Saturday 24 October 2015

एक फुल कोमेजलेलं.........

एक फुल कोमेजलेलं.........

हि एक हळूवार प्रेमकथा तर आहेच पण सोबतच सध्याच्या
एका ज्वलंत सामाजिक प्रश्नावरही भाष्य करून जाते.
मुंबईच्या धावपळीचा बसचा प्रवास म्हणजे
एक मोठं दिव्यंच!! त्यात वरूणचा आज पहिला दिवस होता
बसच्या प्रवासाचा !! प्रवाश्यांनी खचाखच भरलेल्या
बसमधे तो चढला. बसमधे बसण्यासाठी जागा मिळेल हि
अपेक्षा करणंच चुकिचं होतं, म्हणून तो हँडलला पकडून
उभा राहिला.
वरूण मुळचा नाशिकचा पण आता नोकरीसाठी त्याची
मुंबईला आला होता. मुंबईतल्याच एका नामांकित कंपनीत
एका चांगल्या हूद्यावर त्याची नियुक्ती झाली होती.
आणि आज त्याचा पहिला दिवस होता. त्याला अंधेरीला
उतरायचं होतं. कसाबसा गर्दीत उभा राहून तो स्वत:ला
सांभाळण्याचा प्रयत्न करत होता, इतक्यात मागून
त्याला एक आवाज ऐकू आला.
"excuse mi !!! आता जर का तुझ्या हातांनी limits
cross केले तर बघंच!! खुप महागात पडेल" एक साधारण
२६-२७ वर्षाची तरूणी तिच्या मागे उभ्या असलेल्या
तरूणाला दरडावत होती. तो तिची छेड काढत होता बहूतेक
.... हे पाहून वरूणलाही थोडा राग आला व तो त्या मुलाला
म्हणाला, "lediesची रिस्पेक्ट करता येत नसेल तर किमान
त्यांचा अपमान तरी करू नका!!"
यावर तो तरूण वरमून मागे सरकुन उभा राहिला.
"thanx ..... पण हा माझा प्रॉब्लेम आहे मी स्वतः हँडल
करीन प्लीज तुम्ही यात पडू नका!! " ती तरूणी म्हणाली.
तिचं बोलणं वरूणला थोडं विचित्रच वाटलं 'अजीब आहे
यार!!! स्त्री दाक्षिण्य म्हणून हिच्या बाजूने बोललो तर
हिने मलाच लेक्चर दिलं' वरूण मनातल्या मनात बोलला.
पण त्याची नजर वारंवार तिला पाहण्यासाठी धडपडत
होती, चोरट्या नजरेनेच का होईना पण तो तिला
पाहण्याचा प्रयत्न करत होता. गडद निळ्या जिन्सवर
हलक्या पिवळ्या रंगाचा कुर्ता डाव्या खांद्यावर लाल
रंगाची बॅग, पिवळ्या क्लिपने अर्धे केस बांधलेले, तरपकिरी
रंगाच्या टपो-या डोळे काजळाच्या हलक्या रेषेनेही
आकर्षक दिसत होते. पण कपाळावर उजव्या बाजूला मात्र
कसलीतरी जखमेची खूण होती. पण डोळ्यातल्या
काजळाव्यतीरिक्त कसलाच मेकअप तिच्या चेह-यावर
नव्हता. इतक्यात केसांची एक बट तिच्या चेह-यावर आली
आणि आपल्या नाजूक बोटांनी त्यांना बाजूला करत होती व
त्या हाताखालून तिचा खोचक कटाक्ष वरूणकडे गेला.
"आता तुम्ही का असे एकटक पाहताय!! " तिने नाराजीने
विचारलं, तशी वरूणने खाली मान घातली. यावर तो काही
बोलणार इतक्यात कंडक्टरने बेल वाजवली "अंधेरी कोण?
उतरा लवकर चला चला." मागे वळून ती
तरूणी उतरली, तिच्या मागोमाग वरूणही उतरला. जाता
जाता तिच्या तोंडून "idiot!! " हि उपाधी त्याच्या
कानावर पडल्याशिवाय राहिली नाही. यावर वरूण
कमालीचा अचंबीत झाला होता, पण तिची नजर मात्र
त्याला कुठेतरी मनात खोलवर टोचली होती.
ऑफिसमधे पोहोचताच वरूण बॉसच्या कॅबीनमधे गेला. मग
काहि वेळाने बॉस त्याला घेऊन ऑफिसच्या स्टाफकडे गेले.
आणि वरूणची ओळख करून देत म्हणाले,
"डिअर स्टाफ, हे मि. वरूण देशमुख आजपासून हे तुमच्या
टिमचे हे हेड आहेत, I hope यांच्या guidance ने तुम्ही
आणखी प्रभावीपणे आणि एकत्र काम कराल! "
अचानक वरूणची नजर स्टाफमधे उभी असलेल्या एका
तरूणीकडे गेली, हि तर तीच होती.... जी त्याला बसमधे
भेटली होती. पण तिने मात्र त्याला पाहून नजर खाली
घातली. त्यानंतर बॉस निघून गेले. मग वरूण स्टाफजवळ
गेला आणी म्हणाला, "guys!!! मी तुमचा हेड आहे हे
विसरून जा आणि मोकळेपणाने तुमच्या ideas माझ्याशी
शेअर करा, काही प्रॉब्लेम्स असतील तर तेही शेअर करा
ok!! सर्वात आधी मला तुमच्या सर्वांचं introduction
द्या " सगळ्यांचं intro घेतल्यानंतर त्याला कळलं कि तिचं
नाव 'निधी' होतं. एकंदरीत ऑफिसमधल्या सर्वांनाच
वरूणचा स्वभाव व काम करण्याची पद्धत फार आवडली.
संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर सर्वजण निघून गेले. निधी
व तिची मैत्रिण दिपालीही निघतच होत्या कि वरूण ने
त्यांना थांबायला सांगितले.
मग निधीला तो म्हणाला, "मिस. निधी तुमच्या जुन्या
हेडची work staterji काय होती ते जरा मला सांगशील
का?" तीने काहीच उत्तर दिले नाही यावर तिची मैत्रीण
म्हणाली." निधी खुप हूशार आहे, आधीच्या सरांची तिने
खुप मदत केलीय. हि बघा फाईल!! " वरूणने ती फाईल
घेतली मग निधी दिपालीला बाहेर खेचतच घेऊन गेली आणि
म्हणाली, "अगं पागल!! हा तोच आहे ज्याला सकाळी मी
ओरडले होते."
इकडे वरूण एक एक करून त्या फाईलीची पानं चाळू लागला.
तिकडे कॉरीडोअरमधून निधी त्याला पहात उभी होती.
हळूहळू वरूण ऑफिसमधे ब-यापैकी रूळला होता.
ऑफिसच्या स्टफचा तो आवडता झाला होता आणि त्याचे
बॉसही त्याच्या कामावर खुश होते शिवाय निधीच्या.....
ती शक्यतो त्याच्यापासून दूर रहायची.जणू ती त्याला
टाळायचा प्रयत्न करत होती. हाक मारतानाही ती त्याला
इतरांप्रमाणे 'वरूण' न म्हणता मि. देशमुख म्हणायची,
त्यावेळी त्याला तिचं बोलणं असं खुप खोचक वाटायचं,
नेमकी तिची हिच गोष्ट वरूणला खटकायची.
एक दिवस निधी वरूणच्या कॅबीनमधे आली आणि म्हणाली,
"मि. देशमुख!! "
" निधी!! तु इथे ? ...काही काम...." वरूण म्हणाला.
"मि. देशमुख ..... त्या दिवशी ...... बसमधे मी तुम्हाला
rudely बोलले त्याबद्दल खरंच I'm really very sorry
" ती म्हणाली.
"It's ok निधी... तु plz sorry म्हणू नकोस ... मी तर
कधीच त्या गोष्टिला विसरलोय " तो म्हणाला.
"तरीपण .... मला असं बोलायला नको होतं" निधी
"निधी ..... plz no sorry " वरूण म्हणाला.
त्यानंतर निधी तिथून निघून गेली.
वरूणला ऑफिस जॉइन करून आता ८ महिने झाले होते, पण
त्या दिवसा व्यतीरिक्त पुन्हा त्या दोघांमधे कधीच बोलणं
झालं नाही. निधी, वरूणकडे नेहमी अनोळखी
असल्यासारखी बघायची. काही काम असेल तरच
तेवढ्यापुरतं बोलून निघून जायची, याच गोष्टीचं त्याला
वाईट वाटायचं. वरूणप्रमाणेच निधीही ऑफिसमधे सर्वांची
feourite होती
एकदा वरूण काही कामानिमित्त निधीच्या समोरच्या
टेबलवरच्या स्टाफकडे गेला त्याचवेळी दिपालीने निधीकडे
वेगळ्याच नजरेने पाहिले आणि हळूच तिला कोपराने
खुणावले. हि गोष्ट वरूणच्या नजरेतून सुटली नाही. पण
त्याने बघून न बघीतल्यासारखे केले. त्याने अनेकवेळा
दिपालीला तसं करताना पाहिलं होतं. त्या या गोष्टीची
गंम्मत वाटायची.
एक दिवस ऑफिसच्या कँटिनमधे वरूण चहा घेत होता.
दिपालीही तेव्हा तिथे चहा घेण्यासाठी आली होती. तिला
पाहून वरूण उठून तिच्या टेबलजवळ गेला.
"hi दिपाली can I join you?" तो म्हणाला.
"ohh! वरूण तू .. plz have sit" दिपाली हसून म्हणाली.
"हम्म्म..... काय मग कसं चाललंय तुझं काम?" तो
म्हणाला.
"एकदम छान..... त्यात तू उत्तम सर्वांना सांभाळून
घेतोस त्यामुळे काहिच टेन्शन नाही येत" दिपाली
म्हणाली.
"तुझी मैत्रीण निधी नाही आज बरोबर तुझ्या "
निधीबद्दल काही जाणून घेण्याच्या उद्देशाने तो
म्हणाला.
"नाही अरे.... तिला थोडं काम होतं so..... ती ऑफिसमधेच
थांबलीय.. "दिपाली म्हणाली.
इतके दिवस मनात चाललेली घालमेल त्याला आज
संपवायची होती म्हणून तो म्हणाला, " दिपाली!! मला
तुझ्याशी निधीबद्दल थोडं बोलायचंय..... ती का वागते
अशी माझ्याशी ...... म्हणजे अशी तुटक तुटक ...."
त्याचं बोलणं ऐकून आता दिपालीही थोडी गंभीर झाली
कारण तिला याचं कारण माहित होतं तरीही उसनं हसू चेह-
यावर आणत ती म्हणाली," वरूण!! निधी माझी
कॉलेजपासूनची मैत्रीण आहे ... एकदम Best Freind ...
त्यानंतर माझं लग्न ठरलं आणि आम्ही वेगळ्या झालो .....
पण तरीही इतक्या वर्षांनी आजही आम्ही एकत्र
आहोत.खुप छान स्वभाव आहे तिचा!! " दिपाली म्हणाली.
"मग ती माझ्याशीच अशी का वागते?..... ऑफिसमधेही
सर्वांशी बोलते पण मग माझ्याशीच का मोकळेपणाने बोलत
नाही ती?" वरूण म्हणाला.
"वरूण तिचा स्वभाव मुळात असा नाहिये रे.....बाहेरच्या
जगात तर तीसुद्धा मोकळा श्वास घ्यायला आसुसते रे
पण....... भुतकाळाच्या आठवणी तिला तसं नाही करू
देत..... जणू काही त्या आठवणी तिच्या पायातल्या
बेड्याच बनून राहिल्यात...." दिपाली उदास होऊन
म्हणाली.
"म्हणजे मला काही कळलं नाही .. दिपाली.... काय असं
काय घडलंय तिच्या आयुष्यात?" वरूण काळजीने म्हणाला.
"सॉरी वरूण तिच्याबद्दल यापेक्षा आणखी जास्त काही
मी नाही सांगू शकत तुला... मला माहित आहे वरूण तू
तिला पसंत करतोस.... पण प्लिज... जमलं तर विसरून जा
तिला " आणि बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला अन् ती
तिथून उठून निघून गेली.
वरूणला काहीच कळेना कि काय झालं असावं निधीच्या
आयुष्यात..... तो पुरता गोंधळून गेला होता.
एक दिवस वरूण त्याच्या केबीनमधून बाहेर आला असता
समोर त्याला निधी उभी असलेली दिसली, तिने जांभळ्या
रंगाचा पंजाबीसूट घातला होता, फारंच गोड दिसत होती
ती....
"निधी तू?.... काही काम होतं का? " त्याने विचारलं.
"हो......या फाईलमधे काही doubts होते ते clear करायचे
होते " निधी
"ठिक आहे चालेल , तु हो पुढे मी आलोच बॉसशी थोडं
बोलून " वरूण म्हणाला आणि तो बॉसच्या केबीनकडे निघून
गेला. थोड्या वेळाने बाहेर आला तर निधी अजूनही तिथेच
उभी होती. मग दोघेही त्याच्या केबीनमधे गेले, काम करता
करता वेळ कसा निघून गेला, कळलंच नाही. अजुनही थोडं
काम बाकी होतंच, इतक्यात lunchtime ही झाला होता.
शेवटी वरूणच्याच आग्रहाखातर निधी त्याच्याबरोबर
कँटिनमधे गेली. आज शनिवार असल्यामुळे कँटिनमधे जास्त
गर्दीही नव्हती. एक मोकळा टेबल बघून दोघेही तिथे
बसले. बसल्यानंतर काहीवेळ कुणीच काही बोललं नाही,
शेवटी
"कामात वेळ कसा निघून गेला कळलंच नाही ना? निधी "
काहीतरी बोलायचं म्हणून वरूणनेच सुरवात केली.
"हम्म.... आता काही प्रॉब्लेम नाहिये " निधी म्हणाली.
न रहावून वरूण म्हणाला, " निधी!! तुझ्या डोळ्याजवळ हि
खुन कसली गं? काही लागली होतं का तुला?"
हे ऐकताच निधी बावरली, तिला खरं तर वरूणला सगळं
काही सांगायचं होतं पण अचानक तिने वेटरला हाक मारली,
"वेटर!! एक प्लेट फ्राइड राइस? आणि तूम्ही काय घेणार?
" तिने वरूणला विचारलं
"हो मी ही ऑर्डर करतो पण एका अटीवर..... तु मला
'तुम्ही' न म्हणता 'तू' म्हणालीस तरच " वरूण हसून
म्हणाला.
"ok .... तू काय घेणार?" तिने पुन्हा विचारलं.
"माझीही same order " वरूण म्हणाला.
ऑर्डर आल्यानंतर दोघांनीही लंच केला. नंतर दोघेही
कँटिन बाहेर पडले.
इतक्यात वरूण म्हणाला, " थांब निधी!! मला तुझ्याशी
आणखी थोडं काही बोलायचं आहे ..."
तशी निधी जागेवरच थांबली आणि मागे वळून तिने
त्याच्याकडे पाहिलं अन् म्हणाली, "माझ्याशी? .......
काय?"
"निधी मला तुझ्याविषयी जाणून घ्यायचंय .... तू का अशी
तुटक तुटक वागतेस माझ्याशी ? .... माझं काही चुकलंय
का? .... काही प्रॉब्लेम असेल सांग मला मन मोकळं कर
तुझं पण प्लिज अशी मनातल्या मनात कुढत राहू नकोस.."
वरूण म्हणाला.
आता निधीला त्याच्याशी बोलणं भाग होतं.... तिलाही
तिच्या मनाच्या होणा-या घुसमटीतून मोकळं व्हायचं होतं.
मग दोघेही एके ठिकाणी जाऊन बसले. एक लांब उसासा घेत
तिने सांगायला सुरवात केली त्यावेळी तिने ने जे काही
वरूणला सांगितलं वरूणने त्याचा स्वप्नातही विचार केला
नव्हता.
निधी म्हणाली," ४ वर्षापुर्वी .... म्हणजे २०११साली
...माझं लग्न ठरलं होतं ... वैभवशी.....माझा मित्रच
होता तो..... माझं त्याच्यावर प्रेम होतं अश्यातला भाग
नव्हता .... पण आमची खुप चांगली friendship होती.....
त्यामुळे त्याने जेव्हा मला लग्नाबद्दल विचारलं तेव्हा मी
कसलाही मागचापुढचा विचार करता त्याला होकार
दिला........ आमच्या घरच्यांनाही याबद्दल कळवण्यात
आलं..... माझ्या घरच्यांनाही तो आवडला....... मग पुढे
बोलणी होऊन आमच्या लग्नाची तारीखही ठरली.......
लग्न ठरल्यामुळे मीहि खुप आनंदात होते..... भावी
आयुष्याची स्वप्न रंगवू लागले होते......आमच्या लग्नाला
काहीच दिवस शिल्लक होते.... त्यामुळे एक दिवस मी
दिपालीला घेऊन माझ्या लग्नाची खरेदी करण्यासाठी
गेले..... आम्ही खुप खरेदी केली... साडी, दागिने,
बांगड्या... खरेदी करता करता कधी रात्र झाली कळलंच
नाही..... दिपालीलाही तिच्या घरून फोन आला होता आणि
माझ्याही .... त्यामुळे आम्ही दोघी खरेदी आटपून लगेच
निघालो..... रात्रीचे ८ वाजले होते....दिपालीची बस
आल्यामुळे नाइलाजाने तिला निघून जावं लागलं......आता
बसस्टॉपवर मी एकटीच सगळ सामान घेऊन उभी होते.....
तास दोन तास झाले तरी माझी बस यायचं नावंच घेत
नव्हती....... आता तर रात्रीचे १० वाजले होते, आणि
बसस्टॉपवरची गर्दीही हळूहळू कमी होऊ लागली होती....
मग मात्र माझा धीर खचू लागला. शेवटी नाईलाजाने मी
एका ऑटोरिक्षाने घरी जायचे ठरविले.......
म्हणून मी एका ऑटोवाल्याला थांबविले, " डोंबिवली
जाणार का?"
त्याने एकवार माझ्याकडे आणि माझ्या हातातील
सामानाकडे न्याहळून पाहिले. मग म्हणाला, " हा!! ....बैठो
अंदर!! "
मलाही त्याचं वागणं जरा विचित्रच वाटलं.... पण
माझ्यासमोर दुसरा पर्यायही नव्हता म्हणून मीसुद्धा
ऑटोमधे बसले, आणि ऑटो सुरू झाली, "कुठल्याही
परीस्थित मला घरी पोहोचायचं आहे बस्स एवढाच विचार
माझ्या डोक्यात सुरू होता." मनात तर प्रचंड धाकधूक सुरू
होती, काही अंतर पुढे गेल्यानंतर त्या ऑटोवाल्याने
अचानक ऑटो दुस-या रस्त्यावर वळवली आणि एका
निर्जन रस्त्याने ऑटो घेऊन जाऊ लागला..... हि गोष्ट
लगेच माझ्या लक्षात आली.... आणि मी त्याला ऑटो
थांबविण्यासाठी ओरडू लागले ...... पण त्याने माझं
काहिच न ऐकता रिक्षा आणखी वेगाने दामटवायला
सुरवात केली...... आता मात्र मला चांगलाच दरदरून घाम
फुटला..... मला काय कराव तेच सुचत नव्हतं .... भितीने
डोकं एकदम बधीर झाल्यासारखं वाटत होतं....... मला रडू
यायला लागलं होतं..... इतक्यात त्या ऑटोवाल्याने एका
निर्जन ठिकाणी ऑटो थांबवली आणि उतरून माझ्याजवळ
येऊन उभा राहिला...... मला ओरडायचं होतं पण गळ्यातून
आवाजच फुटत नव्हता...... एखाद्या भेदरलेल्या
सशासारखी माझी अवस्था झाली होती...... तो नराधम
मात्र क्रूरपणे माझ्याकडे पाहून हसत होता......... मग
त्याने कचकन माझा हाथ धरला आणि मला ऑटोबाहेर
खेचून काढलं व फरफटत मला तिथून लांब नेलं........ मी
त्याला खुप प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण.....
त्या नीच माणसापुढे माझा निभाव नाही लागला......
माझ्या डोळ्यांदेखत त्याने माझ्या अब्रूच्या चिंधड्या
चिंधड्या केल्या........ क्षणात माझ्या सगळ्या स्वप्नांचा
चक्काचूर झाला होता.... शरीर वेदनेने बधीर झालं
होतं..... " हे सांगत असतानाही निधीच्या डोळ्यांसमोर ती
रात्र व तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला होता.
आणि ते आठवून ती थरथर कापत होती.
"वरूण!!!! ४८ तास ..... मी त्या भयाण दहशतीच्या
छायेखाली घालवले.... दोन दिवसांनंतर त्या निर्जन
ठिकाणी पोलीसांना बेशुद्धावस्थेत मिळाली
होती.....माझ्यासकट माझ्या घरच्यांनाही ह्या घटनेचा
जबर धक्का बसला होता.....किमान महिनाभर मी माझ्या
आजूबाजूच्या लोकांपासून स्वतःला तोडून टाकलं होतं......
या दरम्यान वैभवने एकदाही माझी विचारपूस करण्यासाठी
मला कॉल केला नाही..... भेटायला येणं तर खुप लांबची
गोष्ट होती....... एक दिवस मात्र त्याने माझ्या घरी
फोन केला. माझ्याशी तर तो बोललाच नाही पण माझ्या
बाबांना मात्र म्हणाला कि, "मी निधीशी लग्न नाही करू
शकत"... जेव्हा माझ्या बाबांनी त्याला समजावण्याचा
प्रयत्न केला तर उलट त्याने रागाने असं म्हणून फोन ठेवून
दिला कि,"जी मुलगी स्वतःची इज्जत नाही वाचवू शकत,
स्वतःला सांभाळू नाही शकत ती घरातल्या जबाबदा-या
काय सांभाळणार, तिच्याशी लग्न करून उद्या मी
कुणाकुणाची तोंड बंद करू?"
आधीच्या भयानक प्रसंगातून मी अजून धड सावरलीही
नव्हती कि वैभवने हा दुसरा आघात माझ्यावर केला
होता....... मला स्वतःचीच लाज वाटू लागली होती.......
असं वाटत होतं कि संपवून टाकावं स्वतःला, नष्ट करून
टाकावं हे विटाळलेलं शरीर...... पण त्याही परीस्थितीत
माझ्या आई-वडिलांनी आणि दिपालीने मला धीर
दिला....... त्यावेळी जर या तिघांनी मला सावरलं नसतं
तर कदाचित आज मी जिवंतही राहिले नसते....... त्या
नीच नराधमाविरोधात मी कोर्टात लढा दिला....... त्याला
१० वर्षांची शिक्षा झाली...." निधीच्या डोळ्यातून
घळाघळा अश्रू वहात होते व तिच्या हातावर ठेवलेला
वरूणचा हात भिजवत होते....... .
"I'm rape victim वरूण!!! प्लिज मला विसरून जा......
मी तुझ्या लायक नाहिये रे.... माझ्या सुखांचा तर कधीच
अंत झालाय.......तुझ्या आयुष्यात अजून खुप सुखं यायची
आहेत...... ..... खरं तर मी तुझ्यापासून दूर जाण्यासाठी
पुढच्याच महिन्यात resign करू जाणार होते. " हे सगळं
ऐकून वरूणही हादरून गेला होता, नकळत त्याच्याही
डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. त्याच्याही मनात विचार
आला कि असे कसे पुरूष इतके निर्दयी असू शकतात, एक
म्हणजे तो तो नीच ऑटोवाला ज्याने स्वतःच्या वासनेपोटी
निधीचं आयुष्य बरबाद केलं आणि एक वैभव ज्याने
निधीवर आलेल्या संकटात तिची साथ सोडली व
लग्नाआधीच आलेल्या पहिल्या जबाबदारीपासून हाथ
झटकले." त्याला त्या दोघांचीही चीड आली.
आज निधीने आपलं मन वरूणसमोर मोकळं करू टाकलं होतं
ज्याच्यावर तीने गेल्या ८ महिन्यांपासून मनोमन खुप प्रेम
केलं होतं. काही क्षण शांततेत निघून गेले
मग वरूण स्वतःच तिला म्हणाला, "निधी चल आपल्याला
आता निघायला हवं खुप उशीर झालाय."
निधीला त्याचं हे वागणं आधीपासूनच अपेक्षित होतं.
दोघेहि आपापल्या मार्गाने निघून गेले. जाता वरूणने
कुणाला तरी कॉल केला.
त्या रात्री निधीही खुप रडली. न जानो गेल्या कित्येक
दिवसांपासून तिने हे अश्रू डोळ्यांत साठवून ठेवले होते.
दुस-या दिवशी निधी नेहमीप्रमाणे ऑफिसला आली. तिला
वरूण कुठेच दिसला नाही, इतक्यात तिला दिपालीचा कॉल
आला, "निधी कुठेयस तू? ..... लवकर मला बिल्डिंगखाली
येऊन भेट!! "
"अगं पण का? ... काय काम आहे?" निधीने विचारलं.
"तू जास्त प्रश्न करू नकोस गं .... प्लिज लवकर ये खाली
" दिपाली म्हणाली आणि तिने फोन ठेवून दिला.
निधी तिला भेटायला ऑफिसमधून बाहेर गेली. समोर
दिपाली दिसताच ती म्हणाली, "हं... बोल का इतक्या
घाईने बोलावलंस मला?"
दिपाली तिला म्हणाली, "१मिनट थांब!!", "वरूण!! " तिने
मागे वळून हाक मारली. तसा वरूण निधीसमोर येऊन उभा
राहिला. आणि दिपाली तिथून हसून निघून गेली.
"वरूण तू?... काय चाल्लंय हे सगळं?" निधीने गोंधळून
विचारलं.
"निधी!! .... तुझ्या बाबतीत जे काही घडून गेलं त्यात तुझा
काहीच दोष नव्हता..... U'r not a victim निधी , U'r a
Fighter ... या घटनेनंतर खचून न जाता स्वतःला न्याय
मिळवून देण्यासाठी तू कोर्टात लढा दिलास ...... अशी
हिंम्मत फार कमी मुली दाखवतात...... मला नेहमीच तुझा
अभिमान वाटेल निधी...... माझ्याशी लग्न करशील
का?....."
"काय?." निधी त्याच्याकडे आश्चर्याने पहातच राहिली.
"होय निधी!! ... खरंच विचारतेय मी तुला ... करशील
माझ्याशी लग्न?....... पण तू असं नको समजूस कि
तुझ्याशी लग्न करून मी तुझ्यावर उपकार करतोय .....उलट
तू माझ्याशी लग्ग केलंस तर मी स्वतःला भाग्यवान
समजेन.....माझं खरंच मनापासून खुप प्रेम आहे
तुझ्यावर..... आणि मला तुझ्यासारख्या शौर्यवान मुलीचा
नवरा म्हणवून घ्यायला नक्किच आवडेल." वरूण तिच्या
डोळ्यात पहात होता. आणि निधीच्या डोळ्यात आनंदाचे
अश्रू तरळले व तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं,
अश्रूंवाटे तिचं सगळं दुखं आज कायमचं वाहून चाललं होतं.
आणि दूर कुणाच्यातरी मोबाईलवर गाणं सुरू होतं :
मिला हू अब जो तुमसे, है दिल को मेरे कसम से सुकून
मिला....सुकून मिला
तुझे है पाया रब से, है दिल को मेरे कसम से सुकून
मिला....सुकून मिला
हर पल हसी सा हुआ है, सांसों को तुने छुवा है ,
बढी तुझसे नजदीकीया ...सुकून मिला......
या कथेवरून एक प्रश्न सतत मनात येत राहातो... तो हा
कि अशा घटनांमधे खरच ती मुलगी जबाबदर असते
का? ..... जर नाही ...... तर मग का? आपला समाज
अश्या मुलींचा स्वीकार करत नाही. का? त्यांना डावलून
आणि झिडकारून हा समाज मोकळा होतो?........ अश्या
घटनेनंतर मुली मानसिकरित्या पुर्णपणे खचून जातात,
त्यांना ख-या आधाराची, धीराची गरज असते त्यात
लोकांच्या अश्या मानसिकतमुळे त्या स्वतःलाच अपराधी
समजून एक तर मनातल्या मनात घुसमटत रहातात किंवा
कुणाच्या आधाराअभावी स्वतःला न्याय मिळवून
देण्याएवजी मृत्यूला कवटाळतात. दिवसेंदिवस अश्या
घटनांचं प्रमाण वाढंतच आहे. मी एकच विनंती या
समाजाला करीन कि अश्या मुलींना झिडकारू नका, त्यांचा
ताठ मानेने जगण्याचा अधिकार हिसकावून घेऊ नका.....
ज्या दिवशी मुलींकडे -स्त्रीयांकडे बघण्याची समाजाची
'नजर' व मानसिकता बदलेल त्या दिवशी आपल्या
समाजात कुठल्याच मुलीवर "निर्भया" होण्याची वेळ
येणार नाही. उलट तिला पाठबळ दिलंत तर तिही "निधी"
प्रमाणे अन्यायाविरूद्ध लढा दे स्वतःलः न्याय मिळवून
देऊ शकते.

No comments:

Post a Comment