Saturday 21 April 2012

लक्षात नसलेला बाप //

लक्षात नसलेला बाप //
वडील , बाबा , पप्पा , ड्याडी , पिता
लिहिण्याना बोलण्याला खूप चांगल वाटत
पण आपण प्रत्येक जन सहज पणे नेहमी
जाणूनबुजून शब्द उच्चारतो तो म्हणजे बाप
होय होय बाप .......
आई घराच मांगल्य असते तर बाप घराच अस्तित्व
पण घराच्या या अस्तित्वाला खरंच आपण समजून घेतले आहे का ?
वडिलांना महत्व असूनही त्यांच्या विषयी जास्त बोलले जात नाही,
लिहिले जात नाही. कोणतेही व्याख्यता त्याच्या विषयी जास्त बोलले जात नाही
लिहित नाही . पण कोणताही व्याख्यता आई विषयी केवळ बोलत राहतो . संत महात्म्यांनी
आईचच महत्व अधिक सांगितलेलं आहे . देवादिकांनी आईचेच तोंड भरून कौतुक केले आहे .
चांगल्या गोष्टीना आईचीच उपमा दिली जाते .पण बापाच्या विषयी फारस बोलल जात नाही .
काही लोकांनी बाप रेखाटला पण तोही तापत , व्यसनी , मारझोड करणारा ....समाजात असे १-२ % बाप असतील हि ..
पण चांगल्या पितयान बद्दल काय ..चांगल्या वडिलांबद्दल काय..
आई कडे अश्रुंचे पाठ असतात पण बापाकडे सय्यमाचे घाट असतात ...
आई रडून मोकळी होते पण सांत्वन वड्लानाच कराव लागत .आणि रडणाऱ्या पेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त तन पडतो .
कारण सामाई पेक्षा सामीच जास्त तापते ना......... पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत . रोजच्या जेवणाची सोय करणारी आई
आपल्या लक्षात राहते पण आयुष्याची शिदोरी करणाऱ्या बापाला किती सहज विसरून जातो.
आई रडते पण वडलांना रडता येत नाही .स्वताचा बाप वारला तरी रडता येत नाही कारण छोट्या भावांना जपायचं असत .
आई गेली तरी रडता येत नाही कारण बहिणींना आधार व्हायचं असत .पत्नी अर्ध्या वरच सोडून गेली तरी पोरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो .
जिजाबाईनि शिवाजी घडवला अस आवश्य म्हणावं...पण त्यावेळेस शहाजी राजांची ऊलाताण घ्यायला हवी ..देवकीचं यशोदेच कौतुक अवश्य कराव ..
पण पुरातून डोक्यावरू पोराला घेऊन जाणारा वासुदेव लक्षात ठेवावा ...राम हा कौशल्लेचा पुत्र अवश्य असेल पण योगात तडफडून मेला तो पिता दाश्रात होता ..
वडिलांच्या ताचांकडे चपला झिजलेल्या पाहिलं कि त्याचं प्रेम कळत ..त्यांची फाटकी बनियन पहिली कि कळत आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियन ला पडली आहेत .त्यांचा दाडी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो .....मुलीला गाऊन घेतील मुलाला लुंगी घेतील पण स्वता मात्र जुनी पैजामा वापरायला काढतील .
मुलगा सलून मध्ये ३० ते ६० रुपये खर्च करतो ... मुलगी ब्युटी पार्लोर मध्ये १०० ते २०० रुपये खर्च करते ... पण त्याच घरातला बाप दडीचा साबण संपला तर पाण्याने
दडी करतो ..बाप आजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही . तो आजाराला मुळीच घाबरत नाही पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्याला भीती असते.कारण पोरीच लग्न पोराच शिक्षण बाकी असत .घरात उत्पन्नाच दुसर साधन नसत ऐपत नसते तरी मुलांना जे शिक्षण हवे ते दिले जाते .ओढा तन करून दर महिना त्यांच्या शिक्षणाला पैसा पुरानला जातो. पण सर्वच नसली तर काही मुल अशी असतात कि तारखेला पैसे मिळताच मित्र मैत्रीणीना पार्ट्या देतात .न ज्या बापाने पैसे पाठवले त्याच बापाला एकमेकांना हाक मारतात .
ज्या घरात बाप आहे त्या घरात वाईट नजरेने पाहण्याची हिम्मत होत नाही कारण घरातला करता जिवंत असतो.तो जरी काही करत नसला तरी तो त्या पदावर असतो.आणि घरच्याच कर्म बघत असतो .कुणाचा मुलगा होण टाळता येत नाही पण बाप होण्याला कोणाच टाळता येत नाही आईच्या असण्याला बापामुळे अर्थ असतो . कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला कि आई जवळची वाटते कारण आई जवळ घेते कवटाळते कौतुक करते . पण गुपचूप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कुणाच्याच लक्षात येत नाही .चटका बसला . फटका बसला ठेच लागली कि आई ग हा शब्द बाहेर पडतो पण रस्ता ओलांद्तना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक मारतो तेंव्हा बाप रे हा शब्द बाहेर पडतो कारण छोट्या छोट्या संकटाना आई चालते पण मोठी मिठी वादळ पेलताना बापच आठवतो . सगळ्या मंगल प्रसंगी घरातील सगळे जातात पण मैता च्या वेळी बापालाच जाव लागत .कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जात नसतो पण गरीब लेकीच्या घरी उभ्या उभ्या का होईना पण चक्कर मारतो .तरुण मुलगा उशिरा घरी येतो तेंव्हा आई नाही बापच जागा असतो .वडिलांचा महत्व कोणाला कळत .. लहानपणी वडील गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात .त्यांना एक एका वस्तूंसाठी तरसान लागत वडिलांना संजून घेते ती त्या घरातली मुलगी .सासरी गेलेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या बापाबरोबर फोन वर बोलताना बदललेला आवाज एका क्षणात कळतो ...मुलगी वडलाना जनते जपते ....इतरांनी आपल्याला जनाव हि बापाची किमान इच्छा असते.

No comments:

Post a Comment