Friday 11 January 2013

अश्रुंची कहाणी................





एकदा डोल्यांतल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......


'ए आपण असे कसे रे


ना रंग, ना रूप,


नेहमीच चिडीचुप,


आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,

दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,

कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,

किनारा ही नाही साधा या पापण्याला............

दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,

खुप विचार करून तो बोलला,

रंग-रूप नसला तरी,

चिडीचुप असलो जरी,

आधार आपण भावनांचा,

आदर राखतो वचनांचा,

सान्त्वनांचे बोल आपण,

अंतरीही खोल आपण,

सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,

दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,

आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,

बंधनात नाही कोणी बंधवु शकत,

उद्रेक आपण मनातील वेदनांचा,

नाजुक धागा वचनातील बंधनांचा,

भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,

स्वरबद्ध झंकार तनातील स्पंदनांचा ,

म्हणुनच,

आपले बाहेर पड़णे भाग आहे,

आपल्यामुळेच आज हे जग आहे.

अशीच आपली कहाणी.........

ऐकून ही अश्रुंची वाणी

अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी......

No comments:

Post a Comment