Tuesday 4 December 2012

प्रेमत्रिकोण.............

प्रेमत्रिकोणः
मित्रांनो ही कहानी आहे अशा प्रेमवीरांची जे बालपणाचे मित्र तर होते,पण त्यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रेमाला ते मैत्रीच समजत होते.या कहानीत देवदासही आहे,पारोही आहे आणि चंद्रमुखीही.पण तरीही ही कहाणी पुर्णतःवेगळी आहे जी नक्कीच

 तुम्ही याआधी कधीच अनुभवली नसेल।
शर्विल या कथानकाचा नायक,दिप्ती नायिका आणि मानसीला चंद्रमुखी म्हणायला हरकत नाही।
शर्विल आणि दिप्ती हे दोघे बालमित्रच शेजारी शेजारी असलेने त्यांची मैत्री ही खुपच गाढ होती।एकाच शाळेत एकाच वर्गात शिकायचे ते..शर्विल अभ्यासात कच्चा आणि आळशी असल्याने त्याचा घरचा अभ्यास खुपवेळा दिप्तीच करायची।पण तोहि दोस्ती निभावण्यामध्ये काही कमी नव्हता,एकदा ज्यावेळी दीप्ती तिची अभ्यास केलेली वही घरीच विसरुन आली होती,त्यावेळी शर्विलने त्याची वही जी तिनेच पुर्ण केली होती,ती तिला दिली आणि त्याने अभ्यासाची वही नसल्याने मॅडमचा मार खाल्ला होता।आज ते मोठे झालेत आणि अजुनही एकाच कॉलेजमध्ये,एकाच क्लासमध्ये शिकतात,त्यांची मैत्री अजुनही तशीच आहे,सदाबहार, अजुनही शर्विल आळशीचा आळशी आणि दिप्ती जशीच्या तशीच आहे,ही कायम कॉलेज टॉपर असायची आणि हा 35% जिँदाबाद,तेही तिच्याच पेपरमधलं उतरवलेलं,हा पण तो कॉलेजमधला एक नंबर डान्सर आहे,सर्व मुली तर याच्या लॉकींग पोपींग डान्सवर मरतात,दीप्तीलाही त्याचा डान्स आवडतो पण,हे तिला आवडत नाही।काही दिवसापुर्वी त्यांचा निकाल लागला त्यात दीप्तीला 96%आणि शर्विलला 48%मार्क्स मिळाले होते।दोघांनीही एकाच क्लासमध्ये अॅडमिशन घेतलंय।आणि आता या कथेची उपनायिका म्हणजेच या कथेची चंद्रमुखी म्हणजेच मानसी हीचि entry होते।मानसी एक मॉडर्न मुलगी आहे,जीन्स,स्कर्टस डोळ्यावर गॉगल,4व्हीलर गाडी,पर्स कायम पैशाने भरलेली,अशी ही मुलगी।तिचंही अॅडमिशन आज शर्विलच्या क्लासमध्ये झालंय.तिची Entry होताच,वर्गातली सर्व मुले तिच्याकडेच बघत असतात,शर्विलही।त्यामुळे सर्वमुली तिच्यावर जळतात.शर्विलला तर ती बघताक्षणीच आवडली होती।शर्विलने तिच्याशी मैत्री केली,एकमेकांसमवेत त्यांचा बराच वेळ जाउ लागला।त्यामुळे दीप्तीला ते आवडत नव्हतं,कारण नकळत ती त्याच्या प्रेमात पडली होती.एक दिवस कॉलेजच्या गॅदरींगमध्ये शर्विलचा डान्स पाहुन मानसी तर त्याच्या डान्सवर एकदम वेडीच झाली।इकडे शर्विल दीप्तीला म्हणाला माझं मानसीवर खुप प्रेम आहे,तिला प्रेमपत्र लिहावं म्हणतोय पण काय लिहावं हे कळतच नाहाये,मला मदत करशील?यावर काय reaction द्यावी हे दीप्तीला कळतंच नव्हतं।पण मैत्रीसाठी तिने निस्वार्थ भावनेने,थोडं दुखी मनाने ते प्रेमपत्र लिहीलं.दुसर्यादिवशी क्लासमध्ये ते पत्र तिने शर्विलच्या हातात हळुच कोंबले आणि मानसीला ते देण्याचा इशारा केला।तो खुप घाबरला होता,थरथरतच तिच्यासमोर जाऊन उभारला।तो पत्र द्यायच्या आतच मानसीने त्याच्या हातात एक चिठ्ठी दिली,व जायचा इशारा केला त्यानेही ते पत्र तिच्या हातात देऊन तिथुन काढता पाय घेतला।गंमत म्हणजे दोघांनीही एकमेकांना एकाचवेळी प्रेमपत्रे दिली होती।दोघांचं प्रेम जमलं,एकमेकांना बाहेर भेटणं सुरु झालं,याला निवांत कुठेतरी बागेत भेटणं आवडायचं,तर तिला डान्सक्लब,पार्ट्यांमध्ये रमणं आवडायचं।इकडे शर्विलविना दिप्तीची अवस्था खुपच वाईट झाली होती,आपला जिवाभावाचा मित्र अचानकच आपल्यापासुन खुपच दुर जात होता,तिला मनमोकळं करायला कोणीही नव्हतं,तिला कळुन चुकलं होतं की आपलं त्याच्यावर प्रेम बसलंय।पण ती स्वतःच्याच मनाला समजावत होती की आपल्या प्रेमाला त्याच्या प्रेमाची साथ मिळाली हेच माझ्यासाठी सुख आहे।इकडे शर्विलला कळलं कि मानसी क्लबमध्ये पार्ट्यांमध्ये ड्रिँक घेते यावरुन त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि तु माझ्या आयुष्यात पुन्हा मला भेटु नकोस असं म्हणुन तो घरी निघुन आला.त्याला पुन्हापुन्हा दीप्तीची आठवण येत होती तिला सगळं सांगावंस त्याला वाटत होतं,तिच्यावर आपण केलेल्या अन्यायाची जाणीव त्याला झाली.रात्र खुप झाली होती त्याच्या मोबाईलवर एका unknown नंबर वरुन फोन येत होता,थोडा डिस्टर्ब असल्यामुळे शर्विल पुन्हापुन्हा फोन कट करत होता.फोन येणं बंद झाल्यावर तो झोपीला.सकाळी सहा वाजता दिप्तीचा फोन त्याला आला त्याने तो लगेच उचलला.दीप्तीची आई बोलत होती,हॅलो शर्विल,काल दीप्तीचा अॅक्सीडंट झालाय रे तिला गांधी हॉस्पीटलमध्ये अॅडमिट केलंय प्लीज तु लवकर ये...फोन लगेच कट झाला..तो लगबगीने गांधी हॉस्पीटल कडे निघाला,मनात वाईट विचार येत होते,काय झालं असेल माझ्या दीप्तीचं?माझी दीप्ती....मी असं का म्हणतोय?काय खरंच माझं तिच्यावर प्रेम जडलंय?जाऊदे....शर्विल हॉस्पीटलमध्ये पोहोचताच दीप्ती कॉटवर पडलेली असते,तिला सलाईन लावलेलं असतं,डोक्यावर पट्ठी बांधलेली असते,ती अजुन बेशुद्धावस्थेत असते,शर्विल तिच्याजवळ जाऊन बसतो,आणि त्याने तिचा,हात हातात घेताच तिला शुद्ध येते,ति त्याच्याकडेच बघत असते.तो तिची माफी मागतो आणि म्हणतो,मी भावनेच्या भरात भरकटलो होतो मला माफ कर,मी मानसीशी सर्व संबंध तोडलेत,मला फक्त त्या मैत्रिणीची गरज आहे जी माझी काळजी घेते,माझ्या मनातलं ओळखते मला तुझ्याशी लग्न करायचं आहे,तु माझ्याशी लग्न करशील?तिच्या डोळ्यातुन एक अश्रु तिच्या गालावरुन खाली घरंगळत आला.शेजारी असणारी एक लहान मुलगी शर्विलला म्हणाली,अॅक्सिडंट नंतर दीदीने बोलण्याची शक्ती गमावलीय.काल तिचा शेजारी असलेल्या स्टॉपजवळ अॅक्सिडंट झाला,ती बेशुद्धावस्थेत होती,जवळ पडलेल्या डायरीमध्ये तुमचा नंबर मिळाला,पण तुम्ही काही फोन उचलला नाही.त्यामुळे दीदीला दवाखान्यात आणण्यास खुपच उशीर झाला आणि त्यामुळेच तिची वाचा शक्ती गेली.हे ऐकताच त्याची मान शरमेने खाली गेली व तोही रडु लागला,दीप्तीने त्याच्या हनुवटीला धरुन तीच मान अलगद वर केली,आणि इशार्यानेच न रडण्याचा ईशारा केला.त्याने तिला एकदम छातीशी धरलं,आणि खुप रडला,तिने शेवटी लग्नाला होकार दिलाय,दोघांचं लग्न खुपच साध्या पद्धतीने पण छान झालं.....
आज ते खुपच सुखी आहेत आजपाच वर्षानंतर त्यांना एक मुलगी ही आहे.

No comments:

Post a Comment