Thursday 12 September 2013

प्रेमात आणि मैत्रीतकाय असतो फरक?





अदित्य आणि अमर हे दोन बालपणीचे मित्र.शाळेत असताना एकमेकांचे टिफीन आणि मास्तरांचा मार दोघेही वाटुनच खायचे.हायस्कुलम ध्येअदित्याला कोणी मारलं की अमरत्याच्याअंगा वर धावुन जायचा.त्यांची उत्तरपत्रिकातर इतकी सेम
असायची की कधीकधी सरही बुचकळ्यात पडायचे की यातली अदित्याची उत्तरपत्रीका को
णती नि अमरची कोणती?
कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांच्यातला खोडकरपणा प्रचंड वाढला होता.पण त्यांची जोडी कॉलेजमध्ये पुर्णपणे फेमस झाली होती.पुर्ण कॉलेज अदित्य अमरच्या मैत्रीचे उदाहरण द्यायचे.आणियाचा त्या दोघांना फारच हेवा वाटायचा.
पण आता या दोघांच्या मैत्रीमध्ये एक ट्विस्ट आला आहे.त्या ट्विस्टचं नावआहे . अक्षदा new admission आहे.दोघेही तिला बघताच तिच्या प्रेमात पडतात.हळुहळु ही बातमी सर्वकॉलेजमध्ये पसरते.पण या love triangle ची जाणीव जराहीत्या तिघांना नसते.दोघेही आपण अक्षदाला Impress करण्यासाठी आपल्या स्वभावाविरुद्ध आपण जसे नाही आहोत तसे भासविण्याचा प्रयत्न करु लागतात.एकमेकांस ोबत प्रत्येक गोष्ट ते शेअर करायचे पण याबाबतीत त्यांनी एकमेकांना काहीही सांगितलं नव्हतं.पण अमर हा पुर्णपणे निर्मळ मनाचा होता.कोणतीही गोष्ट अदित्यापासुन लपवणं त्याला मान्यच नव्हतं मुळी.अदित्याला त्याने सांगितलं की माझं अक्षदावर खुप प्रेम आहे.आणिकोणत्याह ी किँमतीवर मला अक्षदाशी लग्न करायचं आहे.मला तुझी मदत हवी आहे,करशील ना?
हे ऐकल्यावर अदित्याला काय बोलावं आणि काय नको हेच कळेनासं झालं होतं.दाठलेल्या उराने त्याने अमरला सर्वतोपरी मदत करण्याचं वचन दिलं.ही बातमी पुर्ण कॉलेजमध्ये पसरली.अदित्याने अक्षदाचा विचार सोडुन दिला.आणि अमरलात्याच्यामध ल्याself confidance वाढवण्यामध्ये, अक्षदासमोर प्रेम व्यक्त करण्यामध्ये तो त्याची मदत करु लागला.
एखाद्या सस्पेन्स फिल्मच्याclimax चीप्रेक्षक ज्या आतुरतेने वाट पहात असतात त्याच पद्धतीने यांच्या प्रेमकहाणीतल्या होणार्या endची पुर्ण कॉलेज आतुरतेनंवाट पाहत होतं.
अमरने शेवटी हिंमत करुन अक्षदाला प्रपोज केलं. अक्षदा म्हणाली,मला माफ कर अमर पण माझी engagement राहुल नावाच्यामुलाशी झालीय.ही बातमी फारचकमी जणांना माहीतीये.तु माझा चांगला मित्र आहेस.मी तुला हे सांगायला हवं होतं पण मला हे इतक महत्त्वाचं नाही वाटलं.मी हे प्रपोजल नाही स्वीकारु शकत.
हे ऐकताच अमरच्या पायाखालची जमिनच सरकली.तो प्रचंड निराशझाला.आपलं दुःख व्यक्त करण्यासाठी तो अदित्याच्या घरी गेला.घरी कोणीही दिसत नव्हतं.कदाचित तो bedroom मध्ये असेल म्हणुन तो तिथे गेला.तिथेहीकोणी च नव्हतं.समोर एक पुस्तक पडलं होतं,अमरनं ते पुस्तक उचललं,ते उघडलं तर त्यात अक्षदाचा फोटो होता ज्याच्यावर अदित्याने I love u असं लिहीलं होतं.ते बघुन अमरला प्रचंड निराशा झाली.आपण नकळत अदित्यावर केल्याअसलेल्या अन्यायाची त्यालाजाणीव झाली.त्याच्या डोळ्यात आपसुकच पाणी आलं.अदित्य सध्या कुठे असु शकतो याची अमरला कल्पना आलीतो गेला समुद्रकिनारी जिथे दुःखी असल्यावर नेहमी अदित्य जायचा.एका बँचवर समुद्रातल्या उफणत्या लाटांकडे बघत अदित्य बसला होता.अमरही त्याच्याजवळ जाऊन बसला.
अदित्य:अरे अमर तु इथे।
अमरःहो,तुला शोधत आलो.मला सगळं कळलंय.
अदित्य: काय कळलंय?
अमरःत्याने अक्षदाचा फोटो खिशातुन काढला,आणि त्याला दाखवला.
अदित्य:i m sorry yarrr
अमरःअरे तु का माफी मागतोयसखरं म्हणजे मीच तुझी माफी मागायला हवी.तुझ्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे.i m sorry...तुला ती नाव दिसतिये,तीसमुद्रातली?
अदित्य:हो दिसतिये पण तु असं का विचारतोयस?
अमरःसध्या आपण दोघेही अशाच नावात स्वार आहोत.फरक एवढाचआहे की,आपली नाव अशा समुद्रात तरंगतीये ज्याला किनाराच नाही.
अदित्य:म्हणजे?
अमरः अक्षदाचा साखरपुढा झालाय दुसर्याशी
अदित्य:केव्हा आणि कोणाशी?
अमरःजाउ दे ना यार.ते महत्त्वाचं नाहीये.प्रेम हे असंच असतं जे सच्चाईने करतात,त्यांना मिळत नाही,आणिज्यांना ते मिळतं ते कधी खरं प्रेम करत नाहीत.पण मैत्री,मैत्री ही सर्वांनाच नसीब होते.
अदित्य:खरंय यार.
अमरःआपली मैत्री ही कधीही कोणत्याही कारणामुळे तुटणारनाही असं आज मी तुलावचन देतो.
यानंतर ते दोघेही एकमेकांना मिठी मारतात.....
friend कोण असतो ?प्रेमात आणि मैत्रीतकाय असतो फरक?

No comments:

Post a Comment