Friday 13 September 2013

संधी ...............

एकदा एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते त्याला आपल्याबरोबर यायला सांगतात तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, कि त्याचा त्याच्या देवावर विश्वास आहे आणि देव त्याचं नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकोप्तर येत आणि त्याच्याकडे शिडी टाकत पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो.

तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुले सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्याच्याकडे तक्रार करतो, कि त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, " मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलीकोप्तर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस." पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या.

मित्रानो, तुमच्या आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात पण त्या क्षणाला तुम्हाला त्याची कल्पनाच नसते. एक छोटीशी संधी तुमच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी देऊ शकते. म्हणून योग्य संधी कधीच हातची जाऊ देऊ नका.

Thursday 12 September 2013

तो बाप चक्कर येऊन तिथेच थंड पडला...





समुद्र किनाऱ्यावर छोटे बहिण
भाऊ वाळूचं घर बनवण्यात मग्न
होते..
"थांब दादा असं नाही...
इथे आपण
गाडी ठेवायची.."

त्यांचा खेळ कल्पना पाहताना त्यांच्या आईला फार
बर वाटत होत...

"आई बघ हं,,
ही रूम माझी,,
ही ताई ची,,
आणि ही तुझी..
किती छान आहे
ना आपलं घर...??.."

आपण बनवलेलं घर आपल्या आईला कौतुकाने दाखवत
मुलगा म्हणाला..

इतक्यात त्याचे
बाबा मुलांसाठी आईस क्रीम घेऊन
आले,,
आणि विचारल
"आणि माझी रूम
रे..??
मी कुठे राहायचं..??"

निरागसपणे त्या छोट्या जीवांनी उत्तर दिलं,
"बाबा तुम्हाला कशाला हवीये रूम..??
तुम्ही कसं आजोबांना वृद्धाश्रमात
पाठवलंत,,
आम्ही पण
तुम्हाला पाठवणार..
बाबा म्हातारे झाले कि त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात
ना..??.."

हे ऐकून
त्या बापाला आपल्या केलेल्या कर्माची फळ
दिसू लागली....
विचार चक्र जोरात फिरू
लागलं...

'हे आपण काय शिकवलं..??'

विचार चक्राची गती वाढत
गेली आणि तो बाप चक्कर येऊन
तिथेच थंड पडला...

सिगारेट....?







प्रेयसी :- तुला कित्ती वेळा सांगितले रे सिगारेट ओढत नको जाऊस म्हणून ........... तू ऐकत का नाहीस ?
प्रियकर :- अग ...... सोडण्याचाप्रयत्न करतोय, पण सुटतच नाहीये ...त्यात आपल्या घरचेtension देत आहेत ....लग्नाला नाही म्हणत आहेत .....!!
प्रेयसी :- हे tension मला पणआहे ............ पण म्हणून मी पिते का सिगारेट ?
प्रियकर :- अग मग कसे समजावयाचे ह्या घरच्यांना......... !!!
प्रेयसी :- अरे म्हणून काय, सिगारेट, दारू, चीडचीडपणा......हि आपल्या समस्ये वरील औषधे आहेत का ?
प्रियकर :- हे बघ .... उगीच मला lecture देऊ नकोस ...... त्यापेक्षा घरच्यांना कसे समजावयाचे त्याचा विचार कर!!
प्रेयसी :- घरच्यांच्या आधीतुला समजावणे जास्त जरुरीचे आहे ............... ...
प्रियकर :- म्हणजे ?
प्रेयसी :- चल माझ्या बरोबर..
प्रियकर :- कुठे ?
(तिथेच शेजारी असणाऱ्या गणपतीच्या मंदिरात ती प्रेयसी त्याला घेऊन जाते............... . मंदिरात आल्यामुळे त्याला सिगारेट फेकून द्यावी लागते, तो नाराजीने हाथ जोडून कपाळावर आठ्या आणून तिच्या बरोबर उभा राहतो)
प्रेयसी हाथ जोडून त्याला ऐकू जाईल अशा आवाजात गणपती बाप्प्पा ला म्हणते :- हे विघ्नहर्ता, ह्याची एक सिगारेट म्हणजे माझ्या आयुष्यातील एक दिवस .......... ह्याप्रमाणे हा जेवढ्या सिगारेट पिल तेवढे माझ्या आयुष्यातील दिवस तू कमी कर......... हि माझी तुझ्याकडे प्रार्थना, ...... कारण सिगारेट तो पितो पण धूर माझ्या हृदयातून निघतो हे ह्याला कदाचित कधी कळणारच नाही ......!!

शेवटचा क्षण .........................

पहिला मित्र : एक प्रश्न विचारू?

दुसरा मित्र : हा विचार ना?

पहिला मित्र : समज जर तुला असे कळले कि,
तुझ्याकडे जगण्यासाठी आता फक्त एकाच क्षण उरलाय.
आणि या क्षणात तू कोणत्याही पण फक्त एकाच आवडत्या व्यक्तीला भेटू शकतोस, तर तू कुणाला भेटशील?

दुसरा मित्र : अअअअअअ......
असे असेल तर मी त्या क्षणात कोणालाच भेटणार नाही....

पहिला मित्र : असे का?सांगशील?

दुसरा मित्र : सांगतो ना.....
हे बघ,
जर मी तुला म्हटले कि,मी त्या क्षणात माझ्या आईवडिलांना भेटेन.
तर तू म्हणशील कि,फक्त एकालाच भेटायचं......एकतर आई नाहीतर बाबा....एकाचच नाव सांग
मग मी म्हणेन कि,"आईला भेटेन,खूप प्रेम आहे तिचे माझ्यावर...."
मग तू म्हणशील,"म्हणजे तुला असे म्हणायचेय का कि तुझ्या बाबांचे तुझ्यावर प्रेम नाही....
अरे ते दाखवत नाहीत पण आई एवढीच त्यांना पण तुझी तितकीच काळजी आहे...
मग मी पुन्हा कोड्यात पडेन आणि म्हणेन कि,ठीक आहे मग मी त्या क्षणात माझ्या बाबांना भेटेन.
मग तुझा पुढचा प्रश्न असेल कि,"आई वडिलांचे नाव घेतलेस,पण तुझ्या प्रेयसीचे नाव नाही घेतलेस.
ती पण इतकी प्रेम करते तुझ्यावर.तिला भेटावेसे नाही वाटणार का?"
मग मी पुन्हा कोड्यात पडेन.
पण खरे सांगायचे तर
नात्यांमध्ये असा क्रम नाही लावता येत,
हे नाते आधी आणि ते नाते नंतर.......
मला जरासा क्षण मिळाला तर मी कोणालाच प्रत्त्यक्ष कोणालाच भेटणार नाही
त्या क्षणात मी माझे डोळे बंद करून घेईन आणि
माझ्या सगळ्या आवडत्या व्यक्तींना मनातल्या मनात आठवेन...माझी आई,बाबा,ती आणि माझे मित्र मैत्रींनी........आणि सगळेच
कारण
तो यम माझ्या त्या शेवटच्या क्षणावर ताबा ठेवू शकतो
पण माझ्या मनावर नाही".........

.....................ओढणी ..................

......................ओढणी ..................

ट्रेनची चौथी सीट पकडून प्रवास केल्यावर चेहऱ्यावर 'एक गड' जिंकून 'एक योद्धा' आल्याच्या
अविर्भावात मी चाळीत प्रवेश केला....
चाळीच्या दाराशी लोकांची गर्दी दिसली."मी 'चौथ्या सीटची लढाई' जिंकली हि खबर चाळीत पण पोहोचली कि काय?".
हे लोक माझी आता आरती ओवाळणार..."यावे यावे राजे....आप आई बहार आई....."
पण मी चाळीत प्रवेश केला तरीही कुणी ढुंकूनही पाहिले नाही माझ्याकडे....मग मात्र मला थोडा संशयच आला....

आम्हा चाळीतल्या लोकांना जरा सवयच असते गर्दी करायची.
'स्वत:च्या घरात काय चालू आहे' या ज्ञानाबरोबर 'इतर शेजारांच्या घरात काय चालू आहे' हे माहित असणं आमच्यासाठी
अतिमहत्त्वाचं असतं...जसे ते तसा मी...मग मी हि मागच्या एकाला हळूच कानात विचारले,
"काय झालं रे मंग्या? अन्याच्या घरात काही झालंय काय? कुणी गचकला कि काय?"...मी अशीच मस्करी केली.
"गचकला नाही....गचकावला...अन्याने स्वत:च्या बायकोला गळा घोटून मारले"...

ऐकल्याच क्षणी माझा हात माझ्याच गळ्याशी गेला....थोडा भूकंप झाल्यासारखे वाटले...योद्धा थोडा हडबडला होता....
अनिकेत अशी काही हरकत करेल हे माझ्याच काय तर इतर कुणाच्या हि बुद्धीला पटणारे नव्हते.
कारण अनिकेत म्हणजे तसा सुजाण माणूस होता.सगळ्यांत मिळून मिसळून राहणारा.माझा यार....
दिसायलाही राजबिंडा.नोकरी चांगली होती.स्वत:चे राहते घर होते....आई बाबांचा लाडका नसला तरी दोडका पण नव्हता.
जशी इतर घरात होतात तशी त्यांच्या हि घरात भांडणं व्हायची....शेवटी काय...?
दोन पिढ्या एकत्र वावरताना दोनच गोष्टी गरजेच्या असतात....एकतर 'संवाद' नाहीतर 'शांतता'...
दोन्ही नसेल तेव्हा फक्त युद्धं होतात....रक्त नाही सांडली तरी भांडी पडतात....त्यांना पोकं येतात....

अनिकेतची बायको म्हणजे 'काव्या'...काव्या नावासारखीच होती...कवितेसारखी....रेंगाळणारी....
दिसायला नक्षत्र....वागायला नम्र..... नजर लागायची १००% शक्यता होती.....आणि लागलीच....
डोळ्यांत खूप स्वप्न घेऊन अनिकेतसोबत एका वर्षापूर्वीच तिने 'थोरातांची सून' म्हणून घरात प्रवेश केला होता.
मोठ्या कौतुकाने अनिकेतने बायकोचे नाव 'काव्या' ठेवले होते.तेव्हापासून 'पूजा शिंदे' ची 'काव्या थोरात' झाली होती.
माझी काही जास्त ओळख नव्हती तिच्याशी पण बोलून चालून ओळख होती.

तिचे प्रेत बाहेर आणले गेले.तिचा चेहरा अजूनही हसरा होता.
'सुंदर लोक कोणत्याही क्षणी कोणत्याही वेशात सुंदरच दिसतात' याची खात्री पटली.
मागून अनिकेतला आणले गेले.त्याच्या चेहऱ्यावर भाव विचित्र होते.कळत नव्हते...
छोटासा का होईना लेखक मी.....पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मला शब्दात पकडता येत नव्हते.
पोलीस आले आणि अनिकेतला घेऊन गेले.....आणि काव्याचा देह सुद्धा....
गुन्हा अनिकेतने कबूल केल्याने पोस्ट-मार्टम करण्यास जास्त वेळ लागणार नव्हता....

गर्दीची सर्व कारणं गेल्यावर गर्दी करण्यात अर्थ नव्हता....बाकी सगळे गेले...
माझी आई अनिकेतच्या आईची समजूत काढत होती....
"असा नाही आहे हो आमचा अनिकेत.आम्हाला वाटलं दोघांचा संसार सुरळीत चालू आहे....कुणाची नजर लागली हो..?"

बाहेरून अनिकेतच्या आईचे रडणे आणि डोळ्यांसमोर काव्याच्या देहाकडे बघणारा अनिकेत....
श्या....जेवण जात नव्हते...झोप हि उडाली होती....
"का रे अनिकेत असे का केलेस मित्रा?....मित्रा ???? तुला मित्र म्हणू की नको हा विचार करावासा वाटतोय..
इतका नाजूक गळा दाबताना तुला अजिबात कीव नाही आली का रे?...का?? का केलेस?
श्या....प्रश्न प्रश्न....आणि प्रश्न.....
पण उत्तरं नाहीत....उत्तरं देणारा कुठेय???....हे करून तो खुश असेल का?..
हे घडल्यावर ती खुश असेल का? गळा घोटताना तिला किती दुखले असेल...?
पण तरीही तिचा चेहरा हसरा कसा होता....?....अनिकेत...अन्या....सांग मला....असे का केलेस?"

माणसाला आयुष्यात काय काय हवे असते?...मान्य आहे कि मागितलेले सगळेच मिळत नाही...
नाही मिळणारा माणूस रडत राहतो....
पण मिळाले कि असे स्वतःच्या कर्माने घालवून बसतो....

कधी कधी स्वत:च्या संसाराला स्वतःचीच नजर लागते.....
हा 'आरंभ' आहे कि 'शेवट' आहे हें सांगणं कठीण होतं...

उद्या जाऊन सकाळी सकाळी अनिकेतला भेटल्याशिवाय मला राहवणार नव्हते.....
उद्याच सकाळी अग्नी दिल्यावर त्याला न्यायालयात सादर करणार होते.त्या आधी मला त्याला भेटायचे होते.
पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचा होता..आमच्या ऑफिसच्या जोश्याचा चुलत भाऊ....
म्हणून बोलायला वेळ मिळाला.नाहीतर पाच मिनिटात उरकायला लागणार होते....

मी लॉक-अप जवळ गेलो.अनिकेत शांत बसला होता.....गुन्हा केलाय असे वाटतच नव्हते....
मला पाहून तो धावत धावत लॉक-अपच्या दाराशी आला....
लॉक-अपच्या दाराशी येऊन लोखंडी सळयांमधून अनिकेतने माझा हात धरला....
आणि म्हणाला...."संपवलं...संपवलं मी सगळं.बघ आता कुणालाच त्रास नाही.
श्री....शांत झालंय बघ सगळं...ती आनंदात आहे बघ आता."
"अन्या....अन्या...काय बोलतोयस हे...कोण आनंदात असेल?..वेडा झालायस का?काय करून ठेवलंस हे?..काय बिनसलं होतं रे तुझं?
काव्यासारखी बायको मिळायला नशीब लागतं रे मित्रा...गमावून बसलास सगळं.."
"गमावलं.????कोण बोलतं असं...?मी तिला गमावून....कमाव
लंय...श्री....
'काव्यासारखी बायको मिळायला नशीब लागतं' खरं बोललास.तो नशीबवान मी...पण आंधळा होतो मी...
नक्षत्र होती माझी काव्या....हिऱ्यासारखी होती...पण कोंदण चुकलं होतं.इतकं तेज सांभाळायची लायकी नव्हती रे श्री माझी.
काय काय भोगलं रे तिने माझ्यासाठी?
तिचं हसणं वेड लावणारं होतं...पण मी तिचं वेड होतो...खूप उशिरा कळले मला ते.

काल हि भांडून झोपलो मी.जाग आली तेव्हा काव्याही झोपली होती...तिचा ओला गाल पाहिला मी...
रडली होती ती...खूप खूप रडली होती...रोजच्या सारखीच...मग बसलो आणि विचार केला....
सगळं सगळं उलघडत होतं....मी दोषी ठरत होतो....
स्वतःच्याच विचारात स्वतःला दोष आला कि स्वतःच्याच विचारांचा राग येतो...मलाही येत होता स्वतःचा राग..

मनाच्या जवळचं माणूस जवळ असलं कि गर्दीची भीती वाटत नाही...पण...
तेच माणूस जवळ नसलं कि स्वत:च्या सावलीचीही भीती वाटते.
मित्र मला 'बायकोचा बैल' म्हणतील म्हणून कधी गर्दीत कुणासमोर हात नाही धरला मी तिचा.
नेहमी एकट सोडलं...तिची नजर शोध्याची मला...पण यातच 'पुरुषार्थ' वाटायचा मला...
पुरुषार्थ....मोठा शब्द आहे ना?अर्थ तरी कळतो का रे आपल्याला त्याचा?घरातली बायको हवी तशी राबवता आली म्हणजे पुरुषार्थ मिळतो का?
संसार फुलवायला जे लागते ना त्याला म्हणतात 'पुरुषार्थ'.विस्कटता सगळ्यांना येतं.आवरायला हिंमत असावी लागते."

अनिकेतच्या डोक्यातली भूतकाळाची पानं पटापट पटापट पलटत होती...मी प्रयत्न करत होतो.
पण त्यांच्या पलटण्याचा वेग खूप जास्त होता...माझी घाई होत होती...त्या पानांवरचं सगळं वाचता येत नव्हतं
"श्री...'नांदा सौख्यभरे' असा आशीर्वाद घेऊन संसार फुलत नसतो रे.साथीदाराचं सौख्य कळायला मनात डोकवावं लागतं.
पण मला कधीच नाही जमलं ते.'वेळ'...खूप मोठी गोष्ट आहे रे श्री....नात्यासाठी....
माझ्याकडे वेळ होता....पण तो तिच्यासाठी नव्हता...तो माझ्या मित्रांसाठी होता...
मित्रांसोबत दारूच्या बाटल्या फोडून Get Together करताना घरातली सर्वात जवळची मैत्रीण एकटी पडलीय हे विसरलो होतो मी.
आपल्या निर्णयात आपल्या जोडीदाराची साथ असली कि हुरूप येतो..पण मी नेहमी ग्राह्य धरलं तिला.
पण तिने तोंडातून 'ब्र' नाही काढला श्री....दुनियेला एक शब्द नाही कळला.तिने कळूच नाही दिला.

आपण हसलं कि जग फसतं...
तिनेही हेच केलं..नेहमी हसऱ्या चेहऱ्याने जगाला फसवलं.स्वतःचा त्रास कधी नाही दाखवला कुणाला?
का राहावं तिनं माझ्यासोबत?लायकी तरी आहे का माझी?...
कोणत्या विश्वासाने माझ्या हातात तिचा हात दिला होता त्या बापानं?"सांभाळ माझ्या पोरीला" असे म्हणाले होते ते.काय तोंड दाखवू त्यांना आता?
मी ओळखतो स्वतःला....दोन दिवस सुधारीन आणि पुन्हा माज चढेल मला...पुन्हा तीच सहन करणार...

घटस्फोट दिला तर जग मला सोडून तिलाच दोष देईल...एकच उपाय...मरण...
माझं नाही....तिचं...मी आत्महत्या केली तर जग तिलाच टोचून टोचून मारेल.."
तशीच ओढणी उचलली मी तिची....
तिचीच ओढणी हातात घेऊन तिच्या गळ्याभोवती गुंडाळली.गच्च खेचत गेलो ती.
तिच्या ओढणीतून तिचा सुंदर चेहरा चंद्रासारखा दिसत होता.चांदणं पडलं होतं.पण फक्त माझ्यावरच.
दोन क्षण वाटले कि, इतका निर्दयी कसा होऊ मी?इतकी नाजूक...इतकी गोड काव्या माझी...
नाही...नाही...नाही जमणार हे मला...
पण श्री.....पण पुढच्याच क्षणी मला रोज रात्री रडणारी, गालावर सुकेलेलं पाणी घेऊन तशीच झोपनारी
काव्या दिसली.तिच्या मनातलं ऐकू येत होत मला..ती म्हणत होती,
"फक्त जेवलं,पाणी पिलं,पोट भरलं इतकीच असते का रे माणसाची भूक?
मनाचं काय?त्याला काय हवं असतं रे...दोन सोबतीचे क्षण,जिव्हाळ्याची एक हाक,मायेचा एका स्पर्श....
आणि तितकं द्यायला हि आपल्या माणसांकडे वेळ नसावा.
असण्याला 'असणं' कसं म्हणावं?इथे शांती मागितली कि एकांत मिळतो...एकांतात आणि अंतात फक्त एकाचाच फरक...
आम्ही जगासाठी दोन नसून 'एक' आहोत...आम्ही खरंच 'एक' आहोत...पण आमचा 'एक' आणि जगाचा 'एक' वेगळा आहे.
आम्ही एक-एकटे आहोत."

गळा आवळला ना तसा तिला थोडा त्रास झाला.पण माझ्या डोळ्यांत पाणी होतं तिच्यासाठी.
प्रेम होतं तिच्यासाठी.तिने ते पाहिलं माझ्या डोळ्यांत आणि गोड हसली.हसतच राहिली.
माझा हात गच्च होत होता.ओढणी ताणली जात होती आणि ती सुंदर हसत होती....
तिच्या प्रत्येक हसऱ्या क्षणासोबत माझा हुंदका वाढत होता....मी आजवर काय काय त्रास दिला,किती छळलं हे आठवत होतं...
नाही...नाही....या पुढे नाही द्यायचा त्रास....
माणूस आहे रे ती...सहन तरी किती करावं?...ओढणी ताणली...गळयाजवळचा माझा धरलेला हात तिने घट्ट केला.
खूप ओढ होती रे त्या स्पर्शात...पण मी म्हणालो तिला,"नको लावूस इतकी ओढ...मी नाहीयेय या ओढीच्या लायकीचा..तू छान आहेस काव्या.चुकलो मी माफ कर मला."

गोड हसली रे ती....
पुढच्या क्षणी बोटं तिची सैल पडली.डोळे झाकले तिने सुखाने.पण चेहऱ्यावर तेच हास्य होतं...तेच वेड लावणारं हास्य.
तिच्या जिवंतपणी जे पाहून नाही शकलो ते सुख होतं तिथं तिच्या डोळ्यांत,चेहऱ्यात,स्पर्शात.."
पोलिसांनी जीपमध्ये बसवून आम्हा दोघांना स्मशान भूमीवर आणलं.काव्याच्या बाबांनीच अग्नी दिला होता..
अनिकेत वेड्यासारखा पुन्हा पुन्हा धावत धावत जात होता त्या आगीतल्या काव्याजवळ....
आणि अडवत होतो आम्ही त्याला...तो किंकाळत होता...
"बघ बघ....श्री....मी जळतोय आणि ती विझतेय....."

प्रेमात आणि मैत्रीतकाय असतो फरक?





अदित्य आणि अमर हे दोन बालपणीचे मित्र.शाळेत असताना एकमेकांचे टिफीन आणि मास्तरांचा मार दोघेही वाटुनच खायचे.हायस्कुलम ध्येअदित्याला कोणी मारलं की अमरत्याच्याअंगा वर धावुन जायचा.त्यांची उत्तरपत्रिकातर इतकी सेम
असायची की कधीकधी सरही बुचकळ्यात पडायचे की यातली अदित्याची उत्तरपत्रीका को
णती नि अमरची कोणती?
कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांच्यातला खोडकरपणा प्रचंड वाढला होता.पण त्यांची जोडी कॉलेजमध्ये पुर्णपणे फेमस झाली होती.पुर्ण कॉलेज अदित्य अमरच्या मैत्रीचे उदाहरण द्यायचे.आणियाचा त्या दोघांना फारच हेवा वाटायचा.
पण आता या दोघांच्या मैत्रीमध्ये एक ट्विस्ट आला आहे.त्या ट्विस्टचं नावआहे . अक्षदा new admission आहे.दोघेही तिला बघताच तिच्या प्रेमात पडतात.हळुहळु ही बातमी सर्वकॉलेजमध्ये पसरते.पण या love triangle ची जाणीव जराहीत्या तिघांना नसते.दोघेही आपण अक्षदाला Impress करण्यासाठी आपल्या स्वभावाविरुद्ध आपण जसे नाही आहोत तसे भासविण्याचा प्रयत्न करु लागतात.एकमेकांस ोबत प्रत्येक गोष्ट ते शेअर करायचे पण याबाबतीत त्यांनी एकमेकांना काहीही सांगितलं नव्हतं.पण अमर हा पुर्णपणे निर्मळ मनाचा होता.कोणतीही गोष्ट अदित्यापासुन लपवणं त्याला मान्यच नव्हतं मुळी.अदित्याला त्याने सांगितलं की माझं अक्षदावर खुप प्रेम आहे.आणिकोणत्याह ी किँमतीवर मला अक्षदाशी लग्न करायचं आहे.मला तुझी मदत हवी आहे,करशील ना?
हे ऐकल्यावर अदित्याला काय बोलावं आणि काय नको हेच कळेनासं झालं होतं.दाठलेल्या उराने त्याने अमरला सर्वतोपरी मदत करण्याचं वचन दिलं.ही बातमी पुर्ण कॉलेजमध्ये पसरली.अदित्याने अक्षदाचा विचार सोडुन दिला.आणि अमरलात्याच्यामध ल्याself confidance वाढवण्यामध्ये, अक्षदासमोर प्रेम व्यक्त करण्यामध्ये तो त्याची मदत करु लागला.
एखाद्या सस्पेन्स फिल्मच्याclimax चीप्रेक्षक ज्या आतुरतेने वाट पहात असतात त्याच पद्धतीने यांच्या प्रेमकहाणीतल्या होणार्या endची पुर्ण कॉलेज आतुरतेनंवाट पाहत होतं.
अमरने शेवटी हिंमत करुन अक्षदाला प्रपोज केलं. अक्षदा म्हणाली,मला माफ कर अमर पण माझी engagement राहुल नावाच्यामुलाशी झालीय.ही बातमी फारचकमी जणांना माहीतीये.तु माझा चांगला मित्र आहेस.मी तुला हे सांगायला हवं होतं पण मला हे इतक महत्त्वाचं नाही वाटलं.मी हे प्रपोजल नाही स्वीकारु शकत.
हे ऐकताच अमरच्या पायाखालची जमिनच सरकली.तो प्रचंड निराशझाला.आपलं दुःख व्यक्त करण्यासाठी तो अदित्याच्या घरी गेला.घरी कोणीही दिसत नव्हतं.कदाचित तो bedroom मध्ये असेल म्हणुन तो तिथे गेला.तिथेहीकोणी च नव्हतं.समोर एक पुस्तक पडलं होतं,अमरनं ते पुस्तक उचललं,ते उघडलं तर त्यात अक्षदाचा फोटो होता ज्याच्यावर अदित्याने I love u असं लिहीलं होतं.ते बघुन अमरला प्रचंड निराशा झाली.आपण नकळत अदित्यावर केल्याअसलेल्या अन्यायाची त्यालाजाणीव झाली.त्याच्या डोळ्यात आपसुकच पाणी आलं.अदित्य सध्या कुठे असु शकतो याची अमरला कल्पना आलीतो गेला समुद्रकिनारी जिथे दुःखी असल्यावर नेहमी अदित्य जायचा.एका बँचवर समुद्रातल्या उफणत्या लाटांकडे बघत अदित्य बसला होता.अमरही त्याच्याजवळ जाऊन बसला.
अदित्य:अरे अमर तु इथे।
अमरःहो,तुला शोधत आलो.मला सगळं कळलंय.
अदित्य: काय कळलंय?
अमरःत्याने अक्षदाचा फोटो खिशातुन काढला,आणि त्याला दाखवला.
अदित्य:i m sorry yarrr
अमरःअरे तु का माफी मागतोयसखरं म्हणजे मीच तुझी माफी मागायला हवी.तुझ्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे.i m sorry...तुला ती नाव दिसतिये,तीसमुद्रातली?
अदित्य:हो दिसतिये पण तु असं का विचारतोयस?
अमरःसध्या आपण दोघेही अशाच नावात स्वार आहोत.फरक एवढाचआहे की,आपली नाव अशा समुद्रात तरंगतीये ज्याला किनाराच नाही.
अदित्य:म्हणजे?
अमरः अक्षदाचा साखरपुढा झालाय दुसर्याशी
अदित्य:केव्हा आणि कोणाशी?
अमरःजाउ दे ना यार.ते महत्त्वाचं नाहीये.प्रेम हे असंच असतं जे सच्चाईने करतात,त्यांना मिळत नाही,आणिज्यांना ते मिळतं ते कधी खरं प्रेम करत नाहीत.पण मैत्री,मैत्री ही सर्वांनाच नसीब होते.
अदित्य:खरंय यार.
अमरःआपली मैत्री ही कधीही कोणत्याही कारणामुळे तुटणारनाही असं आज मी तुलावचन देतो.
यानंतर ते दोघेही एकमेकांना मिठी मारतात.....
friend कोण असतो ?प्रेमात आणि मैत्रीतकाय असतो फरक?




♥ प्रियकर :- आपले प्रेम हे हाथ आणि डोळे ह्या मध्ये असणाऱ्या नाजूक नात्या सारखे आहे.

प्रेयसी :- म्हणजे कसे ?

प्रियकर :- म्हणजे असे कि बघ........♥
जेव्हा हाथ दुखतात तेव्हा डोळे रडतात
आणि जेव्हा डोळे रडतात तेव्हा तेच हाथ त्याचे आश्रू पुसतात. ♥ 

ते दोघे.............





ते दोघे मार्केट मध्ये गेले होते,
त्याच्या साठी शर्ट घ्यायचा होता. ती त्याच्यासोबत होती. त्याने तिचा हात पकडला होता. अचानक तिचा हात निसटला... त्याच्या हातातून... खूप गर्दी होती.. त्याच्या थोड्यावेळाने लक्षात आला कि तिचा हात सुटला आपल्या हातातून. तो कावरा-बावरा होऊन इकडे तिकडे तिला शोधू लागला. त्याला काही सुचेचना. घाम फुटायला लागला होता. इतक्यात त्याला ती एका ज्वेलरी च्या दुकानात दिसली. एक लोकेट बघत होती. तो त्या दुकानात आला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला, ती वळून म्हणाली,"छान आहे ना??" आणि तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं, त्याचे डोळे पाणावले होते.
तिने विचारलं, "काय झालं?" त्याने तिला आवेगाने हग केलं, आणि लगेच सावरून म्हणाला," तुला आवडली आहे का ती चेन?" ती म्हणाली," हो, खूप." तो म्हणाला," मग हि तुला माझ्याकडून गिफ्ट." "कसलं गिफ्ट? अरे माझा वाढदिवस खूप दूर आहे अजून." तो म्हणाला," हे माझा पहीला valentine गिफ्ट तुला." ती म्हणाली," are you proposing me " तो म्हणाला," हो, कारण आज जेव्हा तुझा हात माझ्याहातून सुटला तेव्हा मला जाणवला कि तुझ्याशिवाय किती incomplete आहे मी.. प्लीज पुन्हा मला अशी सोडून जाऊ नकोस, मी... मी.." ती लगेच म्हणाली," नाही जाणार.कधीच नाही...... नेहमी तुझ्या सोबत राहील, शेवटच्या क्षणापर्यंत..."

एका मुलाची कथा ७ वी ला असताना ...

एका मुलाची कथा
७ वी ला असताना ...


मी माझ्या बाजूच्या बाकावर बसणाऱ्या मुली कडे पाहत राहायचो ..
ती माझी"बेस्ट फ्रेंड"होती ...
मला ती खरच खूप आवडायची I
पण तिने मला कधी त्या नजरेतून पाहिलं नव्हत
आणि ते मला माहित होत....
वर्ग सुटल्या नंतर तिने माझ्याकडे तिच्या मिस झालेल्या तासांच्या notes मागितल्या
मी तिला दिल्या
ती गेली तिला मला सांगायचा होत बरच काही पण जमलच नाही
"माहित नाही का.....??":(((

 कॉलेज ला असताना

माझ्या फोन वर call आला...
तिचा चा होता तो ...
ती रडत होती आणि त्यातच पुट पूटत होती
आणि ती मला सांगत होती तिचा ज्याच्या वर प्रेम होता त्याने कसा त्रास दिला तिला...
तिने मला भेटायला बोलवलं होत
मी तिला भेटायला गेलो...
मी तिच्या समोरचं बसलो होतो
मी तिच्या डोळ्यात आणि अश्रू पाहत बसलो होतो...
२ तास काही बोललो नाही .. मला तिला सांगायचा होतं...
मी तिच्या साठी आणि माझ्या साठी चित्रपटाची तिकीट काढली...
पण तिने मला म्हटलं मी झोपते..
तिने म्हटलं"बर वाटल तू माझ्या साठी इथे आलास..."
खूप वेळा शांत उभे होतो...
मग मी निघालो...
आज हि मला म्हणता नाही आला कि माझा तिच्या वर किती प्रेम आहे ...
माहित नाही का???
.

सिनियर वर्षाला

आमच्या कॉलेज मध्ये prom night होती..ज्यात मुलगा आणि मुलीने एका जोडी त जायचं
ती माझ्या locker जवळ आणि म्हणाली...
माझ्या सोबत कोणी नाही आहे... रु माझ्या सोबत येशील...
माझ्या सोबत हि कोणी नव्हत...
आम्ही दोघांनी"बेस्ट फ्रेंड्स"ह्या नात्याने जाण्याचा नित्नय घेतला ...

PROM निघत ला ...

prom NIGHT ला सगळ काही नित झाल..
आम्ही दोघे निघालो... मी तिची वाट पाहत होतो...
ती तेवढ्यात आली... तिने माझ्या कडे बघून एक smile दिली
आज हि नेहमी सारखा तिला काही बोलू शकलो नाही..
पण मी खुश होतो... कि ती खुश आहे...

GRADUATION दय ला ...

दिवसा मागून दिवस गेले...
आठवडे लोटले किती तरी महिने गेले
तिला काही बोलण्या आधीच was graduation दय आला ...
मी तिला पाहिलं ...
तीनेव साडी नेसली होती... खूप छान दिसत होती..
माझा तिच्या वर एका तर्फी प्रेम होत पण काय करणार तिचा जमत नव्हत ना
आमची शेवरी ची भेट होणार होती...
ती समोरून आली... मला तर काही बोलताच आलं नाही...
तिने माझ्या चेहर्या वरून हात फिरवला ...
आणि म्हटली"आपण नक्की भेटू कधी तरी काळजी घे.."
बघाना गंमत आज हि जमल नाही बोलायला

काही वर्षांनी

मी लग्नात आलो होतो...
आणि ते लग्न होत तीच .. तिचा दुसर्या सोबत लग्न ठरलं होत ..
माझं प्रेम कधी व्यक्त चा नाही करता आलं...पण तिला मैत्रीचः नात जास्त पसंत होत आणि मी तेव्चा निभावल....
"तू आज हि माझ्या सोबत आहेस"असं ती म्हणाली डोळ्यातले अश्रू लपवत हो म्हटले ..
आज हि तिला म्हणता आले नाही कि माझं तुझ्या वर प्रेम आहे..

खूप वर्षांनी...
मी आमच्या शाळेत एकदा गेलो ...
तिथे आमच्या वर्गातले सगळे जन आले होते...
ती हि...
तिथे प्रत्येकाने आपली लहान पाणी लिहिलेली पत्र ठेवली होती...
मी तिने लिहिलेलं एक पत्र सहज घेतलं... आणि वाचायला लागलो...
7th:"वर्गात असताना विनीत नेहमीचं माझ्या कडे बघत असतो... किती वेडा आहे हा मुलगा"
college year:"आज हि मी त्याला खोत सांगितलं कि माझं ब्रेअक उप झाला तरी हा वेडा माझ्या साठी आलं"
prom night"आज तरी त्याने मला म्हणावं कि माझ्या वर प्रेम आहे .... मी वाट बगहातेय,...
मला त्याला सांगावस वाटतंय कि माझा हि त्याच्यावर खूप प्रेम आहे त्यालाही कळू दे..."
graduation year:"किती लाजाळू आहे हा साडीत पाहून नाही काही बोलला नाही"
marriage day:"आज माझा लग्न आहे... माझा त्याच्यावर प्रेम आहे पण त्याने अजून नाही मला काही म्हटलं नाही तुझ्या आठवणी माझ्या नेहमी स्मरणात राहतील....."

हे सगळं वाचल्या नंतर तो तिथेच रडायला लागला...
आणि त्याने पाहिलं तर समोर तीही आज रडत होती...
कारण एकाचा दोघांचा असीम प्रेम पण जमल नाही व्यक्त करायला..

एक हृदयस्पर्शी प्रेमकथा ♥♥♥

एक हृदयस्पर्शी प्रेमकथा:-
एक मुलगा तिच्या GF
च्या रोजच्या SMS
( I LOVE YOU ,I MISS YOU ) ने
त्रासला होता .
एके दिवशी तो एक SMS RECIVE
करतो पण न वाचताच झोपतो......
दुसर्या दिवशी त्या मुलीच्या आईचा त्याला फोन
येतो ...♥♥♥
कि काल रात्री तिची मुलगी कार
अपघातात मरण पावली ....
..तो गोंधळतो आणि
तो मुलगा फोन मधील SMS
वाचतो....."DEAR PLEASE तुझ्या घरासमोर
ये ,माझा अपघात
झाला आहे........
♥♥♥ आणि मला तुला शेवटचा पहायचा आहे ....PLEASE ..."
पण तो कमनशिबी मुलगा
तिच्या प्रेमाला कायमचा मुकतो.............♥♥♥
यावरून मला तुम्हाला एवढाच
सांगावेसे
वाटते कि
आपल्या जवळच्या ,
आपल्यावर प्रेम
करणाऱ्या व्यक्तीला कधीही IGNORE करू नका.....
कारण ती व्यक्ती आपल्यावर
मनापासून
प्रेम करत
असते.........♥♥♥