तिन्हीसांजेच्या संधिप्रकाशात एक कृश आणि अतिजिर्णं असा वृद्ध वटवृक्षाच्या पारावर विसावलेला होता.
पारावर एक लहानसे हनुमान मंदिर होते.
दिव्याला नुकतीच तेलवात केलेली असावी.लोक येतजात होती.
तितक्यात एका लहान मुलाला घेऊन मोठा जमाव तेथे आला. देवदर्शन करून
त्यांनी तिथल्या लोकांना प्रसाद वाटला.
या वृद्धाला प्रसाद देत एकजण म्हणाला, "आशीर्वाद द्यावा बाबा, घरी पुत्र जन्मला".
"मी असा भणंग.. काय आशीर्वाद देणार?" वृद्ध उत्तरला.
"या मारूतीरायासारखा चिरंजीव हो म्हणा".
वृद्धाच्या चेहर्यावर विलक्षण वेदना उमटली. अबोलपणे हात उंचावत त्याने मनोमन आशीर्वाद दिला.
सारेजण गेल्यानंतर, आपल्या मस्तकाचे जीर्ण-मलिन वस्त्रं सोडवून, तिथल्या दिव्याचे तेल कपाळावरील जखमेला लावत म्हणाला..
"देवा चिरंजीवित्वाचा शाप भोगणारा, मी शेवटचाच असू दे.."
No comments:
Post a Comment