप वृद्ध, कमरेत वाकलेली असूनही मोठ्या हिमतीची वाटत होती. ती आपल्या तब्बेतीला जपून असायची. बहुतेक ह्या वयातले लोक असंच वागतात. एखादा कंजूस माणूस आपल्याजवळ असणारा थोडाफार पैसा सुद्धा कसा सांभाळून ठेवतो तसंच हे लोक आपलं उरलंसुरलं आयुष्य जपतात. त्यामुळे ती तशी हॉस्पिटलात बऱ्याचदा यायची. सिस्टर्स, कंपाउंडर तिच्याशी प्रेमादराने वागत. काल आली होती तेव्हा सिस्टर राबिया तिला गमतीत म्हणाली, "काय आजी, अल्लाच्या घरी जायचं नाही का?" तेवढ्यात रहीम कुठूनतरी एकदम टपकला आणि म्हणाला, "आजी, मी बी.एस्सी. होईपर्यंत जायचं नाही हं. नाहीतर आमचं सगळं संपलंच!"  आजी विश्वासानं म्हणाली, "नाही जाणार बाबा, मला पण काळजी आहे नं! पण एकदा तुझं शिक्षण झालं की मग मात्र मला अडवू नकोस. आता कंटाळा आला ह्या जगण्याचा." रहीम पण अगदी विश्वासानं  म्हणाला, "आजी हे शेवटचं वर्ष आहे. त्यानंतर तुला अडवणार नाही. बी.एस्सी.चा निकाल आणता आणताच कब्रस्तानात जागा बघून येईन."

आमच्याकडे रविवारच्या संध्याकाळला ’थॅंक्यू अवर इविनिंग’ म्हणतात. ह्यावेळी हॉस्पिटलचे कर्मचारी आणि त्यांचे आईवडील बाळ-बाळंतिणीला दाखवायला घेऊन येत असत. ह्याच वेळी मी हॉस्पिटलची काही प्रशासनिक कामं पण बघायचो. कर्मचारी आपल्या काही अडचणी सांगायला येत असत. सुट्ट्या मंजूर करणं, ड्यूट्यांचं वेळापत्रक ठरवणं ही कामं पण तेव्हा होत. एकूण वातावरण जरा सैल असायचं. खाणंपिणं, गप्पाटप्पा पण व्हायच्या. इतर दिवशी हे शक्य नसायचं. 

नॅन्सी बीझी असायची. त्या भागात सोनोग्राफीची सोय फार थोडया ठिकाणी होती. शिवाय हिंदी बोलणारी अमेरिकन स्त्रीरोगतज्ञ म्हटल्यावर तिच्याकडे पेशंटांची नेहमी गर्दी असायची. पण तरीही ती त्रासलेली नसायची. अमेरिकेतल्यासारखी तिला इथे ठराविक वेगाने गाडी चालवावी लागत नव्हती. रोजच्या जरुरीच्या वस्तूंसाठी लांब लांब जायला लागत नव्हतं. तिला इथलं निसर्गसौंदर्य, छोटेछोटे धबधबे, देवदार वृक्ष आणि समोर हिमालयाची पवित्र शिखरं हे सगळं आवडत होतं. मुलांना आम्ही बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलं होतं. 

आमच्या बंगल्याची खिडकी आऊटऱ्हाऊसच्या बाजूलाच उघडत असे. मला तिथून रहीमच्या घरात काय चाललंय ते दिसायचं. रहीम आजीची जरा जास्तच काळजी घ्यायचा असं मला वाटायचं. खरं म्हणजे त्याच्या आईची तब्बेतही यथातथाच होती. पण मुलांचा ओढा बहुधा आजीकडे जास्त असतो असं मला वाटतं. कदाचित त्याच्या सुप्त मनात आजीच्या पेन्शनचाही विचार येत असेल. आजी गेली की पेन्शन बंद! मग एवढ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार असेही विचार त्याच्या मनात येत असावेत. परवाच त्याला आजीशी बोलताना ऐकलं होतं, "आजी, अल्मोड्याला चाललोय अर्ज भरायला. आजोबांनी दिलेला शब्द मोडला. पण तू तसं करायचं नाहीस बरं का. सांगून ठेवतोय." मला कुणी तरी सांगितलं होतं की रहीमच्या आजोबांनी त्याला दिलेला शब्द मोडला होता! रहीम दहा वर्षांचा होता तेव्हाची गोष्ट. आजोबा तेव्हा रजा घेऊन घरी आले होते. तेव्हा त्यांनी रहीमला पुढच्या वेळी तुझ्यासाठी खेळातली बंदूक नक्की घेऊन येईन असं सांगितलं होतं. पण ते आलेच नाहीत! आली ती त्यांची पेन्शन आणि एक भली मोठी काळी पेटी!        

रहीम खूप दिवस आजोबांवर रागवून बसला होता. त्याच्या आजोबांना आपली ड्यूटी करताना दहशतवाद्यांची गोळी लागून मृत्यू आला. मग ते आपला शब्द कसा काय पाळणार? हे काही कुणी रहीमला किती तरी वर्षं पटवून देऊ शकलं नव्हतं. असो. रहीमचा आजीवर मात्र विश्वास होता. आजीची तब्बेत जरा इकडे तिकडे झाली की तो आजीला आठवण करून द्यायचा. म्हणायचा, "आजोबांच्या सारखं काही करायचं नाही!" त्यावर आजीबाई पण आत्मविश्वासानं सांगायच्या, "अरे, माझ्यावर विश्वास ठेव. मी  तुझ्या आजोबांसारखी नाहीये. शिवाय देव जरी मला ओढून न्यायला लागला तरी डॉक्टरसाहेब मला जाऊ देतील का?"

आज सकाळी आजीचा रक्तदाब खूप वाढला होता. तिला हॉस्पिटलात भरती केलं आणि मी काही इंजेक्शनं दिली. डेहराडूनहून एक हृदयरोगतज्ञ आठवड्यातून एकदा हॉस्पिटलमध्ये यायचे. शेवटी त्यांच्याशी पण बोललो. त्यांनी रक्तदाब पाहिला तेव्हा तो अगदीच खाली गेला होता. त्यांनीही दुसरी इंजेक्शनं दिली पण त्याला आजीच्या शरीरानं काहीच प्रतिसाद दिला नाही. 

मला वाटलं रहीमच्या मनाची आता तयारी केली पाहिजे. मी त्याला माझ्या खोलीमध्ये बोलावलं आणि म्हणालो, "हे बघ रहीम, आजी आता सीरियस आहे. आपल्याला ह्या गोष्टी स्वीकारायला पाहिजेत. आजीनं मला शब्द दिला होता, तरी असं झालं, तसं झालं ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. तू आता लहान नाहीस. इतकी वर्षं हॉस्पिटलमध्ये काम करतोयस. तर हे समजून घे. शिवाय तुझ्या शिक्षणाची काळजी करू नकोस.  कोणत्याही परिस्थितीत तुझं शिक्षण चालू राहील. आम्ही आहोत नं त्यासाठी!"

रहीम दरवाज्याच्या जवळच उभा होता, तो लगेच बाहेर सटकला. त्याला माझं बोलणं पटलं असावं. कुठे तरी एका कोपऱ्यात बसून रडत असेल. मी खोलीतून बाहेर पडून मागे वॉर्डच्या बाजूला गेलो तर रहीम नेहमीसारखा तिथे काम करत होता.

घरी जाण्यापूर्वी मी पुन्हा आजीला पहायला अतिदक्षता विभागात गेलो. सिस्टर ऑक्सिजनचं सिलिंडर बदलत होती. मी रक्तदाब पाहण्याचा प्रयत्न केला पण तो घेताच येत नव्हता. मी पत्नीला बोलावणं पाठवलं. ती  हॉस्पिटलच्या दुसऱ्या टोकाला होती. आज तिला एक ऑपरेशन होतं आणि भूल देण्यासाठी अल्मोड्याहून एक डॉक्टर आले होते. तरी ती धावत आली. आम्ही दोघांनी मिळून आजीला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. ती तिच्या ऑपरेशनसाठी गेली आणि मलाही दुसरीकडून बोलावणं आलं. 

मधल्या वेळात सिस्टरनं नाडी पाहिली. पूर्ण खात्री करून घेऊन  मी न सांगताच ऑक्सिजनचं सिलिंडर वगैरे काढून टाकलं. एवढ्या वेळात रहीम मला भेटला नाही. हा रहीम म्हणजे एक वेगळाच माणूस होता. खरं तर मला त्याला भेटणं नकोच वाटत होतं! त्याची समजूत कशी घालायची? तेवढ्यात अकाउंटंट म्हणाला, "तो पुस्तक आणायला गेलाय." नॅन्सी आणि भूल देणारे डॉक्टर पण आले. थोड्याच वेळात इतर सिस्टर्स, कंपाउंडर, अकाउंटंट, आया -सगळेच तिथे जमा झाले. सगळे माझ्याकडे बघत होते आणि मी त्यांच्याकडे! दोन मिनिटांनी मी जरा जोरात म्हटलं, "सगळे आपापल्या कामाला जा बघू!"     

ते गेले आणि आणि दोनच मिनिटांत रहीम आला. वेटिंग रूममध्येच सिस्टर्सनी त्याला घेरलं आणि सांगायला लागल्या, "रहीम, मन घट्ट कर, धीरानं घे...." रहीम म्हणाला, "काय बोलताय राबिया आंटी, माझी आजी आपला शब्द कधीही मोडणार नाही. तुम्ही रडताय कशाला? कमाल आहे. लोकांचा माझ्यावर विश्वासच नाही." असं बोलत बोलत तो आजीच्या बिछान्याजवळ गेला. मी पण तोपर्यंत तिथे पोहोचलो होतो. रहीमनं आजीच्या खांद्याखाली अलगद हात ठेऊन तिला जरासं उचललं आणि म्हणाला, "चल आजी. आपण जरा वेटिंग रूममध्ये जाऊ. इथे फार कोंदटल्यासारखं होतंय." आणि काय आश्चर्य! त्या विझलेल्या डोळ्यात चमक आली, खोल गेलेले गाल जरासे हलले आणि क्षीण आवाजात दोन शब्द ऐकू आले, "चल बाळा."  दुसऱ्या क्षणाला ती शंभर वर्षांची आजी रहीमच्या आधारानं वेटिंग रूममध्ये चालली होती!

सगळे डॉक्टर्स, सिस्टर्स  आणि मी स्तंभित होऊन ते पाहात राहिलो!

शाप

तिन्हीसांजेच्या संधिप्रकाशात एक कृश आणि अतिजिर्णं असा वृद्ध वटवृक्षाच्या  पारावर विसावलेला होता. 
पारावर एक लहानसे हनुमान मंदिर होते. 
दिव्याला नुकतीच तेलवात केलेली असावी.लोक येतजात होती. 
तितक्यात एका लहान मुलाला घेऊन मोठा जमाव तेथे आला. देवदर्शन करून 
त्यांनी तिथल्या लोकांना प्रसाद वाटला.  
या वृद्धाला प्रसाद देत एकजण म्हणाला, "आशीर्वाद द्यावा बाबा, घरी पुत्र जन्मला". 
"मी असा भणंग.. काय आशीर्वाद देणार?" वृद्ध उत्तरला.
"या मारूतीरायासारखा चिरंजीव हो म्हणा". 
वृद्धाच्या चेहर्‍यावर विलक्षण वेदना उमटली. अबोलपणे हात उंचावत त्याने मनोमन आशीर्वाद दिला. 
सारेजण गेल्यानंतर, आपल्या मस्तकाचे जीर्ण-मलिन वस्त्रं सोडवून, तिथल्या दिव्याचे तेल कपाळावरील जखमेला लावत म्हणाला.. 
"देवा चिरंजीवित्वाचा शाप भोगणारा, मी शेवटचाच असू दे.."  

पाच वाजता

   शेवटची पंगत अडीचला संपली. मी या शेवटच्याच पंगतीत होतो. माझे जेवण जास्त झाले. तसे लग्नातले माझे जेवण नेहमीच जास्त होते. दर रविवारी कोणाचे तरी लग्न असायला पाहिजे असे मला नेहमी वाटते. मी वरपक्षाच्या खोलीत आलो आणि लवंडलो. झोप येत होती पण चष्मिस किरणने लागूच दिली नाही.  गावाकडच्या गोष्टी सांगून तो मला रिझवायचा प्रयत्न करत होता. मी हं हं करत होतो. सांगता सांगता तो कधीतरी सटकला. मलाही डोळा लागला. केव्हातरी अर्धवट झोपेत मिहीर, मुक्ता येऊन मला उठवायचा प्रयत्न करून गेले. 
    चारच्या सुमारास डोळे उघडले. चहा कधी येणार, अशी कुजबूज सुरु झाली होती. कपांचा किणकिणाट ऐकू येत होता पण चहा दिसत नव्हता. या खोलीत जवळचे नातेवाईक तेवढे दिसत होते. बाकीचे पहिल्या दुसऱ्या पंगतीनंतर घरी गेले होते. या खोलीत कुणी झोपले होते, कुणी बाहेर चक्कर टाकायला गेले होते. कुणी नुसतेच जांभया देत होते. मी  बाहेर आलो. बेसिनवर जाऊन तोंडावर पाणी मारले. तेवढ्यात रोहनने मला पकडले. या रोहनला त्याच्या आईने माझ्यावर सकाळपासून सोडलेले होते. दर तासाला त्याच्या मनगटावरचा एक दोरा तरी सुटतो किंवा त्याचा करगोटा तरी तुटतो. तसे झाले की, त्याची आई त्याला माझ्याकडे घेऊन येते. मी त्याचा तो तुटलेला संसार बांधू लागलो. इथून वधूपक्ष खोलीच्या आत जे बोलणे चालले होते, ते पुसट पुसट ऐकू येत होते. मागून प्राजक्ताचा आवाज आला. हिच्याशी माझी आता चांगलीच मैत्री झाली आहे. लग्नात ओळख झाली. नात्यातलीच निघाली. काही जण म्हणतात, लांबून बहीण लागते. संजयदादाने नवी बाईक घेतली आहे आणि त्याने ती आणली आहे, हे सांगायला ती आली होती. एकदम भारी आहे, असे म्हणाली. मी तिच्याबरोबर कार्यालयाच्या खाली गेलो. तिथे मिहीर, मुक्ताही होते. मिहीर, मुक्ताशी आम्ही सकाळी लग्न लागायच्या आधी कार्यालयाखालीच थोडावेळ पकडापकडी खेळलो. फार मजा आली. संजयदादा त्याच्या भावांना बाईकबद्दल सांगत होता. आम्ही पण त्याची बाईक सगळीकडून पाहून घेतली. ‘वा, संजूदादा, आता शायनिंग ना...’ असे बरेच म्हणून झाले. तेवढ्यात मिहीरने बातमी काढली – अजून काही विडे शिल्लक राहिले आहेत. आम्ही पुन्हा वर पळालो. मला जीन्समुळे नीट पळता आले नाही. ही जीन्स तशी मी फार वेळा घालत नाही. दोनच महिन्यांपूर्वी घेतली आहे. सगळ्यांनी हळूच एक एक विडा खाऊन घेतला. लाल तोंडांनी आमची चहाडी केलीच. लगेच वंदूआत्याने प्रत्येकी एक धपाटा घातला. वंदनाआत्याला आम्ही वंदूआत्या म्हणतो. "आत्या, तुला आम्ही वंदू. तुला आम्ही वंदू" असे म्हणत तिची चेष्टा करतो. मग तीही, "अरे पाया पडायला लावीन तुम्हाला, नुसते वंदू नका मला." असे गंमतीत म्हणते. ' ए चला, चहा आला..' असे म्हणत कोणीतरी आले. दोन्ही पक्षांच्या खोलीतून सगळे बाहेर पडले. सगळ्या लोकांनी चहा प्यायला आणि काहींनी दोनवेळा प्यायला. हे जे काही लोक होते, त्यांना मी मागच्या एका लग्नातसुध्दा दोनदा चहा पिताना पाहिले होते. काहींनी बिनधास्तपणे दोनदा मागितला, काहींनी गुपचूप. मलाही दोनदा प्यायचा होता पण मी हल्ली तसे करत नाही. दुसऱ्यांदा घेताना कोणीतरी बघते आणि म्हणते, ‘दोनदा दोनदा ! अजून वेळ आहे तुला एवढा चहा प्यायला.’ पुन्हा सगळा वधूपक्ष घोळक्याने खोलीत गेला. नवऱ्यामुलीला तिघींनी ' घेतलास का गं चहा ’ असे विचारले होते.
     तिच्या चेहऱ्यावर आता सकाळचा रंग नव्हता. बाहरेची उन्हे हळूहळू कलत चालली होती.
     तितक्यात ‘गाडी आली, गाडी आली’ असा ओरडा झाला. नवरा-नवरीला नेण्यासाठी एक खास गाडी असते, तीच बहुतेक. मागच्या एका लग्नातही अशीच एक गाडी होती. या गाडीवर नेहमीच गुलाबाची फुले असतात. कोणीतरी ती छान सजवलेली असते. सजवणारा प्रत्येकजण वेगवेगळ्या पध्दतीने सजवतो. मला असलीच एखादी गाडी गुलाब सोडून दुसऱ्याच काही फुलांनी सजवायची आहे. कोणते फूल शोभेल ? सजवायला काय कोणतेही फूल चालेल पण कोणालाही दुसरे फूल आवडणार नाही. गुलाबाची सवय झाली आहे सगळ्यांना. मी, प्राजक्ता, मुक्ता, मिहीर, चष्मीस किरण..आम्ही सगळे गाडी बघायला गेलो. हळूहळू एक एक बॅग दोन्ही बाजूंच्या खोल्यांमधून खाली येऊ लागली. मी परत वर गेलो. कार्यालयाचे व्यवस्थापक आणि वधूपक्षाच्या लोकांमधे काहीतरी बोलणे होत होते. एक एक जण तयार होऊन बाहेर पडू लागला होता. मी उगीच वरपक्ष खोलीत जाऊन डोकावले.  दोघे तिघेच होते आत. तेही निघण्याच्या तयारीत होते. मी पटकन बाहेर पळालो. मी असा खोलीत सापडलो की, कोणीतरी मला काहीतरी काम सांगते आणि ते मला अजिबात आवडत नाही. बहुतेक नातेवाईकांनी सकाळपासून माझी चौकशी केलेली होती. अशा वेळी एखादा कोणीतरी राहिलेला येतो आणि चौकशी करतो. आत्ताही असाच एक जण आला आणि खूप प्रश्न विचारले. लोकांची धावपळ चालली होती. ' काही विसरलं का बघा रे...' असे जवळजवळ प्रत्येकजण म्हणत होता. अगदी मोजकेच लोक इथे कार्यालयात राहिले होते. वरपक्षाचे काही आणि वधूपक्षाचे काही. संपूर्ण दिवसभर त्या वधूपक्षाच्या खोलीतले आवाज मोठे असतात. संध्याकाळी मात्र ऐकू येईनासे होतात. संध्याकाळी त्या खोलीचे काहीतरी वेगळे होते. नवरीमुलगी  बाहेर आलेली होती आणि एका घोळक्यात थांबलेली होती. कुणाच्या तरी खांद्यावर तिचे डोके होते. भोवताली चार-पाच बायका होत्या. बरेच रुमाल पर्सेसमधून बाहेर पडलेले होते. कार्यालयातल्या जेवायला वाढणाऱ्या बायका, झाडणारे मुलगे सगळे पाहात होते. त्यांना जवळजवळ रोजच हे दृष्य पाहावे लागते तरीसुध्दा दर संध्याकाळी तितक्याच तन्मयतेने ते हे दृष्य पाहात असतात, याचे मला नेहमी आश्चर्य वाटते. 
    "वरद, काय बघतोस ?" मी जवळ आलेल्या प्राजक्ताकडे पाहिले. 
     कोणास ठाउक, किती वेळ मी पाहात होतो. मलाही आईची हाक ऐकू आली. जाण्यापूर्वी मी त्या रिकाम्या कार्यालयातल्या जमिनींकडे पाहिले. अक्षता, फुले, दोरे असे पसरले होते. भिंतीवरच्या घड्याळात पाच वाजायला काही वेळच बाकी होता. खाली आलो. गाडीत सगळे आपापल्या जागा पटकावून बसले होते. नवरी मुलगी म्हणजे माझ्याच एका भावाची बायको. माझी वहिनी. आज त्याचे तिच्याशी लग्न झाले. ती खाली आली. ते दोघे त्या गुलाबाच्या गाडीत बसले. ती आता काचेच्या आत होती आणि तिच्या माहेरचे लोक काचेबाहेर. ते सगळे चूपचाप पाहात होते. मी इकडचा होतो तरीही मला त्या  लोकांकडे पाहून  कसेतरी झाले. इकडचेही दिवसभर खिदळणारे लोक आत्ता शांतपणे पाहात होते. सकाळी नाश्त्यापासून संध्याकाळचा चहा घेईपर्यंत लग्नाला आलेले सर्व लोक आनंदात असतात. त्यापैकी काही लोक पाच वाजता दुःखी होतात. एरवीही पाच वाजतात पण कार्यालयात वाजलेले पाच फार चमत्कारिक असतात. यावेळी कार्यालय सोडावे लागते आणि ही लग्न झालेली मुलगी जुन्या लोकांना सोडून काही नव्या लोकांबरोबर चाललेली असते.  
     "काय वरद, तुमच्या वर्गात मुलीबिली आहेत की नाही"
     "असणार, असणार."
     " असल्या तरी तो थोडीच सांगणार आहे तुम्हाला ?"
     गाडीत सगळ्यांनी माझी चेष्टा करायला सुरुवात केली.
     आईने सगळ्यांना दटावले, "ए, चावटपणा बास करा रे. इतक्यात काहीही शिकवू नका त्याला, आत्ता कुठे तो नववीत गेलाय."   
     काही मिनिटातच गाड्या सुटणार होत्या. सहा वाजता कार्यालय बंद होणार होते. आणखी काही दिवसांनी पुन्हा एक लग्न होणार होते आणि त्याही दिवशी संध्याकाळचे पाच वाजणार होते.  

बंध

    दा वाजलं म्हणून काकूनं दार उघडलं. समोर साठ पासष्ट वय असणारी एक व्यक्ती उभी होती.
"ओळखलंस का मालती काकू? " तो हसून म्हणाला.
कापऱ्या हातानं काकूनं चष्मा लावला. पाठीचा कणा वाकल्यामुळे तिला त्याच्या उंच देहाकडे नीट बघतासुद्धा येत नव्हतं. तिनी नकारार्थी मान हालवली.
"काकू, मी शरद.. शरद सगरे, साताऱ्यात होतो तुमच्याकडे तीन वर्ष.. आता तरी आठवतंय का काही? "
काकूच्या डोक्यातल्या आठवणींची धावपळ सुरू झाली. 'शरद सगरे' हे नाव आज खूप वर्षांनी कानावर पडलं होतं, आणि फक्त नाव नव्हे तर साक्षात ती व्यक्ती समोर उभी होती. इतक्या वर्षात घडलेल्या अनेक गोष्टी बाजूला करून काकूच्या डोक्यात शरदच्या आठवणी वर यायला लागल्या.

    "ज्योती अग अशी का करतीयेस? काय होतंय तुला.. झपाटलं की काय तुला कोणी.. शरद.. शरद.. अरे हे बघ ना ज्योती कसं करतीये.. बघ ना डोळे पांढरे करतीये.....   "
    काकूची किंकाळी कानावर पडताच शरद हातातलं पुस्तक टाकून धावत खाली आला. ज्योती वेड लागल्यासारखं करत होती. काकूला मारत होती.. डोळे फिरवत होती.. वेडी वाकडी तोंडं करत होती.. शरदला काही क्षण काय सुरू आहे ते कळेना. त्यानं पटकन भैय्याला मदतीला बोलावलं. रिक्षा बोलावली आणि ज्योतीला घेऊन ते थेट हॉस्पिटल मध्ये निघाले.
    ज्योतीला स्ट्रेचरवर झोपवून एका खोलीत नेण्यात आलं. तिला चार सेवकांनी घट्ट धरून ठेवलं होतं. दार बंद झालं तरी तिचा आरडा ओरडा आणि किंकाळ्या बाहेरपर्यंत ऐकू येत होत्या.
शरद, काकूच्या शेजारी बसून तिचे हुंदके झेलत होता. तिच्या डोक्यावरून हात फिरवत "सगळं नीट होईल, देव सगळं नीट करेल" असा आधार देत होता.  नानांना कळवण्यासाठी भैय्या हॉस्पिटलच्या बाहेर पडला होता.
काही वेळानं आतून येणारा ज्योतीचा आवाज शांत झाला. बहुदा डॉक्टरांनी तिला झोपेचं इंजेक्शन दिलं असावं. त्यानंतर डॉक्टर बाहेर आले.
    "त्यांच्या आताच्या स्थितीवरून असं दिसतंय की त्यांच्या डोक्यात ताप गेला आहे.. परिस्थिती गंभीर आहे. परिणाम मेंदूवर झाला आहे.. तातडीनं काही अद्ययावत चाचण्या आणि उपचार करावे लागतील, जे आपल्या इथे होऊ शकत नाही... आजच्या आज त्यांना पुण्यात ससूनला हालवावं लागेल किंवा जमत असेल तर तिकडच्याच एखाद्या चांगल्या खासगी रुग्णालयात.. "
"ससून ठीक आहे.. मी बघतो कसं करायचं ते " शरदने लगेच हालचाली करायला सुरुवात केली.
काही वेळात नाना हॉस्पिटलामध्ये  पोचले. शरदने घडलेलं सगळं नानांना सांगितलं. दोघांनी ज्योतीला पुण्यात हालवण्याची खटपट सुरू केली.
काकूला नक्की काय चाललंय तेच कळत नव्हतं. ती तर हे ऐकण्याच्या स्थितीतच नव्हती.
    ज्योतीवर ससूनमध्ये उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी अठ्ठेचाळीस तासांची मुदत दिली. तातडीनं सर्व नातेवाइकांना तार पाठवून, शक्य असेल तिथे फोन करून बोलावून घेतलं गेलं.
देवाच्या कृपेने तिसऱ्या दिवशी ज्योतीने उपचाराला सकारात्मक प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. तिनी डोळे उघडले. आई नानांना तिनी ओळखलं. सर्वांना हायसं वाटलं.
आज आठवडा झाला. ज्योती बरी झाली खरी, पण पूर्णता: नाही. त्या आजारपणाचा तिच्या मेंदूवर परिणाम झाला. ती एखाद्या लहान मुलासारखं वागत होती. बालिश वागत होती. हट्ट करत होती, लाडात येत होती.. आधीची ज्योती आणि आताची ज्योती.. प्रचंड तफावत होती. तिचं ते लहान मुलासारखं वागणं सर्वांनाच खूप विचित्र वाटत होतं.
नाना आणि काकू ज्योतीला आयुष्यभर सांभाळायची मनाशी तयारी करत होते. शरद सुन्न झाला होता. त्याचं काळीज क्षणाक्षणाला भरडून निघत होतं.
    काही दिवस उलटून गेले. ज्योतीला घरी आणलं. ती घरात रुळली. सर्वांना तिच्यामधल्या बदलाची सवय झाली. शरद तिच्याशी खूप गप्पा मारायचा. खूप मजा आणि जमतील तसे लाड करायचा. मग वरच्या खोलीत जाऊन मनातल्या मनात कुढत बसायचा. देवाला दोष देत बसायचा. असं का झालं ह्याचं कारण शोधायचा प्रयत्न करायचा. हाती काहीच लागायचं नाही. मग अश्रूंना वाट मोकळी करून द्यायचा. कित्येक दिवस असंच चालू होतं.
    एक दिवस त्यानं ठरवलं.
    "नाना...   काकू.. येत्या सोमवारी मी निघतोय पुण्याला.. तिकडे जाऊन सैनिक भरतीची परीक्षा असते त्याला नाव देतोय माझं. आता इथून पुढे तिकडेच राहीन मित्राबरोबर. जमेल तशी सातारला चक्कर मारेनच "
    "शरद अरे सांगतोयस काय? असं अचानक निघालास?? आम्हाला थोड्याआधी कल्पना द्यायचीस.. आणि पदवी परीक्षा झाली का तुझी? मध्येच सैनिक भरती कुठून आली? "
    "एक पेपर राहिलाय माझा. बघू ऑक्टोबर मध्ये देऊन जाईन.. त्यात काय.. थोडा अभ्यास कमी पडला ह्या वेळेस त्यामुळे राहिला.. " शरद हसत म्हणाला आणि त्यानंतर त्यानं जमेल तसं विषयांतर केलं.
नाना आणि काकू दोघांना धक्का बसला होता.. खरंतर त्याच्या शिक्षणाच्या काळजीपेक्षा त्यांना शरद आपल्याबरोबर नसणार ह्याच गोष्टीची खंत वाटत होती. गेल्या तीन वर्षात शरदच्या आपल्या आजूबाजूला असण्याची सवय झाली होती. त्याचा एक आधार वाटायचा. त्यांना शरद अगदी मुलासारखा होता. त्यानं दोघांना खूप लळा लावला. काकू आणि नानांनी सुद्धा तितकंच प्रेम केलं त्याच्यावर.
    आता तो ही चालला.
सोमवारी सकाळी शरद ट्रंका आणि त्याहून हजारपट जड अंत:करण घेऊन खाली उतरला. नानांना आणि काकूला नमस्कार केला. ज्योती शेजारीच हसत उभी होती. पुण्यावरून मला खाऊ आण असं त्याला म्हणत होती. शरदचे डोळे पाणावले होते. त्यानं लवकरात लवकर तिथून काढता पाय घेतला.
रिक्शातून निघताना त्याची नजर फक्त ज्योतीवर खिळली होती.

        काही दिवसांनी काकू वरच्या खोलीत आवारावर करत होती. तिची नजर दारामागे चिकटवलेल्या एका कागदाकडे गेली. ते वेळापत्रक होतं. शरदच्या पदवी परीक्षेचं ! काकूनं त्यावरून नजर घातली. शेवटच्या पेपरच्या तारखेनं तिचं लक्ष वेधून घेतलं. ह्याच दिवशी ज्योतीला हॉस्पिटल मध्ये आणि तिकडून पुण्याला हालवण्यात आलेलं. शरद संपूर्ण दिवस आपल्यासोबत होता. त्या नादात त्यानं त्याचा शेवटचा पेपर दिलाच नाही...
काकूच्या मनाला ही गोष्ट समजली आणि तिचे डोळे क्षणार्धात पाणावले. पापण्या घट्ट मिटल्या गेल्या. त्यांचा बांध तोडून डोळ्यातल्या पाण्यानं वाट शोधली.
    तिच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडला.. "शरद... "

    किती मोठा झालास रे.. मोठा काय... म्हातारा झालायस.. तेव्हा गेलास तो आलाच नाहीस परत.. आज इतक्या वर्षांनी ह्या म्हातारीची आठवण आली होय रे.... ये आत ये.. बैस.. "
पलीकडेच बसलेली ज्योती कुतूहलानं त्याच्याकडे बघत होती. ह्या व्यक्तीला कुठेतरी पाहिलं आहे आणि ह्याचा आवाज ऐकला आहे इतकंच तिला कळत होतं. 
तिच्या नजरेत बघून शरदनं पिशवीतून आंबा बर्फीचा बॉक्स काढून ज्योतीला दिला आणि तिच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आनंदात तो हरवून गेला....